शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ-कांदे वादाचे खरे कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

नाशिक : दोन वर्षांपूर्वी प्रयत्न करूनही पुत्र पंकजला नांदगाव मतदारसंघात पत्करावा लागलेला पराभव छगन भुजबळ यांच्या जिव्हारी लागलेला, तर ...

नाशिक : दोन वर्षांपूर्वी प्रयत्न करूनही पुत्र पंकजला नांदगाव मतदारसंघात पत्करावा लागलेला पराभव छगन भुजबळ यांच्या जिव्हारी लागलेला, तर एक वेळा अपयशी पदरी पडल्यानंतर दुसऱ्यांदा महत्प्रयासाने सुहास कांदे यांना मिळालेला विजय या दोन्ही गोष्टी तशा समानच असल्या तरी, अजूनही राजकारणातील धग कमी झालेली नाही हे काल-परवा नांदगावच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. भुजबळ-कांदे वादाची अजूनही चर्चा होत असून, त्यामागे वरकरणी पूरग्रस्तांचा मदतीचा उमाळा हे कारण दिसत असले तरी, प्रत्यक्षात एकमेकांचा राजकीय वर्चस्ववादच त्यास कारणीभूत असावा याचे सबळ कारणेही पुढे येऊ लागली आहेत.

नांदगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन होत्याचे नव्हते झाले. शाकांबरी, लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले, तर व्यावसायिक उघड्यावर पडले. शेतीतील पिके मातीसकट वाहून गेल्याने नजीकच्या काळात किती वर्षे शेती नापिकी राहते हे सांगता येणे अशक्य असल्याची परिस्थिती पाहता, पश्चिम महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पुनरावृत्तीच म्हणावी लागेल. त्यामुळे शासनकर्ते म्हणून आमदार सुहास कांदे यांच्यावर जशी पूरग्रस्तांना धीर देण्याची जबाबदारी येते, ओघानेच जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ यांच्यावरही ती कायम आहे. परंतु सरकारी यंत्रणेच्या आढावा बैठकीतच कांदे यांनी भुजबळ यांच्याकडे मदत जाहीर करण्याचा आग्रह धरावा व त्यासाठी ‘तू तू, मै मै’पर्यंत मजल जाण्याची बाब पाहता, यात मदतीसाठी आग्रही की, भुजबळांप्रती नांदगावच्या जनतेत दूषित भावना निर्माण करण्याचा प्रयत्न? हा प्रश्न निर्माण होतो. कांदे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, त्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रायगडच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तेथील पूरग्रस्तांनी ठाकरे यांच्याकडे मदतीचा आग्रह धरला. मात्र ठाकरे यांनी तत्काळ कोणतीही मदत जाहीर न करता, शासकीय यंत्रणेच्या पंचनाम्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेतला. सुहास कांदे यांना हे ठावूक नसेल असे म्हणता येणार नाही.

चौकट====

काय असू शकतात कारणे

सुहास कांदे यांच्या बाजूने-

* नांदगावकर पुराच्या पाण्याचा सामना करीत असताना कांदे यांनी मदत कार्यात हिरिरीने भाग घेतला.

* शासकीय मदतीवर अवलंबून न राहता, पदरमोड करून अनेकांच्या अन्न-पाण्याची सोय केली.

* शासकीय यंत्रणेकडून जलदगतीने कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून कांदे यांचा संताप होणे साहजिक.

* छगन भुजबळ यांच्या दौऱ्यात प्रतिस्पर्धी पंकज भुजबळ यांनीही पूरग्रस्तांना आश्वस्त करणे.

* पंकज भुजबळ महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणातून निर्दोेष सुटणे.

* पंकज यांनी पराभवानंतरही नांदगाव मतदारसंघाशी संपर्क-संवाद कायम ठेवणे.

---------------

छगन भुजबळ यांच्या बाजूने

* पालकमंत्री या नात्याने शासनाची मदत प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावी या हेतूने पंचनामे गरजेचे.

* नैसर्गिक आपत्तीत मदत देताना त्याचा पंचनामा शासकीय दस्तावेजात महत्त्वाचा पुरावा असल्याने पंचनाम्यांचा आग्रह धरणे.

* पूरग्रस्तांच्या नावे भलत्यांनीच उखळ पांढरे करून घेऊ नये हा हेतू

* पुत्र पंकजच्या निमित्ताने नांदगाव मतदारसंघाशी दहा वर्षे असलेली नाळ गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटल्याचे शल्य.

* पूरग्रस्तांच्या पाहणी दरम्यान पंकज भुजबळ यांनाही सहभागी करून पूरग्रस्तांप्रती सहानुभूतीचा फायदा उचलणे.

* आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पूरपरिस्थितीच्या निमित्ताने पंकज यांची तयारी करून घेणे.

(भुजबळ-कांदे यांचे छायाचित्र वापरणे)