शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 02:10 IST

‘मोदी हटाव’साठी देशातील २२ पक्षांनी एकत्र येऊन ‘हम साथ साथ हैं’चा नारा दिला व आता ते एकमेकांना ‘हम आपके हैं कौन?’ अशी विचारणा करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात देणार हे विरोधकांनीे अगोदर जाहीर करावे, असे खुले आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना सवाल : नाशकात युतीचा ‘मनोमीलन’ मेळावा

नाशिक : ‘मोदी हटाव’साठी देशातील २२ पक्षांनी एकत्र येऊन ‘हम साथ साथ हैं’चा नारा दिला व आता ते एकमेकांना ‘हम आपके हैं कौन?’ अशी विचारणा करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्तेची सूत्रे कोणाच्या हातात देणार हे विरोधकांनीे अगोदर जाहीर करावे, असे खुले आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.भाजपा-शिवसेनेच्या उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या मनोमीलनासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सेनेचे प्रवक्ते संजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.फडणवीस पुढे म्हणाले, विरोधकांमध्ये आत्तापासूनच एकमेकांना पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, सेना-भाजपाची युती झाल्यानंतर राज्यात विरोधकांचे चेहरे उतरले, काहींनी निवडणुकीतून थेट माघार घेतली तर काही जागांवर अद्याप त्यांना उमेदवारच मिळालेले नाहीत. हिंदुत्वाच्या धाग्याने युतीला बांधून ठेवले आहे. ३० वर्षांपासूनची ही युती ‘फेव्हिकॉल’च्या जोडसारखी कायम राहील.कॉँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले, कॉँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता, प्रत्यक्षात जनतेची नाही तर त्यांनी त्यांची स्वत:ची गरिबी हटवून घेतली. त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्टÑवादी नेतृत्वाच्या हातीच सत्ता द्या, असे आवाहनही शेवटी फडणवीस यांनी केले.प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले तर प्रास्ताविक पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाजन म्हणाले, गेली चार वर्षे आम्ही वेगवेगळे लढलो; परंतु आता एकत्र आलो आहोत. व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी, माजी मंत्री बबन घोलप उपस्थित होते. मेळाव्यास उत्तर महाराष्टÑातील युतीचे सर्व खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.देव, देश आणि धर्मासाठीच युती : उद्धव ठाकरेशिवसेना आणि भाजपाची युती देव, देश आणि धर्मासाठीच असल्याने वेगळ्या विचाराच्या हाती देश सोपविणे परवडणारे नसल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. युतीच्या उत्तर महाराष्टÑ कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात ठाकरे यांनी आता आमच्यात कोणताही वाद नसल्याचे सांगितले. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी अजूनही पोहचली नसेल तर केंद्रे उघडून ती पोहचवा, पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर ते पोहचवावे, मराठवाड्याचा पाणीप्रश्न हाही मुद्दा आहेच. अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याने आता वादाचे मुद्देच संपल्याचे आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचा पुनरूच्चार ठाकरे यांनी केला. आपली युती झाली असली तरी शत्रूला कमी लेखू नका. राजकारणातील ते मातब्बर असल्याने गाफील राहू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.श्रोत्यांचे हसणे नेत्यांच्या जिव्हारी !राज्यात कोणत्याही परिस्थितीत सेना-भाजपाची युती होणार नाही असे म्हणणारे सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात झालेली तूतू-मै-मै सर्वांना माहिती आहे. मेळाव्यात हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. संजय राऊत हे बोलण्यासाठी उभे राहताच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘महाराष्टÑाचे लाडके मुख्यमंत्री’ असा उल्लेख करताच सभागृहात जोरदार हास्यस्फोट झाला. राऊत यांच्यानंतर रावसाहेब दानवे हे बोलण्यास उभे राहताच, पुन्हा एकदा सभागृहात सर्वांनाच हसू फुटले. त्यावर दानवे म्हणाले, ‘राऊत यांच्या बोलण्याच्या वेळी फुटलेल्या हास्याचा सूर व माझ्या वेळी उठलेले हास्य या दोन्हीचा सूर वेगवेगळा होता, हे माझ्या लक्षात आले आहे. आता यापुढे सर्वांचा आवाज एकच निघावा यासाठीच प्रयत्न करावा लागेल’. भाषणाच्या प्रारंभीच श्रोते हसल्याची बाब मात्र दोघांच्या जिव्हारी लागल्याचे दिसले.मनोमीलनातही खडसे भाषणापासून दूर!भाजपा-शिवसेनेच्या उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या मनोमीलनासाठी झालेल्या मेळाव्यामध्ये फर्डे वक्ते एकनाथ खडसे यांना भाषणापासून दूर ठेवले गेल्याचे दिसून आले.गेल्या काही दिवसांपासून मुख्य प्रवाहापासून काहीसे वेगळे पडलेले भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्टÑातील प्रमुख नेते, एकनाथ खडसे यांना या मेळाव्यात पक्षाने व्यासपीठावर स्थान दिले; परंतु त्यांना भाषणाची संधी मात्र मिळाली नाही. चिमटे काढत बोलण्याच्या शैली, आक्रमकपणाबद्दल खडसे प्रसिद्ध असून, भाजपात त्यांना मानणारा वर्ग आहे. असे असतानाही खडसे यांना ‘मन मोकळे’ करण्याची संधी देण्यात आली नाही. मंत्रिपद काढून घेतल्यापासून खडसे नाराज आहेत. अधूनमधून ते स्वपक्षाला अडचणीत आणणारी विधानेही करतात. त्यांना पक्षाने सबुरीचा सल्लाही दिला; परंतु त्यांची नाराजी कमी झाली नाही. त्यामुळेच कदाचित आयोजकांनी खडसे यांना बोलण्याची संधी दिली नसावी, अशी चर्चा रंगलीहोती.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे