शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘नंदिनी’ कधी मोकळा श्वास घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:13 IST

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही नंदिनी नदीच्या पात्राने मोकळा श्वास घेतला नाही. त्यामुळे महापालिका दुर्घटना होण्याची वाट पाहते का असा प्रश्न नागरिक करीत असून, सालाबादप्रमाणे यंदाही महापालिका फक्त नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देपावसाळा तोंडावर । दुतर्फा अतिक्रमण कायम; नागरिक त्रस्त

इंदिरानगर : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही नंदिनी नदीच्या पात्राने मोकळा श्वास घेतला नाही. त्यामुळे महापालिका दुर्घटना होण्याची वाट पाहते का असा प्रश्न नागरिक करीत असून, सालाबादप्रमाणे यंदाही महापालिका फक्त नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबई नाका ते शिवाजीवाडी दरम्यान, नंदिनी नदीचे पात्र दिवसागणिक वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे अरुंद होत चालले आहे. भारतनगर, शिवाजीवाडी व नंदिनीनगर या परिसरात सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी बोटावर मोजण्याइतकी घरे आणि झोपड्या होत्या, परंतु शहरातून विविध भागातून अतिक्रमण विभागाने झोपड्या हटवल्या की त्या तातडीने या परिसरात वसल्या जाऊ लागल्याने आजमितील शेकडो झोपड्या नदीच्या दुतर्फा वसल्या आहेत.मनपाच्या सुमारे सहा एकर जागेतसुद्धा संपूर्णपणे झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. सिंहस्थापूर्वी वडाळा-पाथर्डी रस्ता ते भारतनगर या रस्त्याच्या दुतर्फा आणि रस्ता रुंदीकरण डांबरीकरणास अडथळा ठरणाºया सुमारे साडेसहाशे अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या होत्या. सुमारे पाच ते सहा वर्षांपासून सर्रासपणे मुंबई नाका ते शिवाजीवाडी यादरम्यान असलेल्या नंदिनी नदीपात्रात सर्रासपणे ठिकठिकाणी भर टाकून घरे बांधण्याचा धडाका लागला असून, त्यामुळे नदीपात्र संकुचित झाले आहे.पावसाळ्यात नदीचे पाणी शिवाजीवाडी, भारतनगर या भागात शिरते त्यामुळे रोजंदारीवर काम करणाºया येथील रहिवाशांच्या संसारोपयोगी वस्तूंचे दरवर्षी नुकसान होते.महापालिकेच्या वतीने दरवर्षी नदीपात्रात घरे बांधणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जातात, परंतु कार्यवाही मात्र होत नाही. त्यामुळे नदीपात्रात घरे बांधणाºयांचे धाडस दिवसागणिक वाढतच चालले आहे. काही दिवसांतच नदीपात्र दिसेनासे होते की काय असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.दलालांकडून जागेची विक्रीमहापालिकेच्या दुर्लक्षामुळे नंदिनी नदीच्या दुतर्फा काही दलालांनी नदीपात्राची जमीन स्वमालकीची समजून परस्पर घरे बांधण्यासाठी विक्री केली आहेत. या दलालांकडूनच अतिक्रमणधारकांना बळ दिले जात असून, जागा विक्रीबरोबरच या लोकांकडून घरे बांधून देण्याचेही कॉन्ट्रॅक्ट घेतले जात आहे. हजारो रुपये भावाने गुंठेवारीनुसार जमिनीचे भाव ठरत आहेत. नंदिनी नदीचे मुंबई नाका ते शिवाजीवाडी पात्र मोकळा श्वास घेणार की नाही ?

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमणriverनदी