शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

हिरवाई गेली कुठे?

By किरण अग्रवाल | Updated: April 22, 2018 01:02 IST

मे महिन्याला अजून अवकाश आहे; पण एप्रिलमध्येच उन्हाने घाम फोडला असून, पारा चाळिशी पार करून गेला आहे. या तपमानवाढीला वृक्षतोड कारणीभूत ठरल्याची बाब एकीकडे चर्चिली जात असताना, दुसरीकडे लाखोंच्या संख्येत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पार पाडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मग एवढे वृक्ष खरेच लावले गेले असतील तर हिरवाई गेली कुठे व उन्हाचा चटका का बसतोय, असे प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.

ठळक मुद्दे वृक्ष खरेच लावले गेले असतील तर हिरवाई गेली कुठे व उन्हाचा चटका का बसतोय,सरकारी यंत्रणा अमुक लाख व तमुक लाख झाडे लावल्याच्या आकडेवारीतच समाधान शोधताना दिसत आहेआकड्यांची फेकाफेक निव्वळ कागदे रंगविण्यापुरती

मे महिन्याला अजून अवकाश आहे; पण एप्रिलमध्येच उन्हाने घाम फोडला असून, पारा चाळिशी पार करून गेला आहे. या तपमानवाढीला वृक्षतोड कारणीभूत ठरल्याची बाब एकीकडे चर्चिली जात असताना, दुसरीकडे लाखोंच्या संख्येत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पार पाडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मग एवढे वृक्ष खरेच लावले गेले असतील तर हिरवाई गेली कुठे व उन्हाचा चटका का बसतोय, असे प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये. वाढत्या नागरिकरणामुळे सिमेंटची जंगले वाढत असून, वृक्षतोड होत असल्याचे उघड्या डोळ्यांना दिसणारे आहे. त्यामुळेच उन्हाचा चटकाही तीव्रतेने बसू लागला आहे. परंतु सरकारी यंत्रणा अमुक लाख व तमुक लाख झाडे लावल्याच्या आकडेवारीतच समाधान शोधताना दिसत आहे. सांगितले जात असल्याप्रमाणे अशी लाखो वृक्षांची लागवड झाली असेल असे घडीभर मान्य केले तरी, त्यातली जगली-वाढली किती असा प्रश्न आहे. राज्य सरकारने २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातील १३ कोटी यंदा चालू वर्षात लावले जाणार आहेत, असे खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शासनाच्या या उद्दिष्टांतर्गत नाशिक जिल्ह्याला यंदा वाढीव पाच लाख वृक्षांसह एकूण ७७ लाख ५० हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट दिले गेले आहे. गेल्यावर्षी ते ७२ लाख इतके होते. उद्दिष्टाची ही आकडेवारी लाखालाखात असली तरी लागवड केलेल्या वृक्षांपैकी किती जगले याची निश्चित आकडेवारी काही उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळे ही आकड्यांची फेकाफेक निव्वळ कागदे रंगविण्यापुरती असल्याचेच स्पष्ट होऊन जाणारे आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील उद्दिष्ट लक्षात घेता एप्रिलअखेरपर्यंत वृक्षांसाठीचे खड्डे खणण्याचे काम पूर्णत्वास नेण्याचे निर्देशही अलीकडेच वनमंत्र्यांनी दिले आहेत. तेव्हा त्यासाठी शिल्लक असलेला कमी कालावधी पाहता हा खड्डे खणण्यासाठीचा निधी ‘खड्ड्यातच’ गेलेला दिसून आला तर आश्चर्य वाटू नये. मुळात दरवर्षीच अशी लाखोंच्या प्रमाणात वृक्ष लागवड होत असल्याचे सरकारी कागद बोलतात. तसे असेल तर, म्हणजे खरेच तितक्या प्रमाणात वृक्षलागवड झाली असेल तर राज्यात आतापर्यंत जिकडे तिकडे जंगलच जंगल दिसायला हवे होते. तसे झाले असते तर जंगलातील बिबटे मानव वस्तीत कशाला आले असते? पण, सारा आकड्यांचा खेळ आहे. केंद्र सरकारच्या फॉरेस्ट सर्व्हेनुसार महाराष्ट्रात वनविभागाखेरीजची वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, राज्याचा नंबर देशात पहिला आला आहे, ही आनंदाचीच बाब आहे. ढासळते पर्यावरण सावरण्यासाठी वृक्षलागवडीखेरीज पर्याय नाहीच. हे खरेच; परंतु झेपेल तितके व प्रामाणिकपणे पार पाडता येईल असेच उद्दिष्ट त्यासाठी ठेवायला काय हरकत आहे? तसे होत नाही म्हणूनच ‘फेकाफेकी’ची वेळ येताना दिसते.

टॅग्स :Governmentसरकारforest departmentवनविभाग