शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या नाशकात राष्टÑवादी उरली कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:18 IST

नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती पक्षाची झाली आहे काय, असा प्रश्न नाशिककरच स्वत:ला विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देदोलायमान स्थिती : तीनही मतदारसंघात आयारामांना दिली संधी

नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती पक्षाची झाली आहे काय, असा प्रश्न नाशिककरच स्वत:ला विचारू लागले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात केवळ एकदाच प्रतिनिधित्व केलेल्या भुजबळ काका-पुतण्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे तर विधानसभा निवडणुकीत गेल्या दोन दशकात राष्टÑवादी नाशिक ग्रामीणमधून थोडेबहुत यश मिळवित असताना शहरात मात्र आपली मांड घट्ट बसवू शकलेली नाही. आताही विधानसभा निवडणुकीत शहरातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये आयारामांना पावन करून घेण्याची वेळ राष्टÑवादीवर ओढवली आहे.१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्टÑवादीचे चार आमदार निवडून आले होते. नाशिक शहरात भाजपचे डॉ. दौलतराव अहेर विरुद्ध राष्टÑवादीचे डॉ. वसंत पवार असा सामना झाला; परंतु त्यात भाजपने बाजी मारली होती. २००४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या आमदारांची संख्या एकाने वाढली. निफाडमधून दिलीप बनकर, येवल्यातून छगन भुजबळ, चांदवडमधून उत्तम भालेराव, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तर कळवणमधून ए. टी. पवार विजयी झाले होते. नाशिक शहरातील मतदारसंघातून कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये मात्र राष्टÑवादीला झटका बसत तीनच आमदार निवडून आले. त्यात नांदगाव, कळवण आणि येवल्याचा जागेचा समावेश होता. आघाडीमुळे नाशिक शहरातील नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य कॉँग्रेसला तर नाशिक पश्चिम आणि देवळाली हे मतदारसंघ राष्टÑवादीला सोडण्यात आले होते; परंतु राष्टÑवादीचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. २०१४ मध्ये आघाडी दुभंगल्यामुळे राष्टÑवादीने स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यात राष्टÑवादीने नांदगाव, येवला, बागलाण आणि दिंडोरी या जागांवर विजय मिळविला. नाशिक शहरातील चारही जागांवर उमेदवार दिले; परंतु त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर टिकाव लागू शकला नाही.गेल्या पाच वर्षांत छगन भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांच्या तुरुंगवारीमुळे राष्टÑवादीची मोठी वाताहत झाली. मागील लोकसभा निवडणुकीत स्वत: छगन भुजबळ यांना तर चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांचा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातून राष्टÑवादीकडून सेना-भाजपला कडवी लढत दिली जाण्याचे संकेत मिळत होते; परंतु इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराची चर्चाही कानावर पडत नव्हती. सेना-भाजपचे उमेदवार निश्चित होत असताना राष्टÑवादी चाचपडतानाच दिसून आली. विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक मध्य राष्टÑवादीने कॉँग्रेसला सोडला तर अन्य तीन मतदारसंघात आयारामांना संधी दिली आहे. त्यात नाशिक पूर्वमध्ये भाजपने तिकीट कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांना तर देवळालीमधून भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांना राष्टÑवादीने उमेदवारी बहाल केली.नाशिक पश्चिममध्ये वर्ष-दीड वर्षापूर्वीच भाजपतून राष्टÑवादीत आलेल्या अपूर्व हिरे यांच्या अर्जाला शेवटच्या क्षणी एबी फॉर्म जोडण्याची नामुष्की ओढवली. त्यापूर्वी, खुद्द भुजबळ यांनीच नाशिक पश्चिम मतदारसंघ माकपाला सोडण्याचे जाहीर केले होते; परंतु त्यांनाही ऐनवेळी यू टर्न घ्यावा लागला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019