शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

माजी खासदारांचे वारसदार सध्या काय करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 01:07 IST

सध्या राजकारणात मुले पळविणारी टोळी कार्यरत झाल्याची टीका विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर केली जात असतानाच राजकीय घराणेशाहीचेही मुद्दे त्यानिमित्ताने जोरकसपणे पुढे आले आहेत.

नाशिक : सध्या राजकारणात मुले पळविणारी टोळी कार्यरत झाल्याची टीका विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर केली जात असतानाच राजकीय घराणेशाहीचेही मुद्दे त्यानिमित्ताने जोरकसपणे पुढे आले आहेत. जिल्ह्यातील नाशिकलोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत दिल्ली गाठणाऱ्या खासदारांच्या कुटुंबीयांचा आढावा घेतला असता, काही माजी खासदारांच्या पाल्यांनी राजकारणात सक्रिय होत निवडणुका लढविल्या आहेत तर काही खासदार पाल्यांनी निवडणुकीच्या भानगडीत न पडता आपला वेगळा मार्ग चोखाळला आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे गो. ह. देशपांडे (१९५१ आणि १९६२), आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे भाऊराव गायकवाड (१९५७), भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे यशवंतराव चव्हाण (१९६३), भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे भानुदास कवडे (१९६७ आणि १९७१), भारतीय लोकदलातर्फे विठ्ठलराव हांडे (१९७०), कॉँग्रेस आयकडून प्रताप वाघ (१९८०), भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे मुरलीधर माने (१९८४), भाजपाचे डॉ. दौलतराव अहेर (१९८९), भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसकडून डॉ. वसंत पवार (१९९१), शिवसेनेचे राजाराम गोडसे (१९९६),भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे माधवराव पाटील (१९९८), शिवसेनेचे अ‍ॅड. उत्तमराव ढिकले (१९९९), राष्ट्रवादी कॉँग्रेसचे देविदास पिंगळे (२००४) आणि समीर भुजबळ (२००९) तसेच शिवसेनेकडून हेमंत गोडसे (२०१४) हे खासदार म्हणून निवडून गेले आहेत. गो. ह. देशपांडे आणि भानुदास कवडे यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही दुसऱ्यांदा खासदार होण्याची संधी लाभू शकलेली नाही. १९७७ नंतर सातत्याने नवीन चेहरा दिल्लीत पाठविण्याची परंपरा नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी पाळलेली आहे. आजवर लोकसभेवर निवडून गेलेल्या काही माजी खासदारांच्या कुटुंबियातून राजकारणाचा वारसा पुढे चालविला जात आहे. तर काहींच्या कुटुंबीयांनी राजकारणापासून दोन हात दूर राहणेच पसंत केल्याचे दिसून येते. गो. ह. देशपांडे यांचे सुपुत्र कर्नल आनंद देशपांडे यांनी आपली भारतीय लष्कारात सामील होत आपली वेगळी वाट चोखाळली. दादासाहेब तथा भाऊराव गायकवाड यांचे घरातूनही राजकारणात कुणी पुढे आले नाही. सद्यस्थितीत त्यांच्या मानसपुत्राचे पुत्र कॅप्टन कुणाल गायकवाड हे भाजपात सक्रीय आहेत. नांदगावचे भानुदास कवडे यांच्या घरातून त्यांचे पुत्र बापूसाहेब कवडे हे शिवसेनेत सक्रीय आहेत परंतु, त्यांनी खासदारकी अथवा आमदारकीची निवडणूक न लढवता किंगमेकरची भूमिका निभावणे पसंत केले आहे. भानुदास कवडे यांचे नातू तेज कवडे हे सध्या नांदगाव बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठलराव हांडे यांच्या कन्या डॉ. शर्मिला हांडे या शेकापच्या महिला ्रआघाडीच्या राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत परंतु, त्यांनीही निवडणुकीच्या राजकारणात न पडणेच पसंत केल्याचे दिसून येते. प्रताप वाघ यांच्या कुटुंबीयातून त्यांच्या कन्येने नाशिक महापालिकेची निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांनाही अपयश आले. तर मुरलीधर माने यांच्या कन्या श्रद्धा यांनी नाशिक महापालिकेच्या शिक्षण मंडळावर काही काळ सदस्यपद भूषविले परंतु त्यासुद्धा राजकारणात सक्रीय राहिल्या नाहीत. माने यांचे पुतणे ुउद्धव पवार हे कॉँग्रेसमध्ये कार्यकर्ते म्हणूनच सक्रीय राहिले आहेत. डॉ. दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ. राहुल अहेर हे चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. डॉ. वसंत पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी निलीमा पवार यांच्याकडे राजकीय वारसदार म्हणून पाहिले गेले. परंतु, निलीमा पवार यांनी राजकारणात न उतरता मविप्र शिक्षण संस्थेचाच वारसा पुढे नेण्याला पसंती दिलेली आहे. वसंत पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्टÑवादीच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. राजाराम गोडसे यांचे पुत्र युवराज गोडसे हे संसरीच्या सरपंचपदाची धुरा सांभाळत आहेत. परंतु, त्यांनी विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात येण्याचा मानस दाखविलेला नाही. माधवराव पाटील यांचे पुत्र संजय पाटील यांनी नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपाकडून लढविली होती परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल ढिकले हे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मात्र आता विधानसभेचे वेध लागले आहेत.देविदास पिंगळे यांच्या घरातून त्यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांनी नाशिक महापालिकेचे नगरसेवकपद भूषविलेले आहे. समीर भुजबळ यांच्या कुटुंबीयात त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ सध्या राष्टÑवादीत कार्यरत आहेत तर हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य यांनी एकलहरे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती परंतु, वडिल खासदार असतानाही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.यशवंतरावांच्या विचारांचा वारसा इतरांकडे१९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघामधून कॉँग्रेसचे गो. ह. देशपांडे निवडून गेले होते; परंतु त्यांच्या निधनानंतर १९६३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिल्लीत पाठविले. आज त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक नेते महाराष्टÑाच्या राजकारणात कार्यरत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक