शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

चार गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: April 30, 2017 00:19 IST

येवला : तालुक्यात चार गावे आणि दोन वाड्यांना दोन शासकीय टँकरद्वारे पाण्याच्या दररोज आठ खेपा सुरू झाल्या आहेत.

येवला : तालुक्यात चार गावे आणि दोन वाड्यांना दोन शासकीय टँकरद्वारे पाण्याच्या दररोज आठ खेपा सुरू झाल्या आहेत. कॅनाललगतच्या असणाऱ्या शेकडो डोंगळ्यांच्या करामतीमुळे पालखेडचे आवर्तन लांबल्याने येवला तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता पालखेडचे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी होत आहे. येवला तालुक्याचे उत्तर-पूर्व भागातील बंधारेदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भरून देण्याची मागणी होत आहे.चांदगाव, कुसमाडी, बाळापूर, आडसुरेगाव ही चारी गावे आणि सायगाव (महादेववाडी), ममदापूर (तांडा वस्ती) या दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.शिवाय तालुक्यातील दहा गावांसह दोन वाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकऱ्यांकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आले आहेत. या दहा गावांमध्ये आहेरवाडी, जायदरे, खैरगव्हाण, खरवंडी, देवळाणे, दुगलगाव, बदापूर, बोकटे, कोळगाव, धामणगाव यांचा समावेश आहे, तर मातुलठाण अंतर्गत, कातुरे वस्ती, बांगर वस्ती, खैरगव्हाण (गोपाळवाडी) या वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाई भासत आहे.देवठाण, वाईबोथी, खरवंडी या तीन गावासह नगरसूल अंतर्गत चार वाड्यावस्ती येथे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांची संयुक्त समिती संबंधित पाणीटंचाईच्या गावाला पाहणी केली आहे. त्याबाबतदेखील कार्यवाही चालू असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांनी दिली. यापाठोपाठ कोळगाव खुर्द, कोळम बुद्रुक, पांजरवाडी, गारखेडा या चार गावांसह कोळम बुद्रूकमधील महादेव वाडी, कोळम खुर्दमधील पिसाळवस्ती, चव्हाण वस्ती या गावांचे प्रस्ताव पाहणीसाठी तहसीलदारांकडे दाखल आहेत. येवला तालुक्यात पाणीटंचाई डोकावू लागली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची जोरदार झळ बसायला सुरुवात झाली आहे. पालखेडचे आवर्तन जर अधिक काळ लांबले तर भीषण पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पेक्षा अधिक ४८२ मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली तरी तालुका टँकर मुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच आहे. तालुक्यातील येथील विहिरीचा स्रोत आटले आहेत. पाणीटंचाईचे हे ग्रहण कधी सुटणार या खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)