शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 01:05 IST

त्र्यंबकेश्वर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आण िमराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शनिवारी(दि.१०) मानसिक आरोग्य जपताना या विषयावर जिल्हास्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमानसिक आरोग्य जपताना ... या विषयावर जिल्हास्तरीय वेबिनार

त्र्यंबकेश्वर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आण िमराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शनिवारी(दि.१०) मानसिक आरोग्य जपताना या विषयावर जिल्हास्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. ए. के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या वेबिनारच्या प्रारंभी मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एम. माळी यांचा, संयोजक डॉ. एस. एस. कांबळे यांनी यथोचित सत्कार केला. प्रा. एम. आर.थोरात यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपप्राचार्य एस. एस. देवरे, प्रा. एम. एन. खालकर, डॉ. एस. जे. निकम, डॉ. एम. डी. दुगजे, प्रा. ए. एस. खाडे, जगताप आदी उपस्थित होते.मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एम. माळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले की, दरवर्षी जरी जागतिक मानिसक आरोग्य दिन वेगवेगळ्या कारणांनी साजरा होत असला तरी 2020 वर्षात संपन्न होणारा हा दिवस ष्श1द्बस्र-19 या महामारीला अनुसरून खूपच महत्वाचा ठरला आहे. सर्वांसाठी मानिसक आरोग्य उत्तम खबरदारी -उत्तम आरोग्य,या थीमला अनुसरून घेतल्याने, मानसशास्त्रातील क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी या वर्षभरात अतिशय मोलाची भूमिका बजावली. सर्वांचेच मानिसक आरोग्य या कालावधीत जपणे अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.यापूर्वी अठराव्या शतकात मानिसक रु ग्ण, त्यांच्या पापाची शिक्षा म्हणून आजारी होतात असा समज होता. त्यामुळे रु ग्णांना बांधून ठेवले जात होते, छळ केला जात असे. नंतरच्या कालखंडात फिलिप फिनेल या शास्त्रज्ञाने ही क्रूर पद्धत बंद केली. शरीरशास्त्राच्या अभ्यासात प्रगती झाली. जैवमनोसामाजिक कारणांमुळे विकृती निर्माण होऊ शकते, असा विचार पुढे आला.आज भारतात प्रत्येक पाच व्यक्तींच्या मागे एक मनोरु ग्ण आहे. जवळपास 26 कोटी लोक मानिसक आजाराचा सामना करतात असे सरकारी आकडेवारीनुसार दिसून येते. सिग्मंड फ्राईड यांच्या मते , मन हे हिमनगासारखे असते.मनाचा थोडासाच भाग आपल्याला माहीत असतो बाकी अबोध मनाच्या पातळीवर असतो व त्यानुसार मानिसक समस्या निर्माण होतात. इदम्, अहम आण िपराअहम यामध्ये समतोल साधता आला तरच आरोग्य सुदृढ राहते. अन्यथा इदमचे प्राबल्य वाढल्यास मानिसक संघर्ष निर्माण होतात.जीवन जगत असताना कुटुंब, नातेवाईक, मित्र,यांच्यासोबत घिनष्ठ नाते सांभाळून त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:चा व इतरांचा आदर केला पाहिजे, त्यातून आत्मसन्मान वाढवून मानिसक आरोग्य चांगले राहते. मानिसक आजाराची लक्षणे, ढोबळमानाने अचानक रडू येणे, रिकामेपणा वाटणे, झोप न लागणे, आत्महत्येचा सतत विचार येणे, निराशावादी असणे अशी दिसतात . सुदृढ मानिसक आरोग्य प्रस्थापित करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे, योग्य प्रमाणात आहार व झोप घेणे, इतरांविषयी पूर्वग्रह न करणे,शारीरिक दृष्ट्या तंदुरु स्त असणे, इतरांना मदत करणे यासारखी जीवनशैली अवलंबल्यास आपल्याला स्वत:चे व इतरांचे मानिसक आरोग्य निश्चित जगता येईल असे प्रतिपादन डॉ.माळी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाभरातून जवळपास 75 प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा मिलिंद थोरात यांनी केले तर डॉ शरद कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.

टॅग्स :onlineऑनलाइनcollegeमहाविद्यालय