शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

विहिरींनी तळ गाठल्याने चारा-पाण्याचा प्रश्न ऐरणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:23 IST

वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्दे येवला : उत्तर- पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ

येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.डोंगराळ व कायमच दुष्काळी भाग म्हणून उत्तर-पूर्वभागाची ओळख आहे. दरवर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांमध्ये परिसरातील महिला व तरूणांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने पशुधनाची पाण्यासाठी मोठी वणवण होते. ममदापूर येथील गावालगत असलेला गावठाण बंधारा व विहीरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी ममदापूरवासियांना भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र आहे. बहुतांशी शेतकरी, सामान्य माणसेही चारा पाण्यासाठी बाहेरगावी जाणे पसंत करतात. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने बाहेरगावी जाणे शक्य नसल्याने पशुधन सांभाळण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रलंबित सिंचनाचे प्रकल्प तातडीने शासनाने मार्गी लावावे, अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते प्रकाश जानराव यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात