शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

लोकवर्गणीतून टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:39 IST

चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.

ठळक मुद्देचांदगाव : पाणीटंचाईवर उपाय; प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

येवला : तालुक्यातील चांदगाव येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, शासकीय पाणी टँकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील तरुणांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गावातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाणी टँकरसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. तीन तासांत तब्बल १७ हजार ३०० रु पये लोकवर्गणी जमा झाली. या लोकवर्गणीतून गावासाठी पाणी टँकर सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे सामाजिक अंतर राखत गावात पाणी वाटप केले गेले.चांदगाव येथे प्रत्येक वर्षी मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्या. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरचा प्रस्ताव सादर केला मात्र, पंधरा दिवस उलटले तरी अद्यापपर्यंत टँकर मंजूर झाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याने टँकर कधी मंजूर होतो, याची गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे.ग्रामपंचायतीकडे पैसा नाही. त्यामुळे गावचा पाणीप्रश्न बिकट बनला. पडीक विहिरीतून पाणी शुद्ध की अशुद्ध यांची शहानिशा न करता जीव धोक्यात घालून सर्रास पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गावातील तरु णांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हे विदारक सत्य मांडून लोकवर्गणीच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद मिळाला, तीन तासांतच १७ हजार ३०० रु पये जमा झाले व अजूनही मदतीचा ओघ सुरु आहे. ग्रामस्थांबरोबरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षकांनी गावाला पाणीटंचाईच्या या संकटात रक्कम देऊ केली. शासकीय टँकर चालू होत नाही, तोपर्यंत १ टँकर कायमस्वरु पी पुरविण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी या लोकवर्गणीतून घेतली आहे. दरम्यान, तरु णांच्या या युक्तीने प्रशासनावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी आपली पाण्याची गरज पूर्ण केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी