शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

महानुभाव पंथाद्वारे भक्तिमार्गातील क्रांतिकारक विचार मांडण्याचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:51 IST

महानुभावपंथाच्या माध्यमातून गेल्या साडेसातशे वर्षांपासून सातत्याने भक्तीमार्गातील क्रांतीकारक विचार मांडण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंथाचे आचार्य, संत-महंत आणि साधक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच केवळ खेड्यापाड्यातच नव्हे तर आदिवसी वाड्या-वस्त्यात पंथाचे समतावादी आणि व्यसनमुक्तीचे विचार पोहचले आहेत, असे प्रतिपादन उपाध्यकुलाचार्य आचार्य प्रवर महंत वर्धनस्त बीडकरबाबाशास्त्री यांनी केले.

ठळक मुद्देबीडकरबाबा शास्त्री : जिव्हाळे येथे श्री चक्रधरस्वामी जयंती सोहळा

नाशिक : महानुभावपंथाच्या माध्यमातून गेल्या साडेसातशे वर्षांपासून सातत्याने भक्तीमार्गातील क्रांतीकारक विचार मांडण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंथाचे आचार्य, संत-महंत आणि साधक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच केवळ खेड्यापाड्यातच नव्हे तर आदिवसी वाड्या-वस्त्यात पंथाचे समतावादी आणि व्यसनमुक्तीचे विचार पोहचले आहेत, असे प्रतिपादन उपाध्यकुलाचार्य आचार्य प्रवर महंत वर्धनस्त बीडकरबाबाशास्त्री यांनी केले.जिव्हाळे (ता. निफाड) येथे मंगळवारी (दि. ११) भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवानिमित्तआयोजित धर्मसभेत महंत वर्धनस्त बीडकर बाबा शास्त्री अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भगवान श्रीचक्रधर स्वामी यांनी तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा आणि जुनाट रूढी-परंपरा यांच्यावर आघात करून सर्वसामान्य जनतेला आणि तळागाळातील समाजातील एक नव्या भक्तीमार्गाची वाट दाखविली. या भक्तीमार्गाचे तत्वज्ञान त्यांनी अत्यंत साध्या सोप्या बोलीभाषेत म्हणजे मराठीत समजावून सांगितले. त्याच कार्याने गेल्या सात दशकापासून पंथाचीवाटचाल सुरू आहे, असेही महंतबीडकर शास्त्री यांनी नमूद केल.याप्रसंी महंतजायराज बाबा विराट यांनी आपल्या व्याख्यानात पंचकृष्ण अवतार परंपरेची माहितीसांगून श्रीचक्रधरस्वामी यांचे विचार आचरणात आणण्याचे साधकांना आवाहन केले.याप्रसंगी व्यासपीठावर आचार्य महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, विनयमुनी पंजाबी, आचार्या महंत सुभद्राबाई शास्त्री कपाटे, अंजनगावकर बाबा, गोपालमुनी पंजाबी, आचार्य मानेकर दादाजी, महंत आंबेकर बाबा आदिंसह संत महंत उपस्थित होते.सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त विविध उपक्रमच्नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती उत्सव सोहळा गेल्या ५० वर्षांपासून नियमितपणे साजरा करण्यात येत आहे. या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ‘सुवर्णपुष्प’ या सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘आजचा दिन आम्हा सोनियाचा’ पत्रिका प्रकाशित करण्यात आली.तसेच यावेळी आमदार अनिल कदम, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार दिलीप बनकर, जि. प. अध्यक्ष शितल सांगळे, उद्योजक शांतीलाल जैन, प्रकाश नन्नावरे, अ‍ॅड.पांडुरंग बोधले, आदिंसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी संतमहंतांचा उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष वामनराव आवारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. कार्यक्रमास नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अमरावती आदि जिल्ह्यातील संत-महंत व भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक