शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

जनस्थान नगरी का अधर्म अति जाहला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:09 IST

आटपाट नगर होते, जनस्थान त्याचे नाव.  कर्तव्य प्रतिपालक,  शिस्तशूर तुकोजीराजेंकडे  अलीकडेच त्याची मनसबदारी आलेली. राजे तसे कडव्या शिस्तीचे.  यापूर्वी ठिकठिकाणच्या गडांवर त्यांनी  चांगलीच शिस्त लावलेली.  पण, शिस्त का कुणाला आवडते?  शिवाय जनस्थानी आल्या आल्याराजेंनी सारा (कर) वसुलीही  सक्त केलीय.  आजपर्यंत मूठभर देणाऱ्यांचा  कोपरापासून अख्खा हातच कलम करण्याचे  फर्मानच काढले आहे ...

आटपाट नगर होते, जनस्थान त्याचे नाव.  कर्तव्य प्रतिपालक,  शिस्तशूर तुकोजीराजेंकडे  अलीकडेच त्याची मनसबदारी आलेली. राजे तसे कडव्या शिस्तीचे.  यापूर्वी ठिकठिकाणच्या गडांवर त्यांनी  चांगलीच शिस्त लावलेली.  पण, शिस्त का कुणाला आवडते?  शिवाय जनस्थानी आल्या आल्याराजेंनी सारा (कर) वसुलीही  सक्त केलीय.  आजपर्यंत मूठभर देणाऱ्यांचा  कोपरापासून अख्खा हातच कलम करण्याचे  फर्मानच काढले आहे त्यांनी.ना दरबारींना कसली मुभा,  ना प्रजेला कसली सवलत...कोल्हेकुई वाढली आहे ती त्यामुळेच.  प्रजा म्हणे रस्त्यावर उतरलीय. गांधींच्या टोपीला  कुण्या राळेगणच्या अण्णांनी ‘अच्छे दिन’ आणल्याने त्या टोप्या घालून व  हाती टाळ-चिपळ्या घेत  तुकोबारायांचा जप करीत  रयतेने नामसंकीर्तनही केले  दोन दिवसांपूर्वी गडाच्या द्वारी.  पण तुकोजीराजे ठाम. ....संत तुकोबारायांनीच सांगून ठेवल्याप्रमाणे  नाठाळांच्या माथी काठी हाणायाची तर  या राजेंचे अवतारकार्य येथे जाहले.  त्यामुळे रयतेच्या कीर्तनाचीव टाळ-मृदंगाच्या गजराची  त्यांना कसली आली चिंता?  ते तर मुंबई दरबारी  महाराजांकडे हजेरीस जाऊन आलेले.  त्यांच्या रजेचा खलिताही मंजूर झालेला.  तशी दवंडीही नगरात पिटली गेलेली.  पण, नाठाळांच्या चर्चांमधील  हवा काढून घेण्यासाठी  रजेचा खलिता गोदावरीत भिरकावूनतुकोजीराजे रयतेच्या सेवेत दाखल झाले.  पूर्वीचे राजे-महाराजे रात्री वेश बदलून  रयतेची ख्याली-खुशाली जाणून घ्यायला  प्रधानजींसमवेत गडाखाली फेरफटका मारत. तुकोजीराजेंनीही तसेच करायचे ठरवले.***दात घासून, शुचिर्भूत होण्याची संधी न देताच अख्ख्या प्रधानमंडळाला सोबत घेऊन  ते भल्या पहाटे नगरच्या टॅÑकवर पोहोचले.  प्रजेलाही कोण आनंद झाला  तो काय वर्णावा!  भल्याभल्यांना दर्शन न देणारे व दिले तरी  दरबारात हजेरी घेणारे राजे  आज चालत प्रजेच्या द्वारी आले...  अहाहाऽऽऽ... काय भाग्य प्रजेचे!***पूर्वीच्या काळी अशा भेटीसाठी  गडावरील दरबानांना  राजमुद्रा द्याव्या लागत म्हणे.  पण दिल्लीच्या तख्तावरील  शहेनशहांनी रोख मुद्राबंदी केल्याने  मुद्रेचा विषय संपला आता.  त्यामुळे चिठोरी ‘टोकन’ घेऊन जनता  राजेंच्या दर्शनाला आसुसलेली.  बसायला जागाच नाही म्हणण्यापेक्षा  राजेंच्या समोर बसायची  कुणाची काय बिशाद? त्यामुळे  काही ताटकळलेले, काही थबकलेले...  इतक्यात गलका झाला,  राजे आलेऽ, राजे आलेऽऽ  ट्रॅकवरील हिरवळीनेही त्यांना  मानाचा मुजरा करीत  आपल्या माना तुकविल्या..***अशीच मान तुकवत एक प्रधान  पटांगणाच्या तख्तावर आला तर  राजे संतापले. कडेलोट केल्याच्या स्वरूपात  त्यास खाली उतरविले.  बरे तरी हत्ती नव्हता सोबत  अन्यथा त्याच्या पायदळी दिले असते.  राजाच्या तख्तावर पाऊल ठेवायची  या सामान्य मुलाजिमची इतकी हिंमत?***इतक्यात धीटपणे एक बालिका पुढे आली.  थेट तख्तावरच चढली.  जणू तिचे येणे ठरलेले असावे.  ‘यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत.... सम्भवामि युगे युगे !’ म्हणाली.  टाळ्यांचा गजर जाहला... राजेही भारावले, काय हे रयतेचे प्रेम.  बालिकेला म्हणाले,  ‘बेटा, काय याचा अर्थ?’ती म्हणाली, ‘जेव्हा जेव्हा धरतीवर  अधर्म वाढतो तेव्हा धर्मरक्षणार्थ  श्रीकृष्ण अवतार घेतो...’  व्वाऽ, पुन्हा टाळ्या...  उपस्थितानाही जाणीव झाली,जनस्थानातील अधर्माच्या नायनाटासाठीच तर, तुकोजीराजेंना येथे धाडले गेलेले. काय मग त्यापुढे बोलावे पामराने?  आणि बोललेले ऐकतील ते राजे कसले?*** प्रजाजनास प्रश्न पडले भरपूर  पण काही केल्या ते सोडवेना.  ज्या अधर्माच्या नाशासाठी राजे आले  तो अधर्म नेमका केला कुणी?  किल्लेदार, बिल्लेदार, भालदार, चोपदार  उरलेसुरले प्रजाजनही  सारेच जर असतील अधर्मी  तर मुंबई मुक्कामी असलेल्या  धर्मपरायण, कमलपुष्पांकित,  दत्तकविधानवीर महाराजांनी तरी  आजवर का खपवून घेतले हे सारे? त्यांच्यामुळेच ज्यांना गडाच्या  चाव्या मिळाल्या आहेत  ते किल्लेदारही मग का झाले फितूरमहाराजांनी पाठविलेल्या राजेंशी?***प्रश्नाचे उत्तर सोपे नसावेच.  तसे ते असते तर  महाराजांनीच नाही का केले असते  काही खुलासे किमान किल्लेदारांकडे.  रयतेला रस्त्यावर उतरतराजेंना राजधर्म सांगण्याची वेळ आली  ती त्यामुळेच.(कल्पनेतील हा प्रसंग व यातील व्यक्तिरेखावास्तविकतेत कुणाशी साधर्म्य साधत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका