शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार? : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:08 IST

निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने द्यायची, मतदारांच्या भावनांशी खेळून सत्ता हस्तगत करायची व सत्तेवर आले की, सारे विसरून जायचे अशाप्रकारे भाजपाने देशाची व राज्याची सत्ता हस्तगत केली असून, त्याच धर्तीवर सध्याच्या लोकसभा निवडणुकीला मोदी-शहा सामोरे जात आहेत.

नाशिक : निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने द्यायची, मतदारांच्या भावनांशी खेळून सत्ता हस्तगत करायची व सत्तेवर आले की, सारे विसरून जायचे अशाप्रकारे भाजपाने देशाची व राज्याची सत्ता हस्तगत केली असून, त्याच धर्तीवर सध्याच्या लोकसभा निवडणुकीला मोदी-शहा सामोरे जात आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार हे ठरविणारी ही निवडणूक असून, जनतेने हुरळून न जाता मोदी व शहा यांच्यातील सत्तेचा माज उतरावा, असे आवाहन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.येथील गोल्फ क्लब मैदानावर आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेऊन ‘ए लाव रे व्हिडीओ’ ने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली असताना नाशिकच्या सभेतून त्याची सांगता करण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी राज्यात अन्य ठिकाणी दाखविलेले सर्व व्हिडीओ पुन्हा दाखवून मोदी व शहा यांच्यावर टिकास्त्र सोडले. ते पुढे म्हणाले, निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष व उमेदवारांकडून जे आश्वासने दिली जातात त्याची पूर्तता होईल म्हणून मतदार रांगेत उभे राहून मतदान करून निवडून पाठवितात. लोकांची गरज मुलभूत सोयी, सुविधा मिळाव्यात इतक्याच असतात परंतु पाच वर्षांपूर्वी मोदी यांनी शेतकरी, बेरोजगार, महिला, नोकरदार अशा सर्वच घटकांना मोठी मोठी आश्वासने दिली. कांद्याचा प्रश्नावर बोलताना आपले सरकार सत्तेवर आल्यास शेतीविषयक धोरण बदलेल, असे मोदी यांनी आश्वासन दिले होते. परंतु यापैकी एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला. महाराष्टÑात युती सरकारच्या काळात चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना भाजपाचे मंत्री, लोकप्रतिनिधी मात्र शेतकऱ्यांचा अपमान करणारे विधाने करतात. शेतकºयांच्या आत्महत्या फॅशन झाली आहे, असे सांगून सत्तेचा माज दाखवित आहेत. शेतीची होत असलेली वाताहत पाहून शेतकºयांची मुले शेती करायला नाही म्हणू लागली आहेत. अशा मुलांसाठी शहरात नोकºया तरी कोठे आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले, मनसे गटनेता सलीम शेख यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी केले.  राज्याच्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ठाकरे यांनी इगतपुरी-त्र्यंबकच्या सीमेवरील बर्फ्याची वाडी या आदिवासी गावातील महिलांची पाण्यासाठी विहिरीत उतरून सुरू असलेल्या धडपडीचा व्हिडीओ दाखवून विद्यमान सरकारला आरोपीच्या पिंजºयात उभे केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक लाख २० हजार विहिरी बांधल्याचे जाहीर केले. जर इतक्या मोठ्या प्रमाणात विहिरी बांधल्या तर राज्यातील ३९ हजार गावांमध्ये दुष्काळ का जाहीर करावा लागला? असा सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात पाटबंधारे खात्याच्या कामांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे भाजपा ओरडत होती, मग साडेचार वर्षे उलटूनही फडणवीस हे पाटबंधारे खात्याच्या गैरव्यवहारावर का बोलत नाही? पवार, तटकरे यांच्यावर काय कारवाई केली? छगन भुजबळ यांना आत टाकले पुढे काय झाले? या प्रश्नावर आता कोणीच का बोलत नाही, अशी विचारणाही ठाकरे यांनी शेवटी केली.काय केलं दत्तक बापाने, फडणविसांवर टीकानाशिकमध्ये सभा होत असताना राज ठाकरे यांनी अपेक्षेनुरूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दत्तक’ घेण्याच्या विषयाला हात घातला. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार करताना फडणवीस यांनी एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो असे म्हटले होते. त्याचा व्हिडीओच लावला. काय केलं या दत्तक बापाने? असा प्रश्न केला. नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश केला, त्यात मनसेची कामे घुसवली, असेही ते म्हणाले.नाशिककरांच्या कौलाविषयी दु:ख कायम...अनेक पक्ष जाहिरनाम्यात कामे करण्याचे स्वप्न दाखवून ती करीत नाहीत. मात्र, मनसेने नाशिक महापालिकेत सत्ता असताना जाहिरनाम्यात जी कामे सांगितली नव्हती तीदेखील केली, देशात प्रथमच टाटा, महिंद्रा, जीव्हीके या कंपन्यांच्या सीएसआर फंडाचा वापर करून विकास करण्यात आला, असे सांगून राज यांनी नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांचा व्हिडीओदेखील दाखवला. जी कामे केली तीच छातीठोकपणे सांगितली. परंतु नाशिककरांनी (विरोधात) निर्णय दिला. त्याचे आजही दु:ख वाटते, असे राज यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदी