शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:18 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. असे असले तरी टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींकडून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही, हे विशेष !

ठळक मुद्देत्र्यंबकला दिवसाआड पाणीपुरवठा : रोजगाराअभावी तालुक्यातून मजुरांचे स्थलांतर

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. असे असले तरी टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींकडून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही, हे विशेष !वाढत्या तापमानाचा फटका त्र्यंबकेश्वर तालुक्याला दिवसेंदिवस बसू लागला आहे. पारा ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढत आहे. परिणामी उन्हाचा दाह वाढत असून, जलाशयाचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. तालुक्यात १० ते १२ ल.पा. बंधारे असून, योग्य नियोजन केले तर तालुक्याला पिण्याचे पाणी मिळू शकेल. याशिवाय सरकारी ग्रामपंचायतीच्या तसेच खासगी विहिरींचे पाणीही कमी पडत आहे. तथापि काही दुर्गम भागात पाणी पोहोचत नाही, अशी गावे, वाड्या-पाडे मात्र पाण्याविना वंचित राहतात. वाढत्या उन्हामुळे बहुतेक पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. तालुक्याला एप्रिल, मे आणि अर्धा जून या महिन्यांत अर्थात पाऊस पडला ठीकच नाही तर पूर्ण जून महिनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.नेहमीची पाणीटंचाई तालुक्याच्या पाचवीलाच पूजलेली आहे. बेरोजगारी, स्थलांतर रोखण्यासाठी त्र्यंबक तालुक्यात सन २०१३-१४मध्ये गडदुणे व बोरीपाडा प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर या प्रकल्पासोबतच स्थानिक स्तरामार्फत होणारे कळमुस्ते, खोरीपाडा, वरसविहीर, राऊतमाळ, खडकओहळ व टाके देवगाव याबरोबरच ब्राह्मणवाडे, पिंप्री शिरसगाव शिवारातील किकवी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पालादेखील थेट दिल्लीपर्यंत मंजुरी मिळाली आहे. सध्या हा प्रकल्प नांदूरमधमेश्वर विभागाकडे आहे. येथील प्रकल्प-देखील मंजूर करण्यात आले होते. तसे पाहता वरील सर्व प्रकल्प पूर्ण झाले तर त्र्यंबकेश्वर तालुका सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे तालुक्यात भासणारी नेहमीची पाणीटंचाई तर दूर होईलच; पण कामे सुरू झालीच तर तालुक्यातील पाणीटंचाई दूर होईल.तालुक्यात ना औद्योगिक विकास वसाहत, ना उद्योग धंद्याला चालना. परिणामी दरवर्षी हजारो मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर होत असते. पूर्व भागातील द्राक्षमळे, गिरणारे, नाशिक गंगाघाट, सातपूर तर काही मजूर गुजरातला जातात. तसेच त्र्यंबकेश्वर आदी भागात हे लोक तीन महिने वास्तव्य करून परत आपापल्या गावी परत जातात. त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली, बेझे धरणातील पाणी उन्हामुळे कमी झाल्याने दिवसाआड पाणी सोडण्याची वेळ दरवर्षी त्र्यंबक नगर परिषदेवर आली आहे.प्रकल्पांचे भिजत घोंगडेत्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाला गेली तरच बेरोजगारांना कामे मिळतील. स्थलांतराला आळा बसेल व महत्त्वाचे म्हणजे या नवीन प्रकल्पांमुळे प्यायला पाणी मिळेल. पाच ते सहा हजार कृषिक्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल, अथवा या प्रकल्पांचेही भिजत घोंगडे पडले तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईशी सामना करावा लागेल. तालुक्यात सध्या टंचाई परिस्थिती नाही. विशेष म्हणजे या तालुक्यात बळीराजा मुबलक प्रमाणात चाऱ्याचा स्टॉक करून ठेवत असल्याने चाराटंचाई भासत नाही. सर्व यंत्रणांची ११९ कामे व ६७५ मजूर काम करीत असल्याने रोजगाराचा प्रश्न सध्या तरी भेडसावत नाही. अर्थात स्थलांतर होत असले तरी पावसाळ्यात खरिपासाठी दोन पैसे मिळावेत, म्हणूनही स्थलांतर होत असावे.- तहसीलदार कार्यालय, त्र्यंबकेश्वर