शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

१४ तास चार भिंतीच्या आत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:55 PM

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणत्याही बळाचा वापर केला जाणार नाही; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना १४ तासांसाठी कोंडून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती तर आपल्या गावाकडे परतण्यासाठी परप्रांतीयांनी रेल्वेस्थानकांचा परिसर फुलून गेलेला होता.

ठळक मुद्देआज जनता कर्फ्यू : स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपा, कोरोना हटवा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणत्याही बळाचा वापर केला जाणार नाही; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना १४ तासांसाठी कोंडून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती तर आपल्या गावाकडे परतण्यासाठी परप्रांतीयांनी रेल्वेस्थानकांचा परिसर फुलून गेलेला होता.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर दहशतीचे वातावरण असताना भारतात त्याला प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी एकत्र जमू नये यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच बंदी आदेशही लागू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे रविवारी (दि. २२) शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना १४ तास घराच्या चार भिंतीतच व्यतित करावे लागणार आहेत. जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार थंडावणार आहेत.देश आणि माणूस वाचविण्यासाठीच... एरव्ही कर्फ्यू हा शब्द ऐकला की, संचारबंदीसह पोलिसांकडून मिळणाºया दंडुक्यांचा मार याचे स्मरण होते. परंतु, रविवारी पाळण्यात येणाºया जनता कर्फ्यूत पोलिसी बळाचा वापर होणार नाही, की कुठेही संचारबंदी लागू केली जाणार नाही. जनतेने आपला स्वत:चा जीव जपण्याबरोबरच इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:च्या विवेकबुद्धीने पाळलेले आत्मसंयम आहे. या कर्फ्यूमुळे माणूस आणि पर्यायाने देश वाचणार असल्यासंबंधी जागृती केली जात आहे. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. परप्रांतीयांची धावपळ : कोरोनामुळे देशभर सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. शहर व जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या परप्रांतीयांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे परप्रांतीयांनी आपल्या गावाची वाट धरली असून, जिल्ह्यातील नाशिकरोडसह मनमाड, लासलगाव, इगतपुरी, देवळाली कॅम्प या रेल्वेस्थानकांवर गर्दी दिसून आली. जीवनावश्यक वस्तूवगळता अन्य सर्व बाजारपेठांना कुलूप लागणार असून, रस्त्यावरील रहदारीलाही ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बव्हंशी आस्थापना, व्यापारी संघटनांनी शनिवारी व रविवारी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे शनिवारीच जिल्ह्यात ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. मात्र, जनता कर्फ्यूमुळे रविवारी बाजारपेठा बंद राहाणार आहेत. अफवांमुळे नागरिकांनी शनिवारी भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली होती. जनता कर्फ्यू हा कोणीही लादलेला कर्फ्यू नसून जनतेने जनतेच्याच सुरक्षिततेसाठी केलेला एक प्रयोग असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता १४ तास घरांमध्येच थांबून कोरोनाला थोपविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक