शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

नांदगाव शहरासह ५६ खेड्यांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 18:39 IST

नांदगांव : पाणीपट्टी भरली नाही म्हणून गेले दहा दिवस गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आल्याने नांदगाव शहरासह ५६ खेडी व नागरी वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी या योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपापाणीपट्टी थकीत : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर

नांदगांव : पाणीपट्टी भरली नाही म्हणून गेले दहा दिवस गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आल्याने नांदगाव शहरासह ५६ खेडी व नागरी वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी या योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सन २०२०-२१ वर्षात केवळ २० टक्के वसुली झाल्याने जिल्हा परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता यांनी ही कारवाई केली असल्याचे वृत्त आहे. कोरोना काळात स्थानिक स्वराज्य संस्थाची करवसुलीची टक्केवारी घसरल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात पिण्याचे पाणीच बंद झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गिरणा धरण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेचा तांत्रिक विभाग चालवितो. त्यात नांदगाव शहर व ५६ खेडी व सुमारे ७५ वस्त्या यांना पाणीपुरवठा केला जातो. नांदगाव नगर परिषदेकडे १ कोटी ७२ लाख रुपये थकबाकी असून, त्यापैकी १२ लाख रुपये भरले आहेत. मालेगाव तालुक्यातील ३९ गावांकडे २७ लाख रुपये बाकी असून, त्यांनी केवळ १ लाख ४० हजार रुपयांचा भरणा केला आहे.नांदगाव तालुक्यातील १८ गावांकडे १४ लाख रुपये बाकी असून, फक्त १ लाख २० हजार रुपयांचा भरणा केला आहे. जिल्हा परिषदेने आधी थकबाकी भरावी मगच पाणीपुरवठा सुरू करू, अशी भूमिका घेतल्याने दिनांक १ जानेवारी २०२१ पासून गिरणा धरणाच्या उदभवातले पंप बंद झाले. त्यामुळे नळातून येणारे पाणी बंद झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गिरणा योजना बंद ठेवल्याने नांदगावकरांचे सात दिवसांनी येणारे आवर्तन लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून दररोज १० दशलक्ष घनफूट पाणी सुमारे दोन लाख लोकांपर्यंत पोहोचविले जाते. संबंधितांनी थकबाकी भरणे आवश्यक आहे.- प्रकाश बोरसे, जि. प. शाखा अभियंता.नगरपरिषदेच्या प्रतिनिधींनी केलेल्या ठरावानुसार ३.४० रुपये प्रती हजार लिटर याप्रमाणे रक्कम भरली आहे. जि. प.ची मागणी ७.४० रु. याप्रमाणे आहे. त्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी नगर परिषदेच्या ठरावाची गरज आहे.- पंकज गोसावी, मुख्याधिकारी.

टॅग्स :water shortageपाणीकपातRural Developmentग्रामीण विकास