शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

लोकवर्गणीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:39 IST

चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.

ठळक मुद्देचांदगाव : पाणीटंचाईवर उपाय; प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

येवला : तालुक्यातील चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. तीन तासांत तब्बल १७ हजार ३०० रु पये लोकवर्गणी जमा झाली. या लोकवर्गणीतून गावासाठी पाणी टँकर सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे सामाजिक अंतर राखत गावात पाणी वाटप केले गेले.चांदगाव येथे प्रत्येक वर्षी मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव सादर केला मात्र, पंधरा दिवस उलटले तरी अद्यापपर्यंत टँकर मंजूर झाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याने टँकर कधी मंजूर होतो, याची गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे.ग्रामपंचायतीकडे पैसा नाही. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न बिकट बनला. पडीक विहिरीतून पाणी शुद्ध की अशुद्ध यांची शहानिशा न करता जीव धोक्यात घालून सर्रास पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गावातील तरु णांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे विदारक सत्य मांडून लोकवर्गणीच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, तीन तासांतच १७ हजार ३०० रु पये जमा झाले व अजूनही मदतीचा ओघ सुरु आहे. ग्रामस्थांबरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकांनी गावाला पाणीटंचाईच्या या संकटात रक्कम देऊ केली. शासकीय टँकर चालू होत नाही, तोपर्यंत १ टँकर कायमस्वरु पी पुरविण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी या लोकवर्गणीतून घेतली आहे. दरम्यान, तरु णांच्या या युक्तीने प्रशासनावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी आपली पाण्याची गरज पूर्ण केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी