शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सर्व्हर डाउन झाल्याने कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:45 PM

नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनमुळे सुलभ वाटणाºया आॅनलाइन कामाची तलाठ्यांना ‘सजा’ मिळत आहे.

ठळक मुद्देआॅनलाइन कामाची ‘सजा’ : सातबारा, दाखले मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय

नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनमुळे सुलभ वाटणाºया आॅनलाइन कामाची तलाठ्यांना ‘सजा’ मिळत आहे.सध्या सर्वच क्षेत्रात आॅनलाइन व्यवहार सुरू झाले आहेत. राज्यातील महसूल विभागातही सुरू झालेले आॅनलाइन कामकाज मात्र गेल्या आठवडाभरापासून सर्व्हर डाउन झाल्याने जिल्ह्यातील विविध शासकीय कामे ठप्प झाल्याने ग्रामस्थांंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुलभ वाटणारे आॅनलाइनचे हे काम वारंवार डाउन होणाºया सर्व्हरची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी गत झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व्हर डाउन झाल्याने शेतकऱ्यांना विविध ठिकाणी कामाला येणारा सातबारा दररोज तलाठी कार्यालयात चकरा मारूनही मिळत नाही. चार गावांचे मिळून एकच तलाठी सजा असलेल्या ठिकाणी काही किलोमीटर अंतराचा प्रवास करून नागरिक येतात; मात्र दररोजच सर्व्हर डाउन असल्याने रिकाम्या हातीच परतण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांना वेळेसह आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सर्व्हर डाउन होण्याच्या प्रकारामुळे शासकीय योजनांचे कामकाज ठप्प झाले. शासनाच्या कांदा अनुदानासाठी मुदतीत सातबारा न मिळाल्याने हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यातच सर्व्हर डाउनच्या कारणावरून तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, तर काम वेळेत होत नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांच्या जाचाचा सामनाही करावा लागत आहे. ग्रामीण भागातील लोकांना सर्व्हर डाउनबाबत समजावून सांगताना तलाठी तात्यांच्या नाकीनव येत आहे. दररोज आपल्या सजेत येऊनही तलाठ्यांना लोकांची कामे करता येत नसल्यामुळे ग्रामस्थांंच्या अपूर्ण कामांची तलाठ्यांना सजेतच सजा मिळत आहे.सर्व्हर डाउनच्या कारणांमुळे शेतकºयांना वेळेत सातबारा उतारा न मिळाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. तसेच आठवडाभरापासून शाळा, महाविद्यालये, जमीन, शेती कर्ज आदींसह विविध ठिकाणी लागणारा सातबारा वेळेत मिळत नसल्याने कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.- दत्ताराम डोमाडे, सामाजिक कार्यकर्ते, देशवंडीवारंवार अडथळ्यांची शर्यतराज्यातील सर्वच शासकीय कामे संगणकीय झाली आहे. सुरुवातीला सुलभ व तत्काळ सेवा मिळणार असल्याने आॅनलाइन कार्यप्रणालीचे सर्वच थरातून स्वागत झाले. सर्वसामान्य ग्रामस्थांंना या आॅनलाइन प्रणालीची सवय लागण्याच्या आतच अडचणीची वाटणारी सेवा वारंवार सर्व्हर डाउनमुळे सध्या अडथळ्यांची ठरत आहे.