शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शासनाकडून टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:01 AM

सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील वाडी-वस्त्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असून, ग्रामपंचायत व शासनाच्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सहा महिन्यांपासून वाडी-वस्त्यांवरील नागरिकांची तहान टँकरवर भागविली जात आहे. नियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देगावात व काही वस्त्यांवर दिवसाआड नळ पाणीपुरवठा टंचाईची धग : पाणी-चाराटंचाईमुळे जनावरांवर उपासमारीची वेळ; विंहिरींनी गाठला तळ

सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील वाडी-वस्त्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असून, ग्रामपंचायत व शासनाच्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सहा महिन्यांपासून वाडी-वस्त्यांवरील नागरिकांची तहान टँकरवर भागविली जात आहे. नियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे गावाचा समावेश आहे. त्यामुळे गावात व काही वस्त्यांवर दिवसाआड नळ पाणीपुरवठा होत आहे. परंतु काही ठिकाणी पाणीयोजनेचे पाणी न गेल्याने दरवर्षी तेथे उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाई जाणवते. गेल्या काही महिन्यांपासून दुष्काळी स्थिती असल्याने वाडी-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाझर तलाव, केटीवेअर बंधारे, सार्वजनिक विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे वाडी-वस्त्यांवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता गंभीर होत आहे. येथील वाडी-वस्त्यांवरील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून दोन टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु दिवसेंदिवस खालवत चाललेली पाणी पातळी, बाष्पीभवन, वाढती लोकसंख्या अशा अनेक कारणांमुळे शासनाने मंजूर केलेले टॅँकरचे पाणी कमी पडत होते. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. सुमारे चार वर्षांपूर्वी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीने स्वखर्चातून चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ट्रॅक्टर व पाण्याचा टॅँकर विकत घेतला. पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त भागात ग्रामपंचायत खर्चातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून वाडी-वस्त्यांवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येथील चकोर वस्ती, माकडे वस्ती, कोलधाडवाडी, खारे वस्ती, गर्जे वस्ती, वाळकेवस्ती, दौंड वस्ती, शेळके वस्ती, कांगणे वस्ती तसेच चासरोड, मानोरी रोड, बर्के रोड, बोडके वस्ती, नागरे वस्ती, सानपवस्ती आदी भागातील तसेच काही ठिकाणी मागणीनुसार दररोज टॅँकरच्या ७ ते ८ खेपांनी पाणी पुरवले जात आहे. गावाला दिवसाआड पाणीपुरवठाकणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावरच सदरची योजना अवलंबून आहे. धरणाने तळ गाठला असून, मृत साठ्यावरच गेल्या महिन्यापासून योजना तग धरून आहे.नांदूरशिंगोटे व परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी व चाºयाच्या तीव्र टंचाईमुळे पशुधनावर उपासमारीची वेळ आली आहे. वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.दिवसेंदिवस गावाचा विस्तार वाढत असल्याने आगामी काळात पाणी नियोजन करणे महत्त्वाचे आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे गावातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व पाणी काटकसरीने वापरावे.- गोपाल शेळके,सरपंच, नांदूरशिंगोटेमागणी असेल त्या भागात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नित्यनियमाने दिवसभर वाड्या-वस्त्यांवर पाणी वाटप केले जाते. त्यामुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती काही प्रमाणात कमी झाली आहे. एकलव्यनगर येथे व आगिवले वस्ती येथे टॅँकर पुरविला जात आहे.- अनिल शेळके,उपरपंच, नांदूरशिंगोटे