शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना वगळून येवल्याची ओळख राहणार ती काय?

By श्याम बागुल | Updated: July 16, 2019 15:49 IST

वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या

ठळक मुद्दे येवल्याचा कायापालट करण्यास भुजबळांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. भुजबळ संपल्याची जी काही आवई उठविली गेली

श्याम बागुलनाशिक : मुंबईच्या माझगाव या कामगार व मध्यमवर्गीय वस्तीतून श्रीगणेशा करून राज्याच्या राजकारणावर आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे छगन भुजबळ यांना थेट येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचे आवतण देणाऱ्या माणिकराव शिंदे यांच्याकडून यंदा भुजबळ यांनीच आपल्यासाठी येवला मतदारसंघ सोडण्याची मागणी केली जावी व त्याचवेळी लगतच्या वैजापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी भुजबळ यांनी वैजापूरमधून निवडणूक लढविण्यासाठी थेट येवल्याची पायधूळ झाडावी या दोन्ही गोष्टी निव्वळ योगायोग मानाव्या की बदललेल्या राजकीय समीकरणांचा भाग ? मुळात येवल्याची राज्यात ओळख करून दिली ती छगन भुजबळ यांनी. त्यामुळे येवला मतदारसंघाची मागणी करून माणिकराव स्वत:ची ओेळख निर्माण करू पहात आहेत की, येवल्याची पिछेहाट हादेखील प्रश्न निर्माण होत आहे.

वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी.  २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या राजकीय व नैसर्गिकदृष्ट्या दुष्काळी मतदारसंघाची निवड करतो म्हटल्यावर सर्वांच्या भुवया ताणल्या जाणे स्वाभाविक होत्या. भुजबळ यांनी मतदारसंघाला प्राधान्य दिले म्हटल्यावर येवल्याच्या राजकारणावर भिस्त ठेवून असलेल्यांच्या उरात धडकी भरणे साहजिकच असल्यामुळे त्यावेळी उलट सुलट प्रतिक्रिया उमटून राजकीय आंदोलनांची खेळीही खेळली गेली. भुजबळ यांना येवल्यातून निवडून आणण्यासाठी जसा एक स्थानिक गट कार्यरत होता, तसा दुसरा गट कटकारस्थानातदेखील कायम होता. तशाही अवस्थेत भुजबळ प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले, त्याचबरोबर जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही झपाट्याने बदलली. राज्याचे नेतृत्व करावयास निघालेल्या भुजबळ यांच्या राजकीय छायेखाली सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते कधी विसावले हेदेखील लक्षात आले नाही. येवल्याचा कायापालट सुरू झाला. प्रसंगी नाशिककला विकासाच्या तुलनेत दुय्यम स्थान देऊन येवल्याचा कायापालट करण्यास भुजबळांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. विरोधकांनी तोंडात बोटे घातली तर स्वकीयांनीदेखील भुजबळ यांनी आता येवल्याप्रमाणे अन्य मतदारसंघातही लक्ष घालावे असे टोमणे जाहीरपणे मारून अप्रत्यक्ष येवल्याच्या विकासावर शिक्कामोर्तब केले. येवल्याचा झपाट्याने होणारा विकास पाहून लगतच्या नांदगाव मतदारसंघालाही हेवा वाटला, परिणामी भुजबळ पुत्र पंकज यांनाही या मतदारसंघाने आपलेसे केले. येवल्याच्या वेळी जसा भुजबळांच्या मार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न झाला, त्याची पुनरावृत्ती नांदगावातही राजकारण्यांकडून झाली, मात्र विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मतदारांनी राजकारण्यांना भीक न घालता भुजबळांना आपलेसे केले. गेल्या पंधरा वर्षांपासून भुजबळ यांनी दोन्ही मतदारसंघाचे पालकत्व निभावले, मध्यंतरीच्या काळात त्यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ट पाहून भुजबळ संपल्याची जी काही आवई उठविली गेली त्यातून भुजबळ विरोधकांचे फावले व येवला मतदारसंघात आता भुजबळ नको म्हणून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात झाली. त्याची सुरुवात राष्टÑवादीचेच माणिकराव शिंदे यांनी केली. वृत्तपत्रातून जाहिरात देऊन त्यांनी आपल्या सुप्त भावना जाहीर केल्या व त्यात भुजबळ यांनी थांबावे व आपल्यासाठी जागा सोडावी असा हेतू त्यांनी बोलून दाखविला. भुजबळ यांनी का थांबावे याचे फारसे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही, किंबहुना शिंदे यांनी पुढची चिखलफेक थांबविण्यासाठी भुजबळ यांनीच आपल्या मागणीवर बोलावे, अन्य कोणाकडून अपेक्षा नसल्याचेही सांगून टाकल्यामुळे शिंदे यांच्या मागणीने खूप मोठी राजकीय राळ उठली नाही, मात्र दीड दशके येवला मतदारसंघासाठी झटूनही जर अशा प्रकारची मागणी होणार असेल तर भुजबळ यांना वाईट वाटणे साहजिकच होते व आहे. त्यामुळे शिंदे यांच्या मागणीवर भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मौन पाळले, त्यामुळे मनात सत्तेची मांडे खाणाऱ्यांनी काही काळ तृप्तीचे ढेकरही दिले. परंतु त्याचवेळी लगतच्या वैजापूर मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्या, कार्यकर्त्यांनी भुजबळ यांना उमेदवारीसाठी गळ घातल्याची बाब नक्कीच येवलेकरांना सणसणीत चपराक हाणून गेली. भुजबळ नको म्हणून आजवर ज्यांनी ज्यांनी राजकीय ताकद अजमावून पाहिली त्यांना येवल्याच्या मतदारांनी जागा दाखवून दिली आहे, खुद्द माणिकराव शिंदे यांनीदेखील भुजबळ यांच्या विरोधात लढा देऊन स्वत:ची राजकीय ताकद अजमावून पाहिली आहे. अशा वेळी त्यांनी येवला मतदारसंघातून भुजबळ यांच्याऐवजी स्वत:ची उमेदवारी पुढे करणे म्हणजे जरा अतीच झाले आहे. भुजबळ यांचे राज्यातील राजकारणातील स्थान पाहता, त्यांना येवलाच काय अन्य कोणताही मतदारसंघ निवडणुकीसाठी अवघड नाही, मात्र येवल्यापासून भुजबळ यांचे नाव वेगळे केल्यास येवल्याची ओळख ती काय? राहिला प्रश्न माणिकराव शिंदे यांचा त्यांनी येवल्याची मागणी करून राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला खरा, पण या मागणीचे वास्तव स्वत: शिंदे जाणून आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की, एकदा राजकीय ताकद अजमाविलेले शिंदे यांच्या शिडात पुन्हा हवा भरून त्यांचा राजकीय बळी घेण्यामागे कोणाचा हात आहे?

टॅग्स :PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक