शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नाशिकमधील भूमाफियांमुळे ११ वर्षे पद्मश्रीला मुकलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 01:57 IST

गेल्या बारा वर्षांपासून मी भूमाफियांमुळे पीडित आहे. हे माफिया समेार न येताच त्रास देतात. मी खूप लढलो परंतु राजकीय नेते आणि पोलीस दलाकडून मदत झाली नाही. नाशिकमधील एका केसमुळे माझ्या डेाक्यावरील केस तर गेले पण ११ वर्षे पद्मश्रीला मुकल्याची खंत प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी मंगळवारी (दि. ३) व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांची खंतराजकीय नेते मदतीला धावले नाहीत

नाशिक- गेल्या बारा वर्षांपासून मी भूमाफियांमुळे पीडित आहे. हे माफिया समेार न येताच त्रास देतात. मी खूप लढलो परंतु राजकीय नेते आणि पोलीस दलाकडून मदत झाली नाही. नाशिकमधील एका केसमुळे माझ्या डेाक्यावरील केस तर गेले पण ११ वर्षे पद्मश्रीला मुकल्याची खंत प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी मंगळवारी (दि. ३) व्यक्त केली.

नाशिकमध्ये सुरेश वाडकर यांनी जमीन खरेदी केली होती. त्यावरून बरेच वादविवाद झाले हाेते. त्यानंतर आत्ता पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी त्यांना या प्रकरणात मदत केली आहे. पोलीस आयुक्तांनी भूमाफियांच्या विरोधात तयार केलेल्या माहितीपटाचे उद्‌घाटनही नेमके वाडकर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.३) करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वाडकर यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

नाशिकमधील वादग्रस्त भूखंड खरेदीतून अडचणीत आलेल्या वाडकर यांनी आपल्याला आलेले कटू अनुभव करताना यामुळेच आपण देश सोडून जाण्याचे वक्तव्य केल्याचे सांगितले. गेलेली बारा वर्षे मला भूमाफियांचा त्रास सहन करावा लागला, आम्ही तुमचे फॅन आहाेत असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांनी मदत केली नाही, ती त्यांच्याकडे खूप याचना केली परंतु उपयोग झाला नाही, असे सांगताना त्यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा उल्लेख केला. तावडे यांनी मदतीचे आश्वासन दिले पण मदत केली नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ठरवले असते तर नक्की मदत करू शकले असते पण तसे झाले नाही अन्य मोठ्या नेत्यांकडे देखील मदत मागितली; मात्र कोणीच पुढे आले नाही असा गौप्यस्फोट त्यांनी केला. यापूर्वीच्या अनेक पाेलीस आयुक्तांनीही सहकार्य केले नाही. न्यायासाठी पाेलीस आणि राजकारणी यांचे उंबरे झिजवले परंतु उपयोग झाला नाही. दु:खी झाल्याने आणि माझ्याच देशात मला न्याय मिळत नसल्याने मी या देशात का राहावे असा उद्विग्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना ते खाकीतील माणूस आहेत, असे वाडकर म्हणाले.

इन्फो...

जमीन घेतली आणि केस उडाले

मी नाशिकमध्ये जमीन घेतली आणि माझी झोप उडाली. वादामुळे माझे केसही गेले आणि आज विग घालावा घालत आहे, असे सांगून वाडकर यांनी भूमाफियांबद्दल आलेल्या अडचणी त्यांनी मांडल्या.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक