शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नांदगाव शहरासह ५६ खेड्यांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 18:39 IST

नांदगांव : पाणीपट्टी भरली नाही म्हणून गेले दहा दिवस गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आल्याने नांदगाव शहरासह ५६ खेडी व नागरी वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी या योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपापाणीपट्टी थकीत : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर

नांदगांव : पाणीपट्टी भरली नाही म्हणून गेले दहा दिवस गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आल्याने नांदगाव शहरासह ५६ खेडी व नागरी वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी या योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सन २०२०-२१ वर्षात केवळ २० टक्के वसुली झाल्याने जिल्हा परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता यांनी ही कारवाई केली असल्याचे वृत्त आहे. कोरोना काळात स्थानिक स्वराज्य संस्थाची करवसुलीची टक्केवारी घसरल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात पिण्याचे पाणीच बंद झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गिरणा धरण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेचा तांत्रिक विभाग चालवितो. त्यात नांदगाव शहर व ५६ खेडी व सुमारे ७५ वस्त्या यांना पाणीपुरवठा केला जातो. नांदगाव नगर परिषदेकडे १ कोटी ७२ लाख रुपये थकबाकी असून, त्यापैकी १२ लाख रुपये भरले आहेत. मालेगाव तालुक्यातील ३९ गावांकडे २७ लाख रुपये बाकी असून, त्यांनी केवळ १ लाख ४० हजार रुपयांचा भरणा केला आहे.नांदगाव तालुक्यातील १८ गावांकडे १४ लाख रुपये बाकी असून, फक्त १ लाख २० हजार रुपयांचा भरणा केला आहे. जिल्हा परिषदेने आधी थकबाकी भरावी मगच पाणीपुरवठा सुरू करू, अशी भूमिका घेतल्याने दिनांक १ जानेवारी २०२१ पासून गिरणा धरणाच्या उदभवातले पंप बंद झाले. त्यामुळे नळातून येणारे पाणी बंद झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गिरणा योजना बंद ठेवल्याने नांदगावकरांचे सात दिवसांनी येणारे आवर्तन लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून दररोज १० दशलक्ष घनफूट पाणी सुमारे दोन लाख लोकांपर्यंत पोहोचविले जाते. संबंधितांनी थकबाकी भरणे आवश्यक आहे.- प्रकाश बोरसे, जि. प. शाखा अभियंता.नगरपरिषदेच्या प्रतिनिधींनी केलेल्या ठरावानुसार ३.४० रुपये प्रती हजार लिटर याप्रमाणे रक्कम भरली आहे. जि. प.ची मागणी ७.४० रु. याप्रमाणे आहे. त्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी नगर परिषदेच्या ठरावाची गरज आहे.- पंकज गोसावी, मुख्याधिकारी.

टॅग्स :water shortageपाणीकपातRural Developmentग्रामीण विकास