शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

सुधारणेला वाव !

By किरण अग्रवाल | Updated: July 22, 2018 01:31 IST

वैवाहिक संबंधातील विच्छेदनाच्या म्हणजे काडीमोडच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत, त्यामागे पती-पत्नीमधील बेबनावाचे कारण प्रामुख्याने आढळून येते. सदरचा विषय नव्याने चिंतेचा बनू पाहत असताना जुनी जळमटेही दूर होताना दिसत नाहीत. मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून सासरी होणारा छळ व त्यातून विवाहितेची आत्महत्या घडून येण्याचे प्रकारही कायम असल्याचे बघता समाजातले मागासलेपण दूर होऊ न शकल्याचेच म्हणता यावे.

ठळक मुद्देकुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत

कुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय आहे. भांड्याला भांडे लागणार म्हटल्यावर आवाज होणारच. परंतु काळानुरूप या आवाजाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी घरात वडीलधारी मंडळी असायची म्हणून पती-पत्नीतील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण कमी असायचे, हल्ली विभक्त कुटुंबावस्थेमुळे ते प्रमाण वाढले आहे. जरा जराशा कारणांमुळे परस्परात मतभिन्नता होऊन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, कारण शिकल्या-सवरल्यापणातून आलेला स्वाभिमान त्यांना पडती बाजू घेऊ देत नाही. कुठपर्यंत ताणायचे आणि कुठे सोडून द्यायचे हे सांगणारेच घरात नसतात. त्यातून वादाची परिसीमा गाठली जाते. पण याच शिक्षणातून सामंजस्य वा समजूतदारी का येत नाही हा प्रश्न आहे. अर्थात, मुद्दा तो नाही. शिक्षण वाढले आहे, विज्ञान प्रगत झाले आहे, तरी मूलबाळ होत नाही म्हणून छळल्या जाणाऱ्या व त्याकारणाने गळफास लावून घेणाºया विवाहिता पाहता, जीव गमावण्यामागचे हे कारण आज कालसुसंगत वाटते का, हा खरा मुद्दा आहे. बरे, ग्रामीण भागातील विचारांचा बुरसटलेपणा पूर्णत: कमी झालेला नसल्यामुळे असे होत असेल म्हणून गैरसमज करून घेता येऊ नये. शहरी भागातही असे प्रकार सुरूच आहेत. नाशिकच्या सिडकोतील पंडितनगर भागातील एका भगिनीने याच कारणास्तव लावून घेतलेला गळफास यासंदर्भात समाजमन अस्वस्थ करणारा आहे. आत्महत्यांच्या घटनांत अलीकडे अधिकतर कर्जबाजारीपणा वा परिस्थितीपुढे हात टेकावे लागल्याने आलेल्या मनाच्या खचलेपणाची कारणे दिसून येत असतात, त्याचसोबत मूलबाळ होत नसल्यातून होणाºया छळाचे पारंपरिक कारणही टिकून असल्याचे आढळून यावे, हे विशेष. कारण, वंध्यत्वाच्या समस्येवर विज्ञानाने मात केल्याची अनेक उदाहरणे आज समोर आहेत. स्वत:ला आई होता आले नाही तरी, आईपण अनुभवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत आहेत. असे असताना विचारांची चौकट न बदलता केवळ मूलबाळ होत नाही म्हणून सुनेचा छळ केला जात असेल व सात-सात वर्षे संसाराचा गाडा हाकून झालेल्या विवाहितेला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नसेल, तर या परिस्थितीला मागासलेपणाखेरीज दुसरे कोणते नाव ठेवता यावे? आपण नुसतेच शिकलो; पण सवरलो नाहीत. काळानुरूप लोकांची मानसिकता बदलली असे नक्कीच म्हणता येते, पण त्याज्य काय? म्हणजे टाकून काय द्यायचे हेच अनेकांना उमजले नाही असेच यावरून स्पष्ट व्हावे, तेव्हा, समाजसुधारणेला अजूनही मोठा वाव आहे, हाच यातील मथितार्थ!

टॅग्स :Familyपरिवार