शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

केळझरच्या चारीचे घोडे अडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:17 IST

निवडणूक कोणतीही असो, वीरगाव परिसरातील जनतेला दरवेळी हमखास एक आमिष दाखविले जाते, ते म्हणजे केळझर चारी क्रमांक ८ च्या काम पूर्णत्वाचे. विशेष म्हणजे, अनेक पंचवार्षिक निवडणुका उलटूनही हे काम १५ वर्षांपासून अपूर्णच आहे. कामासाठी प्रत्यक्ष ना निधी उपलब्ध होतो, ना कामाला गती मिळते. वेळोवेळी निधी उपलब्ध झाल्याचे सांगून याप्रश्नी फक्त आपला स्वार्थ साधून घेण्याचेच काम लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून या कामाचे घोडे अडले कोठे, असा सवाल विचारला जात आहे.

वीरगाव : निवडणूक कोणतीही असो, वीरगाव परिसरातील जनतेला दरवेळी हमखास एक आमिष दाखविले जाते, ते म्हणजे केळझर चारी क्रमांक ८ च्या काम पूर्णत्वाचे. विशेष म्हणजे, अनेक पंचवार्षिक निवडणुका उलटूनही हे काम १५ वर्षांपासून अपूर्णच आहे. कामासाठी प्रत्यक्ष ना निधी उपलब्ध होतो, ना कामाला गती मिळते. वेळोवेळी निधी उपलब्ध झाल्याचे सांगून याप्रश्नी फक्त आपला स्वार्थ साधून घेण्याचेच काम लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून या कामाचे घोडे अडले कोठे, असा सवाल विचारला जात आहे.  केळझर धरणाच्या निर्मितीनंतर या धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणात शेती व पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, हे आरक्षित पाणी शेती क्षेत्रात पोहोचविण्यासाठी डाव्या व उजव्या कालव्यांची निर्मिती करण्यात आली. याच अनुषंगाने केळझर ते डोंगरेज या गावादरम्यान डाव्या कालव्याची निर्मिती करण्यात आली असून, याचा फायदा पश्चिम भागातील आठ ते दहा गावांतील शेतीला होतो आहे. या कालव्याच्या पूर्णत्वानंतर यापुढील वीरगाव, वनोली, भंडारपाडे, तरसाळी, औंदाणे, कौतिकपाडे, भाक्षी, मुळाणे या गावांनाही सिंचनाचा लाभ व्हावा यासाठी डोंगरेज गावापासून पुढील भागात नूतन कालव्याची निर्मिती केली जावी अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गातून पुढे आली होती. तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांनी या मागणीची दखल घेत सन १९९९ साली युती शासनाच्या कालावधीत डोंगरेज ते मुळाणे या १०.४४ किमीच्या वाढीव केळझर चारी क्र. ८ च्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून आणली होती. या चारीच्या मातीकामासाठी त्यावेळी तत्काळ आर्थिक तरतूद होऊन या कालव्याचे सर्वेक्षण, भूसंपादन मोबदला व सुमारे ६५ टक्के मातीकाम पूर्ण करण्यात आले. सन २०१३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन संबंधित विभागाकडून करण्यात आले होते; मात्र शेतकरी वर्गाकडून खोदकामात अनेक ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या अडचणी व शासन पातळीवरून निधीची कमतरता यामुळे हे काम आजही वर्षानुवर्षे रेंगाळतानाच दिसून येत आहे. केळझर धरण पावसाळ्यात भरल्यानंतर डाव्या कालव्याअंतर्गत दरवर्षी डोंगरेज या गावापर्यंत पूरपाणी तसेच शेतीसाठी आवर्तीत पाणी उपलब्ध होत असते. पूरपाण्याने या भागातील छोटे-मोठे बंधारे भरून घेतले जात असल्याने डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला याचा मोठा लाभ होतो आहे. मात्र डोंगरेज गावापासून पुढे असलेल्या चारी क्र. ८ च्या अपूर्णावस्थेतील कामामुळे अगदी बांधापर्यंत पूरपाणी पोहोचूनही पुढील गावातील शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने या भागातील शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.  गेल्या १५ वर्षांपासून येथील शेतकरी चारीच्या कामाच्या पूर्णत्वाची आस लावून बसला आहे. लोकसभा, विधानसभा वा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या की प्रत्येकवेळी हा प्रश्न उचलून धरला जातो. ‘मला निवडून द्या, आमच्या पक्षाला निवडून द्या, तत्काळ चारी क्र मांक ८ च्या कामाला सुरुवात करू’ अशी आश्वासने दिली जातात; मात्र निवडणुका झाल्या की पुढील निवडणुकीपर्यंत एकही लोकप्रतिनिधी या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नाही. या प्रश्नावर फक्त राजकारण होत असल्याचा आरोप लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गाने केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गत काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंचन कामांबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात बागलाण तालुक्यातील अपूर्ण असलेल्या सिंचन योजनांच्या कामांबाबत खासदार भामरे यांनी ऊर्ध्व गोदावरी खोºयाच्या अधिकारी वर्गाची झाडाझडती घेत कामकाजाबाबत जोरदार ताशेरे ओढले होते. यानंतर या कामासह तालुक्यातील अन्य सिंचन योजनांसाठी कोट्यवधी रु पयांचा निधी मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. कामात अडचणी येणाºया ठिकाणी समझोत्यातून, प्रसंगी बळाचा वापर करून कामे पूर्ण केली जावी, असे आदेश देण्यात आले होते.