शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पोषण कुणाचे?

By किरण अग्रवाल | Updated: March 18, 2018 01:44 IST

शासनाने कितीही योजना आखल्या आणि निधीची उपलब्धता करून दिली तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावर किंवा आश्वासनांपुरतेच उरते, याचा अनुभव तसा वारंवार येतच असतो; जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांबाबतही तेच होताना दिसत आहे.

ठळक मुद्देयंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावरदुर्लक्ष करणा-या घटकांची जबाबदारीही निश्चित करण्याची गरज आहे.

शासनाने कितीही योजना आखल्या आणि निधीची उपलब्धता करून दिली तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावर किंवा आश्वासनांपुरतेच उरते, याचा अनुभव तसा वारंवार येतच असतो; जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांबाबतही तेच होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण तब्बल अडीच हजार इतके असल्याचे व त्यात तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या सहाशेपेक्षा अधिक असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत पुढे आली असून, शासनाच्या यासंदर्भातील विविध योजना व जिल्हा परिषदेचे प्रयत्न कसे कुचकामी ठरले आहेत, तेच त्यातून स्पष्ट होऊन गेले आहे. कुपोषण टाळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांच्या योजना आखल्या आहेत, पण त्याची सक्षमतेने अंमलबजावणी होत नाही. कागदपत्रे रंगविण्याखेरीज वास्तविकतेकडे लक्षच दिले जात नसल्याने अशी परिस्थिती ओढवते तेव्हा यानिमित्ताने कुपोषण टाळण्यासाठी नेमके काय केले गेले, किती खर्च झाला याचे आॅडिट होणे गैर ठरू नये. कारण निधी खर्ची पडूनही परिस्थिती सुधारली नसेल किंवा कुपोषण टळले नसेल तर त्यातून भलत्याचेच तर पोषण झाले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होणारा आहे. कुपोषण रोखण्यासाठी जो पूरक पोषण आहार दिला जातो, तो गेल्या दोनेक वर्षांपासून दिला गेलेला नसल्याचेही वृत्त आहे. ते खरे असेल तर या दप्तर दिरंगाईला कोण जबाबदारयाचाही सोक्षमोक्ष होणे गरजेचे आहे. अन्यथा म्हातारी मेल्याचे दु:ख नसते, पण काळ सोकावण्याचा धोका असतो; तसे व्हायचे. बालकांच्या कुपोषणाबरोबरच मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबतची स्थितीही यापेक्षा फार काही वेगळी नाही. आदिवासी भागातील बालकांचे प्रसूतीदरम्यानच होणारे निधन हा तसा चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे, आदिवासी भागातल्या यासंदर्भातल्या अडचणी एकवेळ समजूनही घेतल्या तरी बिगर आदिवासी प्रकल्पांमध्ये अती गंभीर कुपोषित बालकांची संख्या पावणे तिनशेच्या आसपास निघावी, हे अधिकच गंभीर आहे. आरोग्य, बालकल्याण विभाग किती बेफिकिरीने कामकाज करतो आहे, हेच दाखविणारी ही आकडेवारी आहे. तेव्हा ग्राम बालविकास केंद्र उघडून यावर उपाय योजतांनाच आजवर याकडे दुर्लक्ष करणाºया घटकांची जबाबदारीही निश्चित करण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद