शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

चार गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: April 30, 2017 00:19 IST

येवला : तालुक्यात चार गावे आणि दोन वाड्यांना दोन शासकीय टँकरद्वारे पाण्याच्या दररोज आठ खेपा सुरू झाल्या आहेत.

येवला : तालुक्यात चार गावे आणि दोन वाड्यांना दोन शासकीय टँकरद्वारे पाण्याच्या दररोज आठ खेपा सुरू झाल्या आहेत. कॅनाललगतच्या असणाऱ्या शेकडो डोंगळ्यांच्या करामतीमुळे पालखेडचे आवर्तन लांबल्याने येवला तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता पालखेडचे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी होत आहे. येवला तालुक्याचे उत्तर-पूर्व भागातील बंधारेदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भरून देण्याची मागणी होत आहे.चांदगाव, कुसमाडी, बाळापूर, आडसुरेगाव ही चारी गावे आणि सायगाव (महादेववाडी), ममदापूर (तांडा वस्ती) या दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.शिवाय तालुक्यातील दहा गावांसह दोन वाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकऱ्यांकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आले आहेत. या दहा गावांमध्ये आहेरवाडी, जायदरे, खैरगव्हाण, खरवंडी, देवळाणे, दुगलगाव, बदापूर, बोकटे, कोळगाव, धामणगाव यांचा समावेश आहे, तर मातुलठाण अंतर्गत, कातुरे वस्ती, बांगर वस्ती, खैरगव्हाण (गोपाळवाडी) या वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाई भासत आहे.देवठाण, वाईबोथी, खरवंडी या तीन गावासह नगरसूल अंतर्गत चार वाड्यावस्ती येथे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांची संयुक्त समिती संबंधित पाणीटंचाईच्या गावाला पाहणी केली आहे. त्याबाबतदेखील कार्यवाही चालू असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांनी दिली. यापाठोपाठ कोळगाव खुर्द, कोळम बुद्रुक, पांजरवाडी, गारखेडा या चार गावांसह कोळम बुद्रूकमधील महादेव वाडी, कोळम खुर्दमधील पिसाळवस्ती, चव्हाण वस्ती या गावांचे प्रस्ताव पाहणीसाठी तहसीलदारांकडे दाखल आहेत. येवला तालुक्यात पाणीटंचाई डोकावू लागली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची जोरदार झळ बसायला सुरुवात झाली आहे. पालखेडचे आवर्तन जर अधिक काळ लांबले तर भीषण पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पेक्षा अधिक ४८२ मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली तरी तालुका टँकर मुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच आहे. तालुक्यातील येथील विहिरीचा स्रोत आटले आहेत. पाणीटंचाईचे हे ग्रहण कधी सुटणार या खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)