शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

लोकवर्गणीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:39 IST

चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.

ठळक मुद्देचांदगाव : पाणीटंचाईवर उपाय; प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

येवला : तालुक्यातील चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. तीन तासांत तब्बल १७ हजार ३०० रु पये लोकवर्गणी जमा झाली. या लोकवर्गणीतून गावासाठी पाणी टँकर सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे सामाजिक अंतर राखत गावात पाणी वाटप केले गेले.चांदगाव येथे प्रत्येक वर्षी मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव सादर केला मात्र, पंधरा दिवस उलटले तरी अद्यापपर्यंत टँकर मंजूर झाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याने टँकर कधी मंजूर होतो, याची गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे.ग्रामपंचायतीकडे पैसा नाही. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न बिकट बनला. पडीक विहिरीतून पाणी शुद्ध की अशुद्ध यांची शहानिशा न करता जीव धोक्यात घालून सर्रास पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गावातील तरु णांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे विदारक सत्य मांडून लोकवर्गणीच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, तीन तासांतच १७ हजार ३०० रु पये जमा झाले व अजूनही मदतीचा ओघ सुरु आहे. ग्रामस्थांबरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकांनी गावाला पाणीटंचाईच्या या संकटात रक्कम देऊ केली. शासकीय टँकर चालू होत नाही, तोपर्यंत १ टँकर कायमस्वरु पी पुरविण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी या लोकवर्गणीतून घेतली आहे. दरम्यान, तरु णांच्या या युक्तीने प्रशासनावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी आपली पाण्याची गरज पूर्ण केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी