शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

रुग्ण घटत असताना लॉकडाऊनचा हट्ट का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 12:57 AM

मिलिंद कुलकर्णी रुग्णसंख्या घटत असताना नागरिकांना घरात कोंडणे आणि उद्योग-व्यवसायाला टाळे ठोकणे हा प्रकार अनाकलनीय आहे.

ठळक मुद्देअचानक कडक लॉकडाऊनचा निर्णय का घेतला गेला, यामागील कारण गुलदस्त्यात नागरिकांना घरात कोंडणे आणि उद्योग-व्यापाराला टाळे ठोकण्यातून काय हशील झाले नागरिकांना मात्र तुटवड्यामुळे जादा दराने खरेदी करावा लागत आहे.

कोरोनाच्या लाटा धडकत असताना शासकीय व प्रशासकीय पातळीवर नियोजन, निर्णय आणि त्याच्या अंमलबजावणीविषयी गोंधळाचे चित्र दिसत आहे. कोरोनासारख्या जागतिक महासाथीचा वर्षभराचा अनुभव गाठीशी असताना ह्यपहिले पाढे पंचावन्नह्ण अशी वेळ का आली? राज्य सरकारने ह्यब्रेक द चेनह्ण म्हणून बंधने लादूनही नाशिक जिल्ह्यात रोज चार हजारांहून अधिक रुग्ण आणि ४०हून अधिक मृत्यू होत होते. मिनी कंटेन्मेंट झोन, हाॉटस्पाॉटवर लक्ष केंद्रित करण्याचा उपक्रम अनेक ठिकाणी यशस्वी होत असताना त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या दोन हजारांपर्यंत खाली आलेली असताना अचानक कडक लॉकडाऊनचा निर्णय का घेतला गेला, यामागील कारण गुलदस्त्यात आहे. राज्य सरकारच्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याऐवजी कडक निर्बंध लादून नागरिकांना घरात कोंडणे आणि उद्योग-व्यापाराला टाळे ठोकण्यातून काय हशील झाले हे निर्णय घेणाऱ्या नेतृत्व आणि अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाला ठावूक. लॉकडाऊन करताना जाचक अटी लादून उद्योग-व्यवसाय चालूच शकणार नाही, अशी तरतूद केल्याने त्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे उमटले. उद्योग सुरू ठेवायचा असेल तर कामगारांची भोजन व निवास व्यवस्था करा, अशी अट किती उद्योग पूर्ण करू शकतील? वर्षभरात उद्योगांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना स्थानिक पातळीवर असे निर्णय घेऊन त्यांना आर्थिक संकटात टाकण्यात आले आहे. अशीच स्थिती किराणा दुकानदारांची आहे. सकाळ व संध्याकाळ त्यांना ठराविक वेळेत दुकाने उघडण्याची मुभा आहे, पण विक्री न करता घरपोच माल पोहोचविण्याचे बंधन आहे. शेवटी त्यांनीदेखील दुकाने बंद ठेवण्याचा पर्याय निवडला. संपूर्ण कोरोना काळात उद्योग व व्यापार बंद असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राने हातभार लावला. त्याच क्षेत्राला या लॉकडाऊनमध्ये लक्ष्य करण्यात आले. व्यापाऱ्यांच्या खळ्यावर माल विक्रीचा पर्यायदेखील उफराटा निर्णय आहे. माल खरेदी ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला फेकून द्यावा लागत असताना नागरिकांना मात्र तुटवड्यामुळे जादा दराने खरेदी करावा लागत आहे.कठोर भूमिकेची गरजकोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या रोज ३५- ४० एवढी आहे. एप्रिल महिन्यात तब्बल ११०५ नागरिकांचे मृत्यू झाले. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा वर्षभरात बळकट करु शकलो नाही, हे अपयश दुसऱ्या लाटेने अधोरेखित केले. गेल्या महिन्यातील जाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना, ऑक्सिजन प्लँट उभारण्याच्या घोषणा झाल्या, परंतु अंमलबजावणीची धिमी गती, पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरचा नवा घोळ, रेमडेसिविरच्या वितरणासाठी तब्बल पाच वेळा निर्णयांमध्ये बदल करुनही काळाबाजार कायम, लसीकरणाच्या गोंधळाचा रोज नवा प्रयोग...अडचणींची ही यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत जाईल. कठोर भूमिका घेऊन अडचणी सोडविल्या का जात नाही? गोंधळ, संभ्रमाचे वातावरण का राहते?आदिवासी भागातील आव्हानपालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आमदार दिलीप बोरसे यांनी आदिवासी तालुक्यांमध्ये कोरोना उपचार व लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमजाविषयी प्रशासनाचे लक्ष वेधले. बागलाण तालुक्यात १४७ मृत्यू झाले आहेत. कोरोना चाचणी करणाऱ्या ग्रामस्थांना वाळीत टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. हे गंभीर आहे. केवळ जनजागृतीवर भर देण्यापेक्षा धडक मोहीम का राबविण्यात येत नाही? सर्व यंत्रणा आठवडाभर आदिवासी भागात जाऊन तळ ठोकेल आणि तपासणी व लसीकरणाची मोहीम राबवेल, असे का होऊ शकत नाही?

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या