शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

साकोरा परिसरात विज, वारेवादळासह बेमोसमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:39 IST

साकोरा : गेल्या चार दिवसांपासून साकोरा परिसरात प्रचंड उकाडा जाणवत असतांना सोमवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे-वादळाला सुरूवात झाली आण िनागरिकांची चांगलीच धावपळ उडाली घरी पोहचताच विज पुरवठा खंडित झाला आण िरात्रभर विजपूरवठा खंडित असल्याने तब्बल चार गावातील नागरिकांच्या झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचार गावांत अंधाराचे साम्राज्य ; बोराळे परिसरात शेतमालाचे नुकसान

साकोरा : गेल्या चार दिवसांपासून साकोरा परिसरात प्रचंड उकाडा जाणवत असतांना सोमवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे-वादळाला सुरूवात झाली आण िनागरिकांची चांगलीच धावपळ उडाली घरी पोहचताच विज पुरवठा खंडित झाला आण िरात्रभर विजपूरवठा खंडित असल्याने तब्बल चार गावातील नागरिकांच्या झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.नांदगाव तालुक्याला कायमचा दुष्काळ पुजलेला असतांना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंतीची वेळ आली असतांना चार दिवसांपासून प्रचंड उकाड्याने ञस्त नागरिकांना काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह धुळीचे लोट पाहून पावसाळ्याची चाहूल झाल्यागत झाले होते. साकोरा, वेहळगांव, पांझण, जामदरी, कळमदरी, बाभुळवाडी, डाक्टरवाडी आदि गावात वादळाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने जनावरांसाठी विकत घेतलेला चारा झाकण्यासाठी शेतकर्यांची चांगलीच धावपळ उडाली. साकोरा, वेहळगांव, पांझण आण िबाभुळवाडी गावांना पिंपरखेड 132 के. व्ही स्टेशनवरून विजपूरवठा जोडला आहे. त्यात वेहळगांव आण िसाकोरा येथे उपसप्टेशन असून त्यावर पांझण वाटरसप्लायचा पुरवठा जोडला आहे. मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे एखाद्या झाडावर फांदी पडल्याने तब्बल एकोणीस तास विजपूरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विरल चारही गावातील नागरिकांना रात्रभर अंधारात बसावे लागल्याने झोपेचं खोबरं झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तसेच गिरणाडॅम धरणाच्या पाण्यावर आधारीत शेतजमिनीतील काढलेला हजारो क्विंटल कांदा भिजला. दुष्काळ आण ि त्यात बेमोसमी पावसाने हजारो रु पयाचा विकत घेतलेला चारा व कांदा, सोयाबीन कुटी, गवताच्या गाठी, मक्याची कुटी तसेच केळीचे खांब, हजारो रु पये खर्च करून घेतलेला चारा अचानक आलेल्या बेमोसमी पाऊसमुळे झाकायला कोणतेही साधन नसल्यामुळे भिजले.गिरणाडॅम परिसरातील आमोदे, बोराळे, मळगाव, कळमदरी, परिसरातील हजारो क्विंटल उन्हाळ कांदा काढून पोहळ घातलेल्या होत्या. अचानक आलेल्या या बेमोसमी पावसामुळे पूर्ण कांदा ओला झाला. काढणीला आलेला कांदा सुद्धा या पावसामुळे खराब होण्याची भीती शेतकर्याला आता वाटू लागली आहे.आठ एकरचा अंदाजे १५०० क्विंटल काढलेल्या कांद्याच्या ३० पोअळा शेतात पडलेला होता. दोन दिवसात चाळीत भरणार होतो. परंतु अचानक आलेल्या बेमोसमी पाऊस व जोराच्या हवेमुळे कांदा झाकता आला नाही. झाकायला गेल्यावर ताडपत्र्या दूरवर उडत होत्या. विजेच्या कडकडाटामुळे जीव सांभाळावा का शेतात पिकलेला कांदा सांभाळावा, अशी वेळ आमच्यावर आली होती. त्यामध्ये पूर्ण कांदा भिजला आहे.- भिलासाहेब राजपूत (शेतकरी)बोराळे, ता. नांदगाव.गेल्या कित्येक वर्षांपासून केळीचे उत्पन्न घेत असून यावेळी आलेल्या अवकाळी वादळासह पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.- दादाभाऊ सोळूंके. (शेतकरी)बोराळे, ता. नांदगाव.