शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

शहरात पाणीकपातीचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:00 IST

हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले

नाशिक : हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबणीवर असल्याचे जाहीर केल्याने सध्या धरणात पुरेसे पाणी असले तरी, पाऊस जर लांबला तर पाणी कोठून आणणार याचे उत्तर सापडत नसल्याने येत्या काही दिवसांत नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे संकेत पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दिले असून, या संदर्भात महापालिका, जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन त्यात अंतिम निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कुंटे हे नाशिक जिल्हा दौºयावर आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी दुष्काळी परिस्थितीच्या गांभीर्यावर भाष्य केले. नाशिक शहराची वाढती लोकसंख्या व त्यासाठी लागणारे पाण्याचा विचार करता, गंगापूर धरणातून शहरासाठी ४९०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. आॅक्टोबर ते मे महिन्यापर्यंत महापालिकेने ३४४० दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याचा वापर केला आहे. शहरासाठी महापालिका दररोज १६.१८ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा धरणातून करीत आहे.उन्हाळ्यात पाणी उचलण्याचे हे प्रमाण पाहता, महापालिकेने जुलैअखेरपर्यंत केलेल्या नियोजनानुसार हे योग्य असले तरी, उन्हाच्या तडाख्याने धरणातील पाण्याचे वाढते बाष्पीभवनाचे प्रमाण व त्यातच यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचे हवामान खात्याने दिलेले संकेत पाहता, जून, जुलै महिन्यांत पाऊस पडला नाही तर ऐनवेळी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धावपळ करण्याची वेळ येवू शकते.कठोर भूमिका घ्यावी लागणारमहापालिकेसाठी आरक्षित असलेले पाणी व जुलैअखेरपर्यंत लागणारे पाण्याचा विचार करता, शहरात पाणीकपात करण्याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून धोरण ठरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे शहरातही पाणी जपून वापरावे लागणार असून, शहरातील काही भागांत पाण्याचा होणाºया अपव्ययाबाबत महापालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.सध्या गंगापूर धरणात २५ टक्के, तर धरण समूहात १६ टक्के पाणी शिल्लक असल्याची बाब पाटबंधारे खात्याने पालक सचिव सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून देतानाच महापालिकेला पाणीकपातीचा सल्ला देण्याची विनंती केली. त्याचा आधार घेत कुंटे यांनी पत्रकारांशी बोलताना भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज बोलून दाखविली.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक