त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा

By Admin | Updated: August 7, 2015 23:47 IST2015-08-07T23:44:01+5:302015-08-07T23:47:15+5:30

सुविधा : प्रत्येक आखाड्यात बसवली २५ हजार लिटर्सची टाकी

Water supply for Trimbakeshwar Axis directly by pipelines | त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा

त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा

त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी
थेट पाइपलाइनने पाणीपुरवठासुविधा : प्रत्येक आखाड्यात बसवली २५ हजार लिटर्सची टाकीनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरनगरीतील आखाड्यांना यंदा टॅँकरने पाणीपुरवठा न करता जलशुद्धिकरण केंद्रातून थेट जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने केले आहे. प्रत्येक आखाड्यांमध्ये २५ हजार लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्याने आखाड्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येथील जनतेला, साधू-महंत व भाविकांना पुरेसे शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली आहे. त्र्यंबकेश्वर शहराची लोकसंख्या आणि येथे येणारे भाविक, साधू-महंत अशा अंदाजे २५ लक्ष जणांसाठी ५४.८५ लक्ष लिटर पाण्याचे नियोजन केले आहे. त्यात त्र्यंबकेश्वर शहर, आखाडे, साधुग्राम, इतर तंबू व आखाडे, वेळेवर येणारे साधू, भाविक आणि पोलिसांचा समावेश आहे.
कुशावर्त कुंडातील जलशुद्धिकरण यंत्रणा, शहरातील अंतर्गत जलवाहिन्या, आखाड्यांना थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा आणि गौतमी गोदावरी धरणावरून २.६० दशलक्ष लिटर्स क्षमतेची पाणीपुरवठा योजना, जुन्या योजनेची दुरुस्ती तसेच नील पर्वतावरील जलशुद्धिकरण केंद्रासाठी जीवन प्राधिकरण विभागाने ३०.३२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. कुशावर्त कुंडातील जलशुद्धिकरण यंत्रणेची चाचणीदेखील पूर्ण झाली असून, पर्वणी काळात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. शहरात ज्या भागात पाण्याची वितरण व्यवस्था नाही अशा ठिकाणी जलवाहिन्या टाकल्यामुळे नागरिकांनादेखील पुरेसे पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.

४त्र्यंबकेश्वरशिवाय कावनई, पेगलवाडी, सप्तशृंग गडावरही जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्राधिकरणामार्फत नाशिक-त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या महामार्गांवर ओझर, चांदवड, इगतपुरी येथे प्याऊची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूणच सिंहस्थ कुंभमेळा काळात त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या भाविक, साधू-महंतांना पाण्याची कुठलीही कमतरता जाणवू नये याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्नशील आहे.
४शहरातील १० आखाड्यांमध्ये पूर्वी पाण्याच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या, तेथे टॅँकरने किंवा नळाने पाणीपुरवठा केला जात असे; मात्र आता प्रत्येक आखाड्यासाठी जलशुद्धिकरण केंद्रातून थेट पाइपलाइन टाकण्यात आली असून, महंत व साधूंची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक आखाड्याकरिता २५ हजार लिटर्स क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी सांगितले.

Web Title: Water supply for Trimbakeshwar Axis directly by pipelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.