शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

उद्याेजकांच्या समस्या सोडविणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:20 IST

सातपूर - सातपूर - अंबड येथील औद्योगिक भूखंडांचे तुकडे करून विक्री करण्याचा विषय असो अथवा प्लेटिंग उद्योगाच्या समस्या अथवा ...

सातपूर -

सातपूर - अंबड येथील औद्योगिक भूखंडांचे तुकडे करून विक्री करण्याचा विषय असो अथवा प्लेटिंग उद्योगाच्या समस्या अथवा गुंतवणुकीसाठी मोठ्या उद्योगपतींना निमंत्रण देणे, अशा सर्वचबाबतीत एमआयडीसीची अनास्था आहे. औद्याेगिक भूखंडाचा प्रश्न तर इतका गंभीर आहे की, मंत्रालय पातळीवर त्याची दखल घेण्याची गरज आहे. पण सामान्य उद्योजकांच्या समस्या कधी सोडविणार आहे?

सातपूर आणि अंबड औद्योगिक क्षेत्र अत्यंत नावाजलेले आहे. अनेक लहान-माेठे उद्योग या ठिकाणी आहेत. मात्र, त्यांच्या समस्या वर्षानुवर्षे त्याच आहेत. कित्येक समस्या नव्याने निर्माण झाल्या आहेत. एकीकडे मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या जातात. दुसरीकडे समस्या सुटत नाहीत. अलीकडेच अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी)विषयी ठोस निर्णय होत नसल्याने प्लेटिंग उद्योगांना नेहमीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. उद्योगांनी आले पाहिजे, इतकीच एमआयडीसीची भूमिका असेल, तर मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे आणि समस्या संबंधीत उद्योगांनी स्वबळावर सोडवायच्या काय, याचा निर्णय झाला आहे. उद्योगांसाठी अनेक फोरम असले तरी, त्यावर एमआयडीसीची भूमिका कळीची असून त्यावर निर्णय होण्याची गरज आहे.

कोट..

प्लेटिंग आणि पावडर कोटिंग उद्योगांसाठी सीईटीपी प्रकल्प अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्लेटिंग उद्योजकांनी संस्थेकडे पैसेही जमा केले आहेत. तरीही एमपीसीबीकडून वारंवार होणारी कारवाई टाळण्यासाठी झेडएलडी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. तरीही प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

- मिलिंद देशपांडे, उद्योजक.

कोट..

बंद पडलेल्या मोठ्या उद्योगांची जागा नियमाप्रमाणे बिल्डरशाही विकत घेऊन पैसे कमवत आहेत. नियमांप्रमाणे भूखंड विकसित केला नाही, तर एमआयडीसी भूखंड जप्त करण्याची कारवाई करते. असाच नियम बंद पडलेल्या कारखान्यांच्याबाबतीत घेतला पाहिजे.

- आशिष नहार, उद्योजक.

कोट...

सद्यस्थितीत जे काही मोठमोठे उद्योग बंद पडलेले आहेत, त्या जागा कोणी तरी विकत घेऊन लहान लहान प्लॉट पाडून ते विकले जातात. मोठ्या उद्योगाच्या ठिकाणी मोठेच उद्योग उभे राहिले पाहिजेत, म्हणजे लघुउद्योगांना जॉबवर्क मिळू शकते.

- जितेंद्र आहेर, उद्योजक.

कोट...

एखादा भूखंड २५ ते ३० वर्षांपासून पडून आहे. असा भूखंड आरक्षण बदलून उद्योगासाठी दिल्यास त्यात गैर काहीच नाही. बंद पडलेल्या कारखान्याच्या जागा लिलावात उद्योजक घेत नाहीत, म्हणून बिल्डर विकत घेतात आणि लघुउद्योजकांना विकतात. त्यात नियमबाह्य असे काहीच नाही. नियमबाह्य काम झाले असते, तर एमआयडीसीनेच हस्तक्षेप केला असता.

- मनीष रावल, उद्योजक