शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

नाशिकच्या काँग्रेसमधील मरगळ कधी झटकली जाणार?

By किरण अग्रवाल | Updated: February 21, 2021 01:20 IST

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षाने आपले वर्चस्व दाखवून देत स्वबळाची भाषा चालवली असताना काँग्रेस मात्र गलितगात्र अवस्थेतच दिसते आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी व शिवसेनेची महापालिकेसाठी स्वबळाची तयारीबहुमत नव्हते, तरी व्यक्तिगत प्रभावातून सत्ता..कोणाच्या नेतृत्वात महापालिका लढायची असा प्रश्न काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना पडला तर आश्चर्य वाटू नये.

सारांशनसलेले बळ आजमावण्याच्या फंदात न पडता शांत व स्वस्थच राहणे आणि जे मिळेल त्यात समाधान मानणे लाभाचे असते. नाशिक महापालिकेच्या वर्षभरावर आलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने शड्डू ठोकून आतापासूनच राजकीय हाकारे-पिटारे चालविले असले तरी काँग्रेस मात्र निवांत आहे ते त्यामुळेच. समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ मिलता नही, या भगवद‌्गीतेतील उपदेशावर विश्वास बाळगणारा त्यांच्यासारखा अन्य पक्ष असू नये जणू.नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना, मनसेने स्थानिक पातळीवरील संघटनात्मक नेतृत्वात अलीकडेच बदल करून आपली तयारी सुरू करून दिली आहे. नुकतेच शिवसेनेचे नेते संजय राऊत नाशकात येऊन छगन भुजबळ यांना भेटून गेले. त्या भेटीत चर्चा काय झाली हे बाहेर आले नाही; पण महापौर शिवसेनेचाच होईल हे मात्र राऊत स्पष्ट करून गेले. भुजबळ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना महाआघाडी होईल तेव्हा होईल; परंतु स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा म्हणून फर्मावले आहे. अर्थात महाआघाडीतील शिवसेना असो की राष्ट्रवादी, हे दोन्ही पक्ष नाशकात आपलेच वर्चस्व गाजवत असतात; सहकारी काँग्रेसला विश्वासात घेण्याची अगर जमेत धरण्याची त्यांना गरज वाटत नाही इतकी काँग्रेस कमकुवत आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष राहिलेले अशोक चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ व संवेदनशील नेते आपल्या नाशिक दौऱ्यात येथील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावून जाणे स्वाभाविक आहे.नाशिकमधील काँग्रेसला लागलेली गटबाजीची कीड हा यासंदर्भातील महत्त्वाचा अडसर आहे. पदांसाठी समांतर काँग्रेसचे प्रयोग करणारे नेते येथे आहेत. कशाला, मागे अशोक चव्हाण हेच प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी महापालिकेत शाहू खैरे यांच्या ऐवजी हेमलता पाटील यांची गटनेतापदी नियुक्ती केली तर ती अद्याप अमलात येऊ शकलेली नाही; म्हणजे पक्षाच्याच आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून सारे सुखेनैव सुरू आहे. मूठभरांच्या दावणीला पक्ष बांधला गेला आहे. नगरसेवक पद असो की आमदारकीची उमेदवारी, महापालिकेतील स्थायी समिती असो, की गटनेतेपद; तेच ते चेहरे पुढे होतात. दुसऱ्यांना संधीच मिळू दिली जात नाही, त्यामुळे पर्यायी नेतृत्वही विकसित होत नाही.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांना बदलून त्यांच्याजागी तुषार शेवाळे यांना नेमले गेले, तेव्हा शहराध्यक्ष बदलाचीही चर्चा झडून गेली होती; पण शरद आहेर आजतागायत कायम आहेत. प्रभारी म्हणून नेमलेल्या व्यक्तीला स्थायी स्वरूपात सात सात वर्षे ढकलावी लागत असतील तर त्यातूनच या पक्षाची निर्नायकी अवस्था स्पष्ट व्हावी. आता तर आहेर यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. त्यांची कोणती चमकदार कामगिरी प्रदेश नेत्यांना भुरळ पाडून गेली हा खरे तर संशोधनाचाच विषय असून, दरबारी राजकारणाला आलेले महत्त्व त्यातून स्पष्ट व्हावे. पण त्यानिमित्तानेही शहराध्यक्षपदाची खुर्ची रिकामी होताना दिसत नाही किंवा पक्षाकडून खांदेपालट झालेला नाही. अशास्थितीत कोणाच्या नेतृत्वात महापालिका लढायची असा प्रश्न काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना पडला तर आश्चर्य वाटू नये.बहुमत नव्हते, तरी व्यक्तिगत प्रभावातून सत्ता..नाशिक महापालिकेत प्रारंभीच्या काळात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिला; परंतु या पक्षाला बहुमत कधीच लाभले नाही, तरीदेखील व्यक्तिगत प्रभावातून व मातब्बरीतून शांताराम बापू वावरे, पंडितराव खैरे, प्रकाश मते महापौर झाल्याने काँग्रेसची सत्ता राहिली. तद्नंतर जोडतोडच्या गणितातून शोभा बच्छाव यादेखील महापौर झाल्या; परंतु त्यांच्यानंतर काँग्रेस कधीही प्रभावी ठरू शकली नाही कारण तशी मातब्बरी असलेले स्थानिक नेतृत्व या पक्षाला लाभू शकले नाही. अलीकडच्या काळात तर महापौर किंवा उपमहापौर पदावर दावेदारी करण्याइतकेही बळ काँग्रेसला जुळवता आले नाही.

टॅग्स :BJPभाजपाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका