जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांचे हित पाहणार

By Admin | Updated: August 4, 2014 02:12 IST2014-08-04T01:56:38+5:302014-08-04T02:12:12+5:30

जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांचे हित पाहणार

Will look at the interests of farmers in land acquisition | जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांचे हित पाहणार

जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांचे हित पाहणार

 

नाशिक : कुंभमेळ्यासाठी जमीन अधिग्रहित करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, तसेच त्यांना योग्य मोबदला मिळून त्यांचे हित साधले जाईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी सांगितले़
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाजवळील शासकीय विश्रामगृहावर कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत महंत ग्यानदास यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली़ या चर्चेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व योग्य मोबदला देऊन जमिनी अधिग्रहित करण्यात याव्यात़ केंद्र शासनाने उज्जैन येथे भरलेल्या कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांचा निधी दिला होता़ त्याप्रमाणे नाशिकला अतिरिक्त दोन हजार कोटी निधी केंद्र शासनाने देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. हरिद्वार, उजैन्न, अलाहाबाद याप्रमाणे कुंभमेळा प्राधिकरण नाशिक येथे स्थापन करण्याची मागणी ग्यानदास महाराजांनी केली़ याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ नदीची स्वच्छता व शहराचे सौंदर्यीकरण तातडीने करावे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिल्याचे महंत ग्यानदास महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ याप्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कॉँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश, स्वामी भक्तिचरण दास, संजय दास, हेमंत दास, उद्योजक धनंजय बेळे, शरद अहेर, पंकज काळे, जिल्हाधिकारी विलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, महापालिका आयुक्त संजीवकुमार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Will look at the interests of farmers in land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.