शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

ठेकेदाराशी खरेच संबंध नसेल तर समस्येकडे दुर्लक्ष का?

By किरण अग्रवाल | Published: February 16, 2020 2:13 AM

स्वच्छ नाशिकचे नगारे पिटण्याची तयारी एकीकडे होत असताना महापालिका अधिकाऱ्यांच्या अंगावर कचरा फेकला गेल्याने यासंबंधीची वास्तविकता उघड होऊन गेली आहे. अर्थात, सत्ताधाऱ्यांशी संबंधित नेत्याची ठेकेदारी जपण्यासाठी याकडे दुर्लक्ष होत असेल तर ही बाब नगरसेवकांसाठीच नव्हे, त्या पक्षासाठीही धोकेदायक व नुकसानदायक ठरल्यास आश्चर्य वाटू नये.

ठळक मुद्देनाशकातील घंटागाड्या व अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरतक्रारी वाढूनही महापालिका संथ व सुस्तच

सारांश

एकीकडे स्वच्छ व राहण्यायोग्य शहराच्या यादीत अव्वल नंबर प्राप्त करण्यासाठी नाशिकची धडपड सुरू असताना, दुसरीकडे महापालिकेच्या प्रभाग सभेत अधिकाºयांच्या अंगावर कचरा फेकण्याची वेळ नगरसेवकांवर येत असेल तर त्याकडे केवळ विरोधाभासी चित्र म्हणूनच नव्हे, शोचनीय बाब म्हणूनही बघायला हवे. आपल्याकडे रुजलेल्या उत्सवी अगर प्रदर्शनी मानसिकतेतून वास्तविकतेकडे कसे दुर्लक्ष होते, हेच यातून स्पष्ट होणारे आहे.

नाशकातील घंटागाड्यांच्या अनियमिततेचा व त्यामुळे उपस्थित होणारा स्वच्छतेचा प्रश्न हा त्या गाड्यांवरील घंटेप्रमाणे नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत असल्याची घंटा वाजविणारा ठरला आहे. विशेषत: सिडको व पंचवटी या दोन विभागात तर यासंबंधीची समस्या अधिक तीव्रतेने समोर आलेली दिसत आहे. घंटागाड्याच दहा-दहा, पंधरा-पंधरा दिवस येत नसल्याने नागरिक घरात कचरा साचवून ठेवतात, तर ज्यांच्याकडे अशी सोय नाही ते जवळच्या मोकळ्या भूखंडावर अथवा रस्त्यावर कचरा फेकून मोकळे होतात. ते गैरच आहे; पण ज्या घरात बसायला जागा नाही ते दुसरे काय करणार? कचरा कुठे व कशात साठवणार आणि कधीपर्यंत घंटागाडीची प्रतीक्षा करणार? यातून परिसरात दुर्गंधी, डासांचा उपद्रव अशा समस्या जन्म घेत आहेत. बरे, तक्रारी करूनही उपयोग होत नाही. कामचलाऊ व वेळकाढू आश्वासने दिली जातात. समस्या मात्र ‘जैसे थे’च राहते. यासंबंधी प्रभागातील नागरिकांचा दबाव व रोष वाढल्याने अखेर सिडकोतील नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत अधिकाºयांवर कचरा फेकत व त्या कचºयातीलच हार त्यांना घालत या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा आणि त्यामागील तीव्रता दर्शवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मनमाडमध्येही असाच अधिकाºयांच्या टेबलावर कचरा टाकला गेला. या अशा कृतीचे समर्थन नक्कीच करता येऊ नये, परंतु चर्चेऐवजी अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ संबंधितांवर का ओढवली याचा यानिमित्ताने विचार होणे गरजेचे ठरावे.

महत्त्वाचे म्हणजे, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेतील नाशिकचा सहभाग व त्यातील यश दृष्टिपथात असल्याच्या वार्ता असताना सदर कचरा फेको प्रकरण घडले आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाच्या आजवरच्या दोन टप्प्यात नाशिकचा नंबर टॉप-१० मध्ये राहिला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात त्याबाबत अधिक काळजी घेतली गेली. पण या सर्वेक्षणाची मुदत संपताच काही घंटागाड्या थांबल्या. कचरा तुंबू लागला व नागरिकांची ओरड वाढली, त्यामुळे यासंबंधीची काळजी ही सर्वेक्षणापुरतीच होती की काय, असा प्रश्न केला जाणे स्वाभाविक ठरले. शोबाजी किंवा प्रदर्शनीपणा करण्यापलीकडे व योजनांच्या अंमलबजावणीचे उत्सवीकरण करण्यात धन्यता मानण्याखेरीज यंत्रणा यासंबंधीच्या वास्तविकतेकडे पाहणार आहेत की नाही, हा यातील खरा प्रश्न ठरावा. महापालिकेच्या तक्रार निवारण अ‍ॅपमध्ये आजवर घंटागाड्या नियमित येत नसल्याच्या व स्वच्छतेबाबतच्याच तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. शिवाय, महासभा तसेच स्थायी समितीतही वेळोवेळी नगरसेवकांनी ओरड केली आहे. तरी हा प्रश्न निकाली निघू शकलेला नाही. विकासाचे शिल्प साकारणे सोडा, साधा वॉर्डातला कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांकडून नगरसेवकांना भंडावून सोडले जात आहे. त्यातूनच अधिकाºयांवर कचरा फेकण्याचा प्रकार घडून आला.

मुळात, सदर प्रकाराला घंटागाडी ठेकेदाराचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची बाब लपून राहिलेली नाही. अर्थात, घंटागाडीचाच नव्हे तर महापालिकेचे बहुतेक ठेके वादग्रस्त ठरले आहेत व काही न्यायप्रविष्ठ आहेत. कचºयाप्रश्नीच्या तक्रारी पाहता घंटागाडी ठेकेदाराला मध्यंतरी दोन कोटींपेक्षा अधिकचा दंड केला गेला होता, तरी सुधारणा झाली नाही. तद्नंतर पंचवटी व सिडकोतील कामकाजाचे ठेकेच रद्द केले गेले; परंतु पर्यायी व्यवस्था पुरेशी न ठरल्याने प्रश्न निर्माण झालेला दिसत आहे. यातही महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा यात संबंध असल्याची उघड चर्चा आहे. असा संबंध सत्ताधाºयांकडून नाकारला जात आहे; पण मग खरेच तो नसेल तर ठेकेदारावर कारवाई करण्यास अगर त्याला काळ्या यादीत टाकण्यास महापालिका का कचरत आहे, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. प्रशासनही म्हणते, ठेका रद्द केला व पर्यायी व्यवस्था केली; मग कचरा का उचलला जात नाही? सत्ताधाºयांशी संबंधित नेत्याची ठेकेदारी जपण्यासाठीच ही दिरंगाई व बेपर्वाई केली जात असल्याचा आरोप होणे त्यामुळेच स्वाभाविक ठरले आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्यCorruptionभ्रष्टाचार