शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

टंचाईग्रस्त गावांसाठी लवकरच टँकर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:12 IST

तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळाले नाही. या गावांना लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आमदार जयंत जाधव यांनी केली.

येवला : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळाले नाही. या गावांना लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आमदार जयंत जाधव यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना लवकरच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. याबाबत जाधव यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना सांगितले की, येवला तालुक्यातील अनकाई, वसंतनगर, गोरखनगर, सोमठाण जोश, राजापूर, भुलेगाव, पांजरवाडी, आडसुरेगाव, तळवाडे, शिवाजी नगर, रेंडाळे, गारखेडे, सायगाव, महादेववाडी, जायदरे, ममदापूर तांडावस्ती, निळखेडे, हडप सावरगाव, देवठाण, तांदूळवाडी या १८ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २८ मार्च रोजी प्रस्ताव प्राप्त झाले आहे. मात्र अद्यापदेखील त्यावर निर्णय घेण्यात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राधाकृष्णन बी. म्हणाले की, येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देऊन तत्काळ येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतील. मात्र त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, टंचाईमुळे शेतीची कामे बंद आहेत. त्यामुळे ज्यांना कामे नाहीत अशा मजुरांनी रोजगार हमीद्वारे केल्या जाणाऱ्या जलसंधारणाच्या कामांवर जावे, असे आवाहन केले. त्यामुळे आता लवकरच येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध होणार आहे.भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराणयेवला तालुक्यातील धनकवाडी आणि गणेशपूर येथील प्रस्ताव तहसील कार्यालयाकडून उपविभागीय कार्यालयाकडे पाठविलेले आहेत, तर वाघाळे, देवदरी, खरवंडी, नायगव्हाण आणि नगरसूल वाड्यावस्त्या असे पाच गावांचे प्रस्ताव तालुकास्तरावर आहेत. त्याचबरोबर तालुक्यात प्रचंड पाणीटंचाई वाढली असून, पंचवीस गावांचे प्रस्ताव विविध कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसले असताना दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव लाल फितीत अडकवले जात आहेत. येथील भीषण पाणीटंचाईचा विचार करून वरील टंचाईग्रस्त गावांचे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी जाधव यांनी केली.

टॅग्स :Waterपाणी