शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सुधारणेला वाव !

By किरण अग्रवाल | Updated: July 22, 2018 01:31 IST

वैवाहिक संबंधातील विच्छेदनाच्या म्हणजे काडीमोडच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत, त्यामागे पती-पत्नीमधील बेबनावाचे कारण प्रामुख्याने आढळून येते. सदरचा विषय नव्याने चिंतेचा बनू पाहत असताना जुनी जळमटेही दूर होताना दिसत नाहीत. मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून सासरी होणारा छळ व त्यातून विवाहितेची आत्महत्या घडून येण्याचे प्रकारही कायम असल्याचे बघता समाजातले मागासलेपण दूर होऊ न शकल्याचेच म्हणता यावे.

ठळक मुद्देकुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत

कुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय आहे. भांड्याला भांडे लागणार म्हटल्यावर आवाज होणारच. परंतु काळानुरूप या आवाजाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी घरात वडीलधारी मंडळी असायची म्हणून पती-पत्नीतील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण कमी असायचे, हल्ली विभक्त कुटुंबावस्थेमुळे ते प्रमाण वाढले आहे. जरा जराशा कारणांमुळे परस्परात मतभिन्नता होऊन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, कारण शिकल्या-सवरल्यापणातून आलेला स्वाभिमान त्यांना पडती बाजू घेऊ देत नाही. कुठपर्यंत ताणायचे आणि कुठे सोडून द्यायचे हे सांगणारेच घरात नसतात. त्यातून वादाची परिसीमा गाठली जाते. पण याच शिक्षणातून सामंजस्य वा समजूतदारी का येत नाही हा प्रश्न आहे. अर्थात, मुद्दा तो नाही. शिक्षण वाढले आहे, विज्ञान प्रगत झाले आहे, तरी मूलबाळ होत नाही म्हणून छळल्या जाणाऱ्या व त्याकारणाने गळफास लावून घेणाºया विवाहिता पाहता, जीव गमावण्यामागचे हे कारण आज कालसुसंगत वाटते का, हा खरा मुद्दा आहे. बरे, ग्रामीण भागातील विचारांचा बुरसटलेपणा पूर्णत: कमी झालेला नसल्यामुळे असे होत असेल म्हणून गैरसमज करून घेता येऊ नये. शहरी भागातही असे प्रकार सुरूच आहेत. नाशिकच्या सिडकोतील पंडितनगर भागातील एका भगिनीने याच कारणास्तव लावून घेतलेला गळफास यासंदर्भात समाजमन अस्वस्थ करणारा आहे. आत्महत्यांच्या घटनांत अलीकडे अधिकतर कर्जबाजारीपणा वा परिस्थितीपुढे हात टेकावे लागल्याने आलेल्या मनाच्या खचलेपणाची कारणे दिसून येत असतात, त्याचसोबत मूलबाळ होत नसल्यातून होणाºया छळाचे पारंपरिक कारणही टिकून असल्याचे आढळून यावे, हे विशेष. कारण, वंध्यत्वाच्या समस्येवर विज्ञानाने मात केल्याची अनेक उदाहरणे आज समोर आहेत. स्वत:ला आई होता आले नाही तरी, आईपण अनुभवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत आहेत. असे असताना विचारांची चौकट न बदलता केवळ मूलबाळ होत नाही म्हणून सुनेचा छळ केला जात असेल व सात-सात वर्षे संसाराचा गाडा हाकून झालेल्या विवाहितेला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नसेल, तर या परिस्थितीला मागासलेपणाखेरीज दुसरे कोणते नाव ठेवता यावे? आपण नुसतेच शिकलो; पण सवरलो नाहीत. काळानुरूप लोकांची मानसिकता बदलली असे नक्कीच म्हणता येते, पण त्याज्य काय? म्हणजे टाकून काय द्यायचे हेच अनेकांना उमजले नाही असेच यावरून स्पष्ट व्हावे, तेव्हा, समाजसुधारणेला अजूनही मोठा वाव आहे, हाच यातील मथितार्थ!

टॅग्स :Familyपरिवार