शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावांसाठी लवकरच टँकर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:12 IST

तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळाले नाही. या गावांना लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आमदार जयंत जाधव यांनी केली.

येवला : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले असूनदेखील अद्याप या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मिळाले नाही. या गावांना लवकरात लवकर पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे आमदार जयंत जाधव यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना लवकरच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. याबाबत जाधव यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना सांगितले की, येवला तालुक्यातील अनकाई, वसंतनगर, गोरखनगर, सोमठाण जोश, राजापूर, भुलेगाव, पांजरवाडी, आडसुरेगाव, तळवाडे, शिवाजी नगर, रेंडाळे, गारखेडे, सायगाव, महादेववाडी, जायदरे, ममदापूर तांडावस्ती, निळखेडे, हडप सावरगाव, देवठाण, तांदूळवाडी या १८ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २८ मार्च रोजी प्रस्ताव प्राप्त झाले आहे. मात्र अद्यापदेखील त्यावर निर्णय घेण्यात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राधाकृष्णन बी. म्हणाले की, येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देऊन तत्काळ येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतील. मात्र त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, टंचाईमुळे शेतीची कामे बंद आहेत. त्यामुळे ज्यांना कामे नाहीत अशा मजुरांनी रोजगार हमीद्वारे केल्या जाणाऱ्या जलसंधारणाच्या कामांवर जावे, असे आवाहन केले. त्यामुळे आता लवकरच येवल्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध होणार आहे.भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराणयेवला तालुक्यातील धनकवाडी आणि गणेशपूर येथील प्रस्ताव तहसील कार्यालयाकडून उपविभागीय कार्यालयाकडे पाठविलेले आहेत, तर वाघाळे, देवदरी, खरवंडी, नायगव्हाण आणि नगरसूल वाड्यावस्त्या असे पाच गावांचे प्रस्ताव तालुकास्तरावर आहेत. त्याचबरोबर तालुक्यात प्रचंड पाणीटंचाई वाढली असून, पंचवीस गावांचे प्रस्ताव विविध कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसले असताना दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव लाल फितीत अडकवले जात आहेत. येथील भीषण पाणीटंचाईचा विचार करून वरील टंचाईग्रस्त गावांचे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी जाधव यांनी केली.

टॅग्स :Waterपाणी