शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पटकू शकणारा उमेदवार कोण?

By किरण अग्रवाल | Updated: January 13, 2019 01:46 IST

लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. ‘युती’ची अनिश्चितताही दिवसेंदिवस वाढत असून, ‘पटक देंगे’च्या भाषेमुळे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पण समोरच्यांना पटकायचे तर तसा उमेदवार व प्राथमिक तयारीही हवी. स्थानिक पातळीवर भाजपात ती दिसत नाही. अन्यपक्षीय संभाव्य उमेदवार कामालाही लागले असताना भाजपात सारीच अनिश्चिततेची स्थिती आहे. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, पटकणार कसे?

ठळक मुद्देशिवसेना-भाजपातील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे.लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाला व संभाव्य उमेदवाराला  पूर्वीपासूनच राजकीय मशागत करावी लागते.समोरच्या पक्षांमधील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित असल्यासारखी आहेत, म्हणून भाजपातील अनिश्चिती चर्चेला निमंत्रण देणारी ठरली आहे.मर्यादा भाजपादेखील जाणून आहे. म्हणूनच तर शिवसेना तुटेस्तोवर ताणत असतानाही भाजपा आशावादी राहून सारे सहन करीत आहे.

सारांशयुती झाली नाही तर शिवसेनेलाही ‘पटक देंगे’ची भाषा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केली असली तरी, शिवसेना असो की काँग्रेस आघाडी, प्रतिस्पर्धींना खरेच पटकू शकणारे स्वबळाचे उमेदवार सर्वच ठिकाणी भाजपाकडे असल्याचे दिसत नाही. नाशकातही तीच स्थिती आहे. म्हणायला नावे अनेक चर्चिली जात आहेत; पण समोरच्या जवळपास निश्चित मानल्या जाणाऱ्या नावांच्या तुलनेत भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची तयारी फारशी आढळत नाही. त्यामुळेच ऐनवेळचा उमेदवार समोरच्याला पटकू शकेल का, याबाबत चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे.शिवसेना-भाजपाची ‘युती’ घडून येईल असे म्हणता म्हणता उभयतांतील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. त्यात अलीकडील भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ‘पटक देंगे’ विधानाने भरच पडली आहे. कारण, हे साधे-सरळ विधान नाही; सोबत न आल्यास एकप्रकारे पाहून घेण्याचीच ती धमकी आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणखीनच इरेला पेटल्यासारखी विधाने करीत आहेत. परिणामी काडीमोड गृहीत धरला जात आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन नाशकात आले असता त्यांनीही याबाबत स्पष्टता केली आहे. ‘युतीसाठी शिवसेनेचा हात धरून ओढणार नाही, आपल्या पक्षाची निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे’, असे महाजन यांनी सांगितले; पण तयारी झाली म्हणजे कसली? पक्षाचा एकमुखी उमेदवार म्हणता यावा असे एकही नाव समोर नसताना पक्षाध्यक्षांचा ‘पटक देंगे’चा विश्वास सार्थ ठरवायचा तर ते जामनेर नगरपालिकेचे मैदान मारण्याएवढे सहज-सोपे थोडे आहे?लोकसभा मतदारसंघाचा आवाका मोठा असल्याने त्यासाठी कोणत्याही पक्षाला व त्याच्या संभाव्य उमेदवाराला प्रत्यक्ष निवडणुकीच्या व आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वीपासूनच राजकीय मशागत करावी लागते. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी ३ विधानसभा मतदारसंघ भाजपेतर पक्षांकडे आहेत. यात नाशिकरोड-देवळाली, सिन्नर व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व काँग्रेसचे प्राबल्य पाहता तिथे भाजपाला अधिक मेहनत घ्यावी लागेल; परंतु ‘युती’ची अनिश्चितता असल्याने व ती न झाल्यास उमेदवारीच्या निश्चितीचीही शाश्वती नसल्याने आज घडीला कोणीही पुढे होऊन काही करताना दिसत नाही. ‘युती’ फिसकटलीच व पक्षाने सांगितले तर लढून घेऊ, अशा मानसिकतेने संभाव्य उमेदवारांचा वावर सुरू आहे. लढायचेच म्हणून स्वबळाने लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणारे नाव भाजपात कुणाकडूनही पुढे केले जात नाही. ‘हे’ही असू शकतात, त्यांचीही चर्चा आहे, असेच सारे सुरू आहे. त्यामुळे कुणाच्याही नावाचा ऐनवेळी विचार झाला तर त्यातून त्यांची धावपळ उडणे क्रमप्राप्त ठरेल.तुलनेत समोरच्या पक्षांमधील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित असल्यासारखी आहेत, म्हणून भाजपातील अनिश्चिती चर्चेला निमंत्रण देणारी ठरली आहे. ‘युती’ होवो अगर न होवो, शिवसेनेच्या उमेदवारीबाबत कुणी शंका घेताना दिसत नाही. त्याखेरीज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला असून, त्या महाआघाडीची उमेदवारीही काकांना की पुतण्याला, एवढाच निर्णय बाकी असल्यासारखे आहे. नावे घ्यायला त्या त्या पक्षांतही अनेकांची नावे चघळली जातात; परंतु एकेका जागेसाठी प्रत्येकच पक्षांकडून कसली जात असलेली कंबर पाहता; धोका पत्करायची कुणाचीही तयारी नाही. पक्षाच्या पाठबळाखेरीज उमेदवाराचे स्वबळ व ‘इलेक्टिव्ह मेरिट’मध्ये गणल्या जाणाºया सर्व बाबींची पूर्तता करू शकणाºयासच कोणताही पक्ष रिंगणात उतरवेल. त्यादृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादीतील नावे निश्चित असल्यासारखी असून, संबंधितांनी वैयक्तिक पातळीवर आपापली तयारी सुरू करून दिल्याचेही प्रकर्षाने दिसून येत आहे. पक्षांतर्गत उपक्रम व सार्वजनिक कार्यक्रमांमधील संबंधितांचा वावर यातून तर ते जाणवतेच, शिवाय, व्यूहरचनेची त्यांनी चालविलेली तयारीही त्याबाबतचा संकेत देऊन जाते.या पार्श्वभूमीवर, अगोदरपासूनच कामास लागलेल्या अन्य पक्षीय उमेदवारांशी टक्कर घ्यायची व त्यांना पटकून द्यायचे ध्येय गाठायचे तर त्यासाठी पूर्व तयारीही हवीच. बरे, आता पूर्वीसारखी म्हणजे गेल्या खेपेसारखी स्थिती राहिलेली नाही हेही एव्हाना स्पष्ट झाले आहे. मोदी यांनी येऊन ‘मित्रो, भाईयो और बहनो...!’ म्हटले म्हणजे झाले, असे होणार नाही. या मर्यादा भाजपादेखील जाणून आहे. म्हणूनच तर शिवसेना तुटेस्तोवर ताणत असतानाही भाजपा आशावादी राहून सारे सहन करीत आहे. तेव्हा, प्रश्न इतकाच की; खरेच पटकून देण्याच्या इराद्याने लढायची वेळ आली तर भाजपाचा असा पटकू शकणारा उमेदवार कोण? 

टॅग्स :PoliticsराजकारणParliamentसंसदElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना