शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

येवला तालुक्यातील १७ गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यावरच टँकर्स सुरू करण्याची वेळ आली आहे. येवला तालुक्याला ...

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होऊनही जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यावरच टँकर्स सुरू करण्याची वेळ आली आहे. येवला तालुक्याला यंदाही टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, सद्य:स्थितीत तीन शासकीय टँकर्सने पाणीपुरवठा सुरू असताना आणखी दहा टँकर्सला मंजुरी देण्यात आली आहे.

गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने किमान मे महिन्यापर्यंत तरी पाणीटंचाई जाणवणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे पाणी आवर्तनाचे फेर नियोजन करण्याची चर्चा सुरू झाली होती; परंतु उन्हाची तीव्रता जाणवू लागताच येवला तालुक्यातून टँकर्सची मागणी होऊ लागली आहे. मागील आठवड्यात तहसीलदारांनी तीन टँकर्सची मागणी नोंदविल्यानंतर ६ गावे आणि २ वाड्यांना तीन शासकीय टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. आता आणखी १० टँकर्सची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली असून, त्याबाबतचे आदेश होऊन मंजुरीदेखील देण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांत या टँकर्सने तालुक्याला पाणीपुरवठा होणार आहे.

नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला तालुक्याला वाढत्या उन्हाबरोबरच टँकर्सची गरज भासू लागली आहे. सद्य:स्थितीत तीन टँकर्सद्वारे तहान भागविली जात असून, पुढील आठवड्यात आणखी दहा टँकर्स सुरू होणार आहेत. त्यानुसार १३ टँकर्सद्वारे १७ गावे आणि २५ वाड्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, टँकर्सबरोबरच एक विहीरदेखील अधिग्रहित करण्यात आली आहे. देवळा तालुक्यासाठी तीन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाणीसाठा देखील आटत असल्याने जिल्ह्यातून टँकर्सला होणारी मागणी लक्षात घेता तालुका पातळीवरच टँकर्स मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार खासगी पुरवठादारांची नियुक्ती तसेच विहिरी अधिग्रहित करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या असून, तसे आदेश प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.