शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भुजबळ-कांदे वादाचे खरे कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

नाशिक : दोन वर्षांपूर्वी प्रयत्न करूनही पुत्र पंकजला नांदगाव मतदारसंघात पत्करावा लागलेला पराभव छगन भुजबळ यांच्या जिव्हारी लागलेला, तर ...

नाशिक : दोन वर्षांपूर्वी प्रयत्न करूनही पुत्र पंकजला नांदगाव मतदारसंघात पत्करावा लागलेला पराभव छगन भुजबळ यांच्या जिव्हारी लागलेला, तर एक वेळा अपयशी पदरी पडल्यानंतर दुसऱ्यांदा महत्प्रयासाने सुहास कांदे यांना मिळालेला विजय या दोन्ही गोष्टी तशा समानच असल्या तरी, अजूनही राजकारणातील धग कमी झालेली नाही हे काल-परवा नांदगावच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. भुजबळ-कांदे वादाची अजूनही चर्चा होत असून, त्यामागे वरकरणी पूरग्रस्तांचा मदतीचा उमाळा हे कारण दिसत असले तरी, प्रत्यक्षात एकमेकांचा राजकीय वर्चस्ववादच त्यास कारणीभूत असावा याचे सबळ कारणेही पुढे येऊ लागली आहेत.

नांदगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन होत्याचे नव्हते झाले. शाकांबरी, लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले, तर व्यावसायिक उघड्यावर पडले. शेतीतील पिके मातीसकट वाहून गेल्याने नजीकच्या काळात किती वर्षे शेती नापिकी राहते हे सांगता येणे अशक्य असल्याची परिस्थिती पाहता, पश्चिम महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पुनरावृत्तीच म्हणावी लागेल. त्यामुळे शासनकर्ते म्हणून आमदार सुहास कांदे यांच्यावर जशी पूरग्रस्तांना धीर देण्याची जबाबदारी येते, ओघानेच जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ यांच्यावरही ती कायम आहे. परंतु सरकारी यंत्रणेच्या आढावा बैठकीतच कांदे यांनी भुजबळ यांच्याकडे मदत जाहीर करण्याचा आग्रह धरावा व त्यासाठी ‘तू तू, मै मै’पर्यंत मजल जाण्याची बाब पाहता, यात मदतीसाठी आग्रही की, भुजबळांप्रती नांदगावच्या जनतेत दूषित भावना निर्माण करण्याचा प्रयत्न? हा प्रश्न निर्माण होतो. कांदे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, त्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रायगडच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तेथील पूरग्रस्तांनी ठाकरे यांच्याकडे मदतीचा आग्रह धरला. मात्र ठाकरे यांनी तत्काळ कोणतीही मदत जाहीर न करता, शासकीय यंत्रणेच्या पंचनाम्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेतला. सुहास कांदे यांना हे ठावूक नसेल असे म्हणता येणार नाही.

चौकट====

काय असू शकतात कारणे

सुहास कांदे यांच्या बाजूने-

* नांदगावकर पुराच्या पाण्याचा सामना करीत असताना कांदे यांनी मदत कार्यात हिरिरीने भाग घेतला.

* शासकीय मदतीवर अवलंबून न राहता, पदरमोड करून अनेकांच्या अन्न-पाण्याची सोय केली.

* शासकीय यंत्रणेकडून जलदगतीने कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून कांदे यांचा संताप होणे साहजिक.

* छगन भुजबळ यांच्या दौऱ्यात प्रतिस्पर्धी पंकज भुजबळ यांनीही पूरग्रस्तांना आश्वस्त करणे.

* पंकज भुजबळ महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणातून निर्दोेष सुटणे.

* पंकज यांनी पराभवानंतरही नांदगाव मतदारसंघाशी संपर्क-संवाद कायम ठेवणे.

---------------

छगन भुजबळ यांच्या बाजूने

* पालकमंत्री या नात्याने शासनाची मदत प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावी या हेतूने पंचनामे गरजेचे.

* नैसर्गिक आपत्तीत मदत देताना त्याचा पंचनामा शासकीय दस्तावेजात महत्त्वाचा पुरावा असल्याने पंचनाम्यांचा आग्रह धरणे.

* पूरग्रस्तांच्या नावे भलत्यांनीच उखळ पांढरे करून घेऊ नये हा हेतू

* पुत्र पंकजच्या निमित्ताने नांदगाव मतदारसंघाशी दहा वर्षे असलेली नाळ गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटल्याचे शल्य.

* पूरग्रस्तांच्या पाहणी दरम्यान पंकज भुजबळ यांनाही सहभागी करून पूरग्रस्तांप्रती सहानुभूतीचा फायदा उचलणे.

* आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पूरपरिस्थितीच्या निमित्ताने पंकज यांची तयारी करून घेणे.

(भुजबळ-कांदे यांचे छायाचित्र वापरणे)