शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

देवळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:28 IST

गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत . यामुळे गिरणा नदीला चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे .

ठळक मुद्देशहरात पाणीटंचाई : गिरणा नदीला आवर्तन सोडण्याची मागणी

देवळा : गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत . यामुळे गिरणा नदीला चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे .लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात देवळा शहरासह नऊ गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. नदीपात्रात असलेल्या उद्भव विहिरीतून देवळा शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदीला पाणी असेल तर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहतो. परंतु गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यानंतर शहराचा पाणी पुरवठा अनियमित होतो. यामुळे शहरवासीयांना गिरणा नदीला चणकापूर / पुनंद धरणातून पुढील आवर्तन येईपर्यंत पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा अनियमित सुरू असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तसेच कोरोनामुळे शहरातून विद्यार्थी, तसेच चाकरमाने गावाकडे परतल्यामुळे शहरातील अनेक कुटुंबात सदस्यांची संख्यादेखील वाढलेली आहे. त्यातच कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पाण्याने हात स्वच्छ धुणे तसेच स्वच्छता राखण्यासाठी शासनाने विविध सुचनांचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे . परंतु अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे शक्य होत नसल्यामुळे इतर ठिकाणाहून पाणी आणणे दुरापास्त झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीकपात