शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

जलसंपदा विभागाच्या आडून नाशिककरांची अडवणूक कोण करतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 23:00 IST

नाशिक : थकबाकी आणि पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कराराचे निमित्त करून नाशिक शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे जलसंपदा विभागामार्फत घाटत आहे. दोन शासकीय खात्यांमधील वाद नवा नाही तो अनेकदा आढळतो. मात्र नाशिकमध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ज्या अहमहमिकेने महापालिकेवर आणि पर्यायाने नाशिककरांवर कारवाई करण्याचे घाटत आहे, ते बघता या कारवाईच्या आग्रहामागे नक्की कोण आहे? आणि काेणाला राजकीय स्वारस्य आहे? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

ठळक मुद्दे जलकरार रखडला हे निमित्त आता पाणी तोडण्यावर भरसत्ता बदलताच अधिकाऱ्यांच्या भूमिकेतही बदल?

संजय पाठक, नाशिक : थकबाकी आणि पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कराराचे निमित्त करून नाशिक शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे जलसंपदा विभागामार्फत घाटत आहे. दोन शासकीय खात्यांमधील वाद नवा नाही तो अनेकदा आढळतो. मात्र नाशिकमध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ज्या अहमहमिकेने महापालिकेवर आणि पर्यायाने नाशिककरांवर कारवाई करण्याचे घाटत आहे, ते बघता या कारवाईच्या आग्रहामागे नक्की कोण आहे? आणि काेणाला राजकीय स्वारस्य आहे? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

नाशिक आणि नगरचा पाणी संघर्ष अनेक वर्षे गाजला मात्र मेेंढगिरी समितीच्या अहवालानंतर वरील बाजूने नाशिक आणि नगरचे पाणी जायकवाडीला सोडण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर अगदी या संदर्भात उच्च न्यायालयाने सांगून त्याची फेरसमिक्षा झालेली नाही. त्यातच आता जलसंपदा विभागाकडून दरवर्षीच पाणी कपात तर कधी थकबाकी तर कधी आरक्षणाला मंजुरी न देण्याचे प्रकार करून कायम दडपवण्याचा प्रयत्न होत आहे.

एखाद्या शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी करार न होणे खरे तर हा खूप मोठा वादाचा मुद्दा आहे, असे नाही. मात्र तो जाणीवपूर्वक झुलवत ठेवण्यात जलसंपदा विभागाचे स्वारस्य आहे, अशी शंका निर्माण झाली आहे. त्याचे कारण म्हणजे एकीकडे नाशिक महापालिकेशी जलसंपदा विभाग करार करत नाही आणि दुसरीकडे करार होत नाही म्हणून पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये पाणीपुरवठा तोडण्याची धमकीही दिली जात आहे.

मुळात प्रश्नाची सुरुवात झाली ती २००७ पासून ! नाशिक शहराची केंद्र शासनाच्या नेहरू अभियानाअंतर्गत निवड झाल्यानंतर शहराची भविष्यकालीन म्हणजेच २०४१ साली असणारी संभाव्य

लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठ्याची योजना आखण्याचे महापालिकेने ठरवले. त्यानुसार भविष्यकाळात लागणारे पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठी जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यावेळी तो मंजूर करताना शहरासाठी महापालिकेनेचे किकवी धरण बांधावे असे ठरवण्यात आले. त्यामुळे बांधित होणाऱ्या सिंचन क्षेत्राची भरपाई करण्यासाठी नाशिक महापालिकेला सुमारे दीडशे कोटी रुपयांची रक्कम मागण्यात आली. मात्र, त्यानंतर किकवी धरण महापालिकेऐवजी शासनाने बांधण्याचे ठरले. आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाल्याचे आराेप झाले आणि नंतर अलीकडच्या फडणवीस सरकारने हे धरण बांधण्यासाठी मागविलेल्या निविदाच रद्द केल्या. धरण बांधले गेले नाही, मात्र त्या पोटी लागणारा सिंचन पुनर्स्थापनेचे जे भूत नाशिक महापालिकेच्या मानगटीवर जलसंपदा विभागाने बसवले ते मात्र अद्याप उतरलेले नाही आणि ही रक्कम भरत नाही म्हणून जलसंपदा विभाग महापालिकेशी करार करीत नाही. आणि करार झाला नाही म्हणून महापालिकेला दुप्पट दराने पाणी आकारते आहे. महापालिकेच्या दृष्टिकेानातून त्यांना थकबाकी अमान्य असल्याने केवळ थकबाकी भरली नाही म्हणून पाण्याचे दुप्पट दर अमान्य असल्याने ते नियमित दरानेच पाणीपट्टी भरत आहे. परंतु यावर तोडग्याची कोणतीही इच्छा नसलेल्या जलसंपदा विभागाने दुप्पट दरानुसार महापालिका जी रक्कम भरत नाही तीदेखील थकबाकीत दाखवून व्याजावर व्याज आकारणे सुरूच ठेवले असून ही रक्कम २७ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात या वादावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक घेतली आणि वादाच्या थकबाकीचे मुद्दे शासन स्तरावर पाठवावेत केवळ वार्षिक पाणीपुरवठ्याचा करार करून घ्यावा, असे आदेशित केले. जलसंपदामंत्री भाजपचे होते आणि महापालिकेत सत्ताही भाजपचीच. त्यामुळेच की काय, त्यावेळी होकार भरणाऱ्या अधिकाऱ्यांनी सत्तांतर होताच आपली भूमिका बदलली असून, पुन्हा आधी थकबाकी भरा, मग करार अशी भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे तर पाणीपुरवठा करार तोडण्याचीदेखील नोटीस बजावली आहे. सत्तांतर झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या बदलेल्या भूमिका ठिक, परंतु शासकीय अधिकाऱ्यांनीदेखील त्यात सहभागी झाल्यासारखे वागावे हे विशेष होय आणि तसे नसेल तर महापालिकेत भाजपची सत्ता आहे, म्हणून नाशिककरांना वेठीस धरले जातेय काय याचादेखील शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाState Governmentराज्य सरकारGirish Mahajanगिरीश महाजन