शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोडसे यांच्या प्रचाराला कोकाटे कधी निघणार?

By किरण अग्रवाल | Updated: February 24, 2019 00:59 IST

शिवसेनेने स्वबळाचा नारा सोडून देत भाजपासोबत युती केली असली, तरी स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात शड्डू ठोकून तयार बसलेल्यांत मनोमीलन घडून येणे म्हणावे तितके सहज सोपे नाही. यातही लोकसभा निवडणुकीत एकवेळ जमून जाईलही कारण तेथे इच्छुक कमी आहेत, परंतु विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तेथे काय?

ठळक मुद्दे मध्यंतरी तुटलेली ‘युती’ जुळविण्यात अखेर यश आले पक्षांतील इच्छुकांना ठिकठिकाणच्या उमेदवाऱ्या खुणावत होत्या.दिंडोरीत भाजपासाठी सेना तसे करेल का?

सारांशसर्वांत जुनी राजकीय मैत्री म्हणून मध्यंतरी तुटलेली ‘युती’ जुळविण्यात अखेर यश आले असले तरी, वरिष्ठ नेत्यांचे जितके सहजपणे मनोमीलन झाले तितके वा तसे ते स्थानिक पातळीवर हमरीतुमरीने पेटलेल्या आणि निवडणूक लढण्याच्या अपेक्षित संधीने भारलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांत घडून येणे शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. याच अनुषंगाने शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपेयी कधी रणांगणात उतरणार याबद्दल उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक आहे.शेंडी तुटो वा पारंबी ‘युती’ होणार नाहीच, अशा वल्गना यापूर्वी केल्या गेल्याने भाजपाशिवसेना या दोन्ही पक्षांतील इच्छुकांना ठिकठिकाणच्या उमेदवाऱ्या खुणावत होत्या. लोकसभा व विधानसभेच्या दृष्टीने काहीजण तयारीलाही लागले होते, परंतु नाही नाही म्हणत ‘युती’ झाल्याने अशांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. ‘युती’ होणारच असा कयास बांधून व दिंडोरीची जागा विद्यमान खासदारांच्या पक्षालाच जाईल हे ताडून धनराज महाले यांनी अचूकवेळी पक्षांतर करून राष्ट्रवादी गाठली; पण इतरांना तसे जमलेले नाही. त्यामुळे आता ‘युती’ची घोषणा झाल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.नाशिक लोकसभा जागेच्या दृष्टीने भाजपातर्फे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर होते. पण आता केलेली तयारी सोडून ज्यांच्या विरोधात लढायचे होते, त्या शिवसेनेच्या संभाव्य हेमंत गोडसे यांच्याच प्रचाराला बाहेर पडावे लागण्याची वेळ त्यांच्यावर येऊ घातली आहे. म्हणजे येथे नाशकात ही अडचण, तर तिकडे सिन्नरमध्ये आमदारकीच्या प्रचारात राजाभाऊ वाजे यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसायचे, हा त्यापेक्षा अवघड प्रश्न कोकाटे यांच्यापुढे आहे. परिणामी स्वभाव व निर्णयात सडेतोडपणा ठेवणारे कोकाटे ही राजकीय घुसमट सहन करू शकतील, याबाबत शंका बाळगली जाणे गैर ठरू नये.महत्त्वाचे म्हणजे, केंद्रात भाजपाचे सरकार हवे म्हणून नाशकात भाजपाचे पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसेनेला प्रामाणिकपणे मदत करतीलही; परंतु दिंडोरीत भाजपासाठी सेना तसे करेल का? कारण, मुळात शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची संधी गेली ही एक बाब आहेच, शिवाय भाजपाच्या विद्यमान खासदारांनी आपल्याशी फारसे सख्य ठेवल्याची शिवसैनिकांची भावना नसल्याचाही मुद्दा आहे. अशात भाजपाने ज्यापद्धतीने शिवसेनेला झुंजविले व वेळोवेळी कमी लेखले त्याचा सुप्त राग म्हणून शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या उमेदवाराला मदत घडून येण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.विधानसभेच्या निवडणुकीतील ‘युती’बाबतच्या संभाव्य परिणामांची चर्चा करायची, तर नाशकातीलच भाजपाच्या तिघा विद्यमान आमदारांना शिवसेनेची प्रामाणिक मदत होण्याची अपेक्षाच धरता येऊ नये. मध्य नाशिक, सिडको-सातपूर मतदारसंघात शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची तयारी स्पष्टपणे दिसून येत होती, ते मनाला मुरड घालून भाजपाचा प्रचार करणे कठीण आहे. नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपाला नेहमी आडवी जाणारी शिवसेना आता त्यांच्यासाठी ‘दक्ष’ होणे अवघड आहे. सिडकोत तर शिवसेनेतच इच्छुकांची संख्या मोठी आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे अशी काही नावे आहेत जी ऐनवेळी आपल्यातील स्पर्धा विसरून भाजपासाठी प्रचार करतील का? तसेच नाशिक मध्यमध्ये अजय बोरस्तेंकडून फरांदे यांच्या प्रचाराची अपेक्षा करता येऊ नये. गेल्यावेळी सर्वच परस्परांविरोधात लढलेले असल्याने त्यांच्यात मनोमीलन घडून येणे म्हणजे निवडुंगावर फूल उमलण्यासारखे ठरेल.मुळात शिवसेना नेत्यांनी ज्या आक्रमक व विखारीपणे भाजपावर तोफा डागल्या आहेत ते पाहता भाजपातील फळीही खूप काही प्रेमाने, झाले गेले विसरून कामाला लागेल, असे नाही. पण त्यांना दिल्ली हवी असल्याने ते अपमान व अवमान गिळतीलही. मात्र शिवसेनेचे काय? युतीची घोषणा झाली असली तरी स्थानिक पातळीवर तसे चित्र दिसून येण्याबाबत शंका घेतली जाणे त्यामुळेच स्वाभाविक ठरले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूकParliamentसंसद