शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

विहिरींनी तळ गाठल्याने चारा-पाण्याचा प्रश्न ऐरणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:23 IST

वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्दे येवला : उत्तर- पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ

येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.डोंगराळ व कायमच दुष्काळी भाग म्हणून उत्तर-पूर्वभागाची ओळख आहे. दरवर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांमध्ये परिसरातील महिला व तरूणांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने पशुधनाची पाण्यासाठी मोठी वणवण होते. ममदापूर येथील गावालगत असलेला गावठाण बंधारा व विहीरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी ममदापूरवासियांना भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र आहे. बहुतांशी शेतकरी, सामान्य माणसेही चारा पाण्यासाठी बाहेरगावी जाणे पसंत करतात. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने बाहेरगावी जाणे शक्य नसल्याने पशुधन सांभाळण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रलंबित सिंचनाचे प्रकल्प तातडीने शासनाने मार्गी लावावे, अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते प्रकाश जानराव यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात