शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

पाणी चोरीकडे डोळेझाक

By admin | Updated: March 16, 2016 21:56 IST

पेच : कणकोरीसह पाच गाव योजना अडचणीत येण्याची शक्यता

सचिन सांगळे  नांदूरशिंगोटेसिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी व अनेक व्हॉल्व्हमधून पाण्याची राजरोसपणे चोरी होत आहे. एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा समिती गेल्या काही दिवसांपासून बरखास्त असल्याने दिवसेंदिवस पाणी चोरांचे फावते आहे.पिण्याच्या पाण्याची चोरी व गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली व्हॉल्व्हद्वारे होणाऱ्या पाण्याच्या गळतीचे पाणी खुलेआम शेतीसाठी वापरले जात असल्याचे चित्र आहे. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असताना उपलब्ध पाण्यातच आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा योजना संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.भोजापूर धरणात फक्त २३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुख्य जलवाहिनी व व्हॉल्व्हद्वारे नेहमीच पाणीचोरीचे प्रकार घडत असतात. भोजापूर धरण ते मऱ्हळ खुर्द आदि २२ किलोमीटर अंतरापर्यंत दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.गेल्या सात ते आठ दिवसांपूर्वी रामवाडी (चास) येथील व्हॉल्व्हला थेट पाइनलाइन करून पाणी डाळींब बागेसाठी नेल्याचे चित्र आहे. एकीकडे नागरिकांना पिण्यास पाणी नाही तर दुसरीकडे दिवसा-ढवळ्या पाणीचोरी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात आहे. यामुळे योजनेवरील वीजबिल मोठ्या प्रमाणात येत असून, त्याचा फटका पाच गावांतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासन पाणी गळती रोखण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने पाणी बचत कशी होणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू असून, हजारो नागरिकांची तहान भागवत आहे.