शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

भुजबळांच्या नाशकात राष्टÑवादी उरली कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:18 IST

नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती पक्षाची झाली आहे काय, असा प्रश्न नाशिककरच स्वत:ला विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देदोलायमान स्थिती : तीनही मतदारसंघात आयारामांना दिली संधी

नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती पक्षाची झाली आहे काय, असा प्रश्न नाशिककरच स्वत:ला विचारू लागले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात केवळ एकदाच प्रतिनिधित्व केलेल्या भुजबळ काका-पुतण्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे तर विधानसभा निवडणुकीत गेल्या दोन दशकात राष्टÑवादी नाशिक ग्रामीणमधून थोडेबहुत यश मिळवित असताना शहरात मात्र आपली मांड घट्ट बसवू शकलेली नाही. आताही विधानसभा निवडणुकीत शहरातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये आयारामांना पावन करून घेण्याची वेळ राष्टÑवादीवर ओढवली आहे.१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्टÑवादीचे चार आमदार निवडून आले होते. नाशिक शहरात भाजपचे डॉ. दौलतराव अहेर विरुद्ध राष्टÑवादीचे डॉ. वसंत पवार असा सामना झाला; परंतु त्यात भाजपने बाजी मारली होती. २००४ च्या निवडणुकीत राष्टÑवादीच्या आमदारांची संख्या एकाने वाढली. निफाडमधून दिलीप बनकर, येवल्यातून छगन भुजबळ, चांदवडमधून उत्तम भालेराव, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तर कळवणमधून ए. टी. पवार विजयी झाले होते. नाशिक शहरातील मतदारसंघातून कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये मात्र राष्टÑवादीला झटका बसत तीनच आमदार निवडून आले. त्यात नांदगाव, कळवण आणि येवल्याचा जागेचा समावेश होता. आघाडीमुळे नाशिक शहरातील नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य कॉँग्रेसला तर नाशिक पश्चिम आणि देवळाली हे मतदारसंघ राष्टÑवादीला सोडण्यात आले होते; परंतु राष्टÑवादीचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. २०१४ मध्ये आघाडी दुभंगल्यामुळे राष्टÑवादीने स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यात राष्टÑवादीने नांदगाव, येवला, बागलाण आणि दिंडोरी या जागांवर विजय मिळविला. नाशिक शहरातील चारही जागांवर उमेदवार दिले; परंतु त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर टिकाव लागू शकला नाही.गेल्या पाच वर्षांत छगन भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांच्या तुरुंगवारीमुळे राष्टÑवादीची मोठी वाताहत झाली. मागील लोकसभा निवडणुकीत स्वत: छगन भुजबळ यांना तर चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांचा शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातून राष्टÑवादीकडून सेना-भाजपला कडवी लढत दिली जाण्याचे संकेत मिळत होते; परंतु इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराची चर्चाही कानावर पडत नव्हती. सेना-भाजपचे उमेदवार निश्चित होत असताना राष्टÑवादी चाचपडतानाच दिसून आली. विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक मध्य राष्टÑवादीने कॉँग्रेसला सोडला तर अन्य तीन मतदारसंघात आयारामांना संधी दिली आहे. त्यात नाशिक पूर्वमध्ये भाजपने तिकीट कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांना तर देवळालीमधून भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांना राष्टÑवादीने उमेदवारी बहाल केली.नाशिक पश्चिममध्ये वर्ष-दीड वर्षापूर्वीच भाजपतून राष्टÑवादीत आलेल्या अपूर्व हिरे यांच्या अर्जाला शेवटच्या क्षणी एबी फॉर्म जोडण्याची नामुष्की ओढवली. त्यापूर्वी, खुद्द भुजबळ यांनीच नाशिक पश्चिम मतदारसंघ माकपाला सोडण्याचे जाहीर केले होते; परंतु त्यांनाही ऐनवेळी यू टर्न घ्यावा लागला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019