शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरमध्ये नेमकं काय घडलं?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होताच मविआत वादंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:23 IST

खासदार राजाभाऊ वाजे यांच्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.  

Sinnar Vidhan Sabha ( Marathi News ) :सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीनंतर अज्ञात कार्यकर्त्यांनी वडझिरे गावात खासदार राजाभाऊ वाजे व कुटुंबीयांना गावबंदी अशा आशयाचा लावलेला फलक ग्रामस्थांनी ताबडतोब हटवला, मात्र या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले. निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे विजयी झाल्यानंतर त्यांनी वाजे कुटुंबीयांचे आभार मानले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत संशयाचे वातावरण तयार झाले. निकालानंतर खासदार वाजे व कुटुंबीयांना गावबंदीचे फलक अज्ञात व्यक्तीने वडझिरेत लावले होते. त्याच्याशी संबंध नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. संबंधितांचा ग्रामपंचायतीने निषेध करत खासदार वाजे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती दिलगिरी व्यक्त केली. सरपंच सुनीता आंबेकर यांनी तसे पत्रही प्रसिद्ध केले. निवडणुकीनंतर वातावरण कलुषित होऊ नये म्हणून फलक हलविण्यात आले. अज्ञात व्यक्तीने खासदार वाजे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना गावबंदी केल्याचा फलक लावला होता. ग्रामस्थांनी काही तासातच हा फलक उखडून फेकला. सरपंच सुनीता आंबेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सदर बैठकीत फलक लावणाऱ्या व्यक्तीचा निषेध नोंदवण्यात आला. गावात जातीपातीला थारा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.  

उदय सांगळे काय म्हणाले?

"विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मी खुल्या दिलाने मान्य केला आहे. निवडणुकीत जय-पराजय होत असतात. कार्यकर्ते भावनेच्या भरात भूमिका मांडतात. याच भावना आवेगातून सोशल मीडियावर काही चुकीच्या पोस्ट टाकण्यात येत आहेत. या पोस्टशी मी अजिबात सहमत नाही. कार्यकर्त्यांनी यापुढे अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नये व तेढ निर्माण न करता शांतता राखावी," असे आवाहन सिन्नर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार उदय सांगळे यांनी पत्रकार परिषदेत केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार सांगळे यांच्या पराभवानंतर काही कार्यकर्त्यांनी तणाव निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. याबाबत सांगळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीत जे काही नकारात्मक झाले, त्या सर्व गोष्टी विसरून यापुढे सकारात्मक दृष्टाने आपल्याला कार्य करायचे आहे. यापुढे मी आणि माझे कार्यकर्ते दैनंदिन स्वरूपात कार्यरत राहतील. विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय मी घेतला तेव्हा निवडणूक जवळ आली होती. त्यामुळे परिपूर्ण तयारीसाठी मला पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगळे म्हणाले. निवडणूक लढविताना अनेक फॅक्टर असतात आणि त्याच्या अनुकूल व प्रतिकूल असे दोन्ही परिणाम स्वीकारण्याची तयारी करूनच मी निवडणुकीला सामोरा गेल्याचे ते म्हणाले. चार वेळा आमदार राहिलेले आणि गेल्या ३५- ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय राहिलेले प्रतिस्पर्धी समोर असताना, मी उमेदवारी जाहीर केला तेव्हा, ही निवडणूक एकतर्फी होईल अशी विधाने करण्यात आली. तथापि, आपण चांगली लढत दिल्याचे ते म्हणाले. मी एकाकी लढत देऊनही ९७ हजाराच्या वर मते मिळवली. यांचे प्रमाण ४३ टक्के एवढे आहे. पण माझा पराभव लाखाच्या फरकाने झाला नाही. उलट लाखभर मते मला मिळवता आली, याचे समाधान असल्याचेही सांगळे यांनी सांगितले. राज्यभर विरोधात लाट असतानाही आणि सर्वार्थाने प्रत्येक गोष्टीत प्रबळ प्रतिस्पर्धी असतानाही मी त्या मानाने कमी मतांच्या फरकाने मागे राहिलो. या पराभवाकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहात असल्याचेही ते म्हणाले.

कोकाटेंचे केले अभिनंदन 

निवडणुकीचा निकाल खिलाडू वृत्तीने आणि खुल्या मनाने स्वीकारला असल्याचे सांगून कोकाटे यांचे सांगळे यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत कोण माझ्याबरोबर होते आणि कोण नव्हते हा आता माझ्या दृष्टीने भूतकाळ झाला आहे. जे माझ्याबरोबर नव्हते तेसुद्धा यापुढे माझ्याबरोबर कसे येतील अशा सकारात्मक दृष्टिकोनातून सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणे हे खिलाडू वृत्तीचे निदर्शक आहे. त्याच भूमिकेतून यापुढे मी कार्यरत राहणार असल्याचे सांगळे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sinnar-acसिन्नरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार