शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

 निवडणुकीसाठी पैसे कोठून आणले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:43 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी संपुष्टात येत नाही तोच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दुष्काळाच्या प्रश्नावर मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले व जिल्हा बँकेकडून शेतकºयांच्या कर्जाची सक्तीने केल्या जात असलेल्या वसुलीचा मुद्दा घेऊन जिल्हा प्रशासनाच्या पुढ्यात गेल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत.

ठळक मुद्देबँकेच्या थकबाकीवरून भुजबळ-आहेरांत जुंपली

नाशिक : लोकसभा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी संपुष्टात येत नाही तोच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दुष्काळाच्या प्रश्नावर मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले व जिल्हा बँकेकडून शेतकºयांच्या कर्जाची सक्तीने केल्या जात असलेल्या वसुलीचा मुद्दा घेऊन जिल्हा प्रशासनाच्या पुढ्यात गेल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कारखान्याकडेही जिल्हा बॅँकेचे १७ कोटी रुपये थकले असून, त्याचा संदर्भ देत बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी, भुजबळांकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे आहेत मग कर्ज भरण्यासाठी नाहीत काय? असा सवाल करून भुजबळांभोवती फास टाकला आहे.दुसरीकडे राष्टÑवादीच्या माजी खासदारांची मालमत्ता जप्त करण्याचे सूतोवाच करून राजकारणाला तोंड फोडले आहे.छगन भुजबळ यांनी दुष्काळी दौरा करून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून, त्याचाच एक भाग म्हणून शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन पाणी, चाराटंचाईच्या प्रश्नाबरोबरच भाजपाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बॅँकेने दुष्काळी परिस्थितीतही शेतकºयांकडे सक्तीने वसुली सुरू केल्याबद्दल प्रशासनाकडे तक्रार केली आहे. भुजबळ यांच्या या तक्रारीला शेतकरी संघटनेने पुष्टी देत त्यांनीही जिल्हा बॅँकेच्या विरोधात तक्रार करून सक्तीची वसुली न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या थकबाकी वसुलीचा मुद्दा आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय मुद्दा झाला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्हा बॅँकेने बचावाचा पवित्रा घेत, थेट भुजबळांनाच लक्ष्य केले आहे.भुजबळ यांच्यावरील कर्जवसुलीसाठी बॅँकेने पावले उचलताच त्यांनी तडजोडीसाठी बॅँकेशी पत्रव्यवहार केला, परंतु थकबाकी मात्र भरली नाही. आता भुजबळ त्यांच्या विरुद्धची कारवाई टाळण्यासाठी शेतकºयांना पुढे करून स्वत:चे थकीत कर्ज वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आहेर यांनी केला आहे.एवढ्यावरच आहेर थांबले नाहीत, तर राष्टÑवादीचे माजी आमदार देवीदास पिंगळे यांच्या आनंद अ‍ॅग्रो कंपनीकडे असलेली बॅँकेची थकबाकी वसुलीसाठी त्यांची मालमत्ताही जप्त करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेची थकबाकी वसुलीच्या निमित्ताने जिल्ह्णात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकारण पेटले असून, बॅँकेच्या सक्तीच्या वसुलीच्या विरोधात जिल्हा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी फेडरेशननेही पुढाकार घेतला आहे. सोमवारी फेडरेशनने बैठक बोलाविली असून, बॅँकेच्या विरोधात करावयाच्या आंदोलनाची रूपरेषा त्यादिवशी जाहीर करण्यात येणार आहे. एकूणच बॅँकेची वसुली आता शेतकºयांपुरता मर्यादित न राहता, त्यात राजकारण डोकावू लागले आहे. भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉँग कंपनीकडे बॅँकेचे १७ कोटी रुपये थकले आहेत. त्याचा संदर्भ देत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी, भुजबळ यांना निवडणूक लढविण्यासाठी पैसे आहेत मग बॅँकेची थकबाकी भरण्यासाठी पैसे नाहीत काय असा सवाल विचारला आहे.