शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

नाशिक शहर विद्रुप करण्यात कोणाचा हात?

By संजय पाठक | Updated: April 13, 2019 19:31 IST

नाशिक- महापलिकेने गेल्या काही महिन्यांपासून शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात केलेली कारवाई ही समर्थनीय असली तरी मुळात शहर विद्रुप कोण करते आणि तो अशी कृती करताना बघ्याची भूमिका कोण घेते हा खरा प्रश्न आहे.

ठळक मुद्देशासकिय इमारतींपासून पथदिपांवर लावल्या जातात जाहिरातीवृक्षांवर खिळा ठोकून केली जाते फलकबाजीमहापालिकेचे सोयीने दुर्लक्ष

संजय पाठक, नाशिक- महापलिकेने गेल्या काही महिन्यांपासून शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात केलेली कारवाई ही समर्थनीय असली तरी मुळात शहर विद्रुप कोण करते आणि तो अशी कृती करताना बघ्याची भूमिका कोण घेते हा खरा प्रश्न आहे.

शहरात सार्वजनिक ठिकाणी लागणारे राजकिय पक्षांचे फलक हा वादाचा विषय ठरत असला तरी राजकिय पक्षांच्या पेक्षा अधिक फलक खासगी व्यवसायिकांचे असतात. शासकिय इमारती, बस थांबे, प्रसाधन गृहे, इतकेच नव्हे दुभाजक आणि कारंजे, विजेचे पोल देखील सोडले जात नाहीत. खासगी क्लासेस, कर्ज देणारे एजंट, पार्सल पॉइंट, जास्त वेगवान देणाऱ्या इंटरनेट कंपन्या, प्लाट खरेदी विक्री, प्लंबर अशा कोणत्याही व्यवसायिकांकडून सर्रास जाहिराती चिटकवल्या जातात. केवळ शासकिय मिळकतीच नव्हे तर खासगी कंपाऊंड, व्यापारी संकुले, लीफ्ट अशा सर्वच ठिकाणी हे महाभाग जाहिराती लावतात. ग्राहकांना माहिती मिळावी हा त्यांचा उद्देश असला तरी अशाप्रकारे बेकायदेशीररीत्या जाहिराती करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. मध्यंतरी तर काही महाभागांनी तर झाडांनाच जाहिरातींचा वेढा दिला. घरगुती उत्पादनांपासून टीव्ही फ्रिज रिपेअरपर्यंत आणि एखाद्या साधारण डुप्लीकेट चावीपासून बंदुकीपर्यंत जाहिराती झाडांवर खिळे ठोकून करण्यात आल्या. शहराचे विद्रुपीकरण होईल किंवा झाडांना इजा होईल याचेही भानही बाळगत नाही.

करणा-याने नाही तर पहाण्या-याने तर लाजावे ही संवदनशीलताही महापालिकेकडे नाही. लोकमतने यासंदर्भात सरळ फोटोसह माहिती दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. वृक्षांवरील हल्लयाबाबत लोकमतनेच सचित्र वृत्त देऊन लक्षवेध केल्यानंतर प्रशासनाने १३४ गुन्हे दाखल केले. परंतु यानंतर सर्व थांबले काय, तर नाही, अलिकडेच स्मार्ट सिटी कंपनीने वादग्रस्त स्मार्ट रोडचा मेहेर ते सीबीएस एक टप्पा तोही एका बाजुने खुला केला आहे. त्यावरील नव्या को-या बस थांब्यांवर जाहिराती करण्यात आल्याने आता अशा व्यक्तींना आणि त्याकडे दुर्लक्ष करणाºयांना हात जोडणेच बाकी आहे.

पुन्हा लोकमतने हे वृत्त दिल्यानंतर कारवाई झाली खरी परंतु त्यानंतरही ही परिस्थती बदलणार आहे का? शहर स्वच्छतेची केवळ कल्पना करणारे नाशिककर आणि अशी घोषणा करणा-या नाशिक महापालिकेची मानसिकता कधी बदलणार? शहर आपले आहे ही मानसिकता नागरीकांची ना महापालिकेची. त्यामुळे विद्रुपीकरण सुरूच राहणार आणि कोणीतरी जागल्याची भूमिका राबविली की मगच कारवाई करणार. अशीच परिस्थती असेल तर स्वच्छ शहर सर्वेॅक्षणात भाग घेऊन काय उपयोग? तो न घेतलेलाच बरा! 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी