शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

सुधारणेला वाव !

By किरण अग्रवाल | Updated: July 22, 2018 01:31 IST

वैवाहिक संबंधातील विच्छेदनाच्या म्हणजे काडीमोडच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत, त्यामागे पती-पत्नीमधील बेबनावाचे कारण प्रामुख्याने आढळून येते. सदरचा विषय नव्याने चिंतेचा बनू पाहत असताना जुनी जळमटेही दूर होताना दिसत नाहीत. मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून सासरी होणारा छळ व त्यातून विवाहितेची आत्महत्या घडून येण्याचे प्रकारही कायम असल्याचे बघता समाजातले मागासलेपण दूर होऊ न शकल्याचेच म्हणता यावे.

ठळक मुद्देकुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत

कुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय आहे. भांड्याला भांडे लागणार म्हटल्यावर आवाज होणारच. परंतु काळानुरूप या आवाजाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी घरात वडीलधारी मंडळी असायची म्हणून पती-पत्नीतील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण कमी असायचे, हल्ली विभक्त कुटुंबावस्थेमुळे ते प्रमाण वाढले आहे. जरा जराशा कारणांमुळे परस्परात मतभिन्नता होऊन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, कारण शिकल्या-सवरल्यापणातून आलेला स्वाभिमान त्यांना पडती बाजू घेऊ देत नाही. कुठपर्यंत ताणायचे आणि कुठे सोडून द्यायचे हे सांगणारेच घरात नसतात. त्यातून वादाची परिसीमा गाठली जाते. पण याच शिक्षणातून सामंजस्य वा समजूतदारी का येत नाही हा प्रश्न आहे. अर्थात, मुद्दा तो नाही. शिक्षण वाढले आहे, विज्ञान प्रगत झाले आहे, तरी मूलबाळ होत नाही म्हणून छळल्या जाणाऱ्या व त्याकारणाने गळफास लावून घेणाºया विवाहिता पाहता, जीव गमावण्यामागचे हे कारण आज कालसुसंगत वाटते का, हा खरा मुद्दा आहे. बरे, ग्रामीण भागातील विचारांचा बुरसटलेपणा पूर्णत: कमी झालेला नसल्यामुळे असे होत असेल म्हणून गैरसमज करून घेता येऊ नये. शहरी भागातही असे प्रकार सुरूच आहेत. नाशिकच्या सिडकोतील पंडितनगर भागातील एका भगिनीने याच कारणास्तव लावून घेतलेला गळफास यासंदर्भात समाजमन अस्वस्थ करणारा आहे. आत्महत्यांच्या घटनांत अलीकडे अधिकतर कर्जबाजारीपणा वा परिस्थितीपुढे हात टेकावे लागल्याने आलेल्या मनाच्या खचलेपणाची कारणे दिसून येत असतात, त्याचसोबत मूलबाळ होत नसल्यातून होणाºया छळाचे पारंपरिक कारणही टिकून असल्याचे आढळून यावे, हे विशेष. कारण, वंध्यत्वाच्या समस्येवर विज्ञानाने मात केल्याची अनेक उदाहरणे आज समोर आहेत. स्वत:ला आई होता आले नाही तरी, आईपण अनुभवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत आहेत. असे असताना विचारांची चौकट न बदलता केवळ मूलबाळ होत नाही म्हणून सुनेचा छळ केला जात असेल व सात-सात वर्षे संसाराचा गाडा हाकून झालेल्या विवाहितेला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नसेल, तर या परिस्थितीला मागासलेपणाखेरीज दुसरे कोणते नाव ठेवता यावे? आपण नुसतेच शिकलो; पण सवरलो नाहीत. काळानुरूप लोकांची मानसिकता बदलली असे नक्कीच म्हणता येते, पण त्याज्य काय? म्हणजे टाकून काय द्यायचे हेच अनेकांना उमजले नाही असेच यावरून स्पष्ट व्हावे, तेव्हा, समाजसुधारणेला अजूनही मोठा वाव आहे, हाच यातील मथितार्थ!

टॅग्स :Familyपरिवार