शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

शहरात पाणीकपातीचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:00 IST

हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले

नाशिक : हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले असून, या संदर्भात महापालिका, जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यात अंतिम निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कुंटे हे नाशिक जिल्हा दौºयावर आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी दुष्काळी परिस्थितीच्या गांभीर्यावर भाष्य केले. नाशिक शहराची वाढती लोकसंख्या व त्यासाठी लागणारे पाण्याचा विचार करता, गंगापूर धरणातून शहरासाठी ४९०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आॅक्टोबर ते मे महिन्यापर्यंत महापालिकेने ३४४० दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचा वापर केला आहे. शहरासाठी महापालिका दररोज १६.१८ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा धरणातून करीत आहे.उन्हाळ्यात पाणी उचलण्याचे हे प्रमाण पाहता, महापालिकेने जुलैअखेरपर्यंत केलेल्या नियोजनानुसार हे योग्य असले तरी, उन्हाच्या तडाख्याने धरणातील पाण्याचे वाढते बाष्पीभवनाचे प्रमाण व त्यातच यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचे हवामान खात्याने दिलेले संकेत पाहता, जून, जुलै महिन्यांत पाऊस पडला नाही तर ऐनवेळी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धावपळ करण्याची वेळ येवू शकते.कठोर भूमिका घ्यावी लागणारमहापालिकेसाठी आरक्षित असलेले पाणी व जुलैअखेरपर्यंत लागणारे पाण्याचा विचार करता, शहरात पाणीकपात करण्याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून धोरण ठरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे शहरातही पाणी जपून वापरावे लागणार असून, शहरातील काही भागांत पाण्याचा होणाºया अपव्ययाबाबत महापालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.सध्या गंगापूर धरणात २५ टक्के, तर धरण समूहात १६ टक्के पाणी शिल्लक असल्याची बाब पाटबंधारे खात्याने पालक सचिव सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून देतानाच महापालिकेला पाणीकपातीचा सल्ला देण्याची विनंती केली. त्याचा आधार घेत कुंटे यांनी पत्रकारांशी बोलताना भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज बोलून दाखविली.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक