शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

नाशिक शहर विद्रुप करण्यात कोणाचा हात?

By संजय पाठक | Updated: April 13, 2019 19:31 IST

नाशिक- महापलिकेने गेल्या काही महिन्यांपासून शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात केलेली कारवाई ही समर्थनीय असली तरी मुळात शहर विद्रुप कोण करते आणि तो अशी कृती करताना बघ्याची भूमिका कोण घेते हा खरा प्रश्न आहे.

ठळक मुद्देशासकिय इमारतींपासून पथदिपांवर लावल्या जातात जाहिरातीवृक्षांवर खिळा ठोकून केली जाते फलकबाजीमहापालिकेचे सोयीने दुर्लक्ष

संजय पाठक, नाशिक- महापलिकेने गेल्या काही महिन्यांपासून शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात केलेली कारवाई ही समर्थनीय असली तरी मुळात शहर विद्रुप कोण करते आणि तो अशी कृती करताना बघ्याची भूमिका कोण घेते हा खरा प्रश्न आहे.

शहरात सार्वजनिक ठिकाणी लागणारे राजकिय पक्षांचे फलक हा वादाचा विषय ठरत असला तरी राजकिय पक्षांच्या पेक्षा अधिक फलक खासगी व्यवसायिकांचे असतात. शासकिय इमारती, बस थांबे, प्रसाधन गृहे, इतकेच नव्हे दुभाजक आणि कारंजे, विजेचे पोल देखील सोडले जात नाहीत. खासगी क्लासेस, कर्ज देणारे एजंट, पार्सल पॉइंट, जास्त वेगवान देणाऱ्या इंटरनेट कंपन्या, प्लाट खरेदी विक्री, प्लंबर अशा कोणत्याही व्यवसायिकांकडून सर्रास जाहिराती चिटकवल्या जातात. केवळ शासकिय मिळकतीच नव्हे तर खासगी कंपाऊंड, व्यापारी संकुले, लीफ्ट अशा सर्वच ठिकाणी हे महाभाग जाहिराती लावतात. ग्राहकांना माहिती मिळावी हा त्यांचा उद्देश असला तरी अशाप्रकारे बेकायदेशीररीत्या जाहिराती करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. मध्यंतरी तर काही महाभागांनी तर झाडांनाच जाहिरातींचा वेढा दिला. घरगुती उत्पादनांपासून टीव्ही फ्रिज रिपेअरपर्यंत आणि एखाद्या साधारण डुप्लीकेट चावीपासून बंदुकीपर्यंत जाहिराती झाडांवर खिळे ठोकून करण्यात आल्या. शहराचे विद्रुपीकरण होईल किंवा झाडांना इजा होईल याचेही भानही बाळगत नाही.

करणा-याने नाही तर पहाण्या-याने तर लाजावे ही संवदनशीलताही महापालिकेकडे नाही. लोकमतने यासंदर्भात सरळ फोटोसह माहिती दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. वृक्षांवरील हल्लयाबाबत लोकमतनेच सचित्र वृत्त देऊन लक्षवेध केल्यानंतर प्रशासनाने १३४ गुन्हे दाखल केले. परंतु यानंतर सर्व थांबले काय, तर नाही, अलिकडेच स्मार्ट सिटी कंपनीने वादग्रस्त स्मार्ट रोडचा मेहेर ते सीबीएस एक टप्पा तोही एका बाजुने खुला केला आहे. त्यावरील नव्या को-या बस थांब्यांवर जाहिराती करण्यात आल्याने आता अशा व्यक्तींना आणि त्याकडे दुर्लक्ष करणाºयांना हात जोडणेच बाकी आहे.

पुन्हा लोकमतने हे वृत्त दिल्यानंतर कारवाई झाली खरी परंतु त्यानंतरही ही परिस्थती बदलणार आहे का? शहर स्वच्छतेची केवळ कल्पना करणारे नाशिककर आणि अशी घोषणा करणा-या नाशिक महापालिकेची मानसिकता कधी बदलणार? शहर आपले आहे ही मानसिकता नागरीकांची ना महापालिकेची. त्यामुळे विद्रुपीकरण सुरूच राहणार आणि कोणीतरी जागल्याची भूमिका राबविली की मगच कारवाई करणार. अशीच परिस्थती असेल तर स्वच्छ शहर सर्वेॅक्षणात भाग घेऊन काय उपयोग? तो न घेतलेलाच बरा! 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी