शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

१०९ गावे, १९ वाड्यांना पोहोचणार पाणीटंचाईची धग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:17 IST

तालुक्यात ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, माळमाथा पाणीपुरवठा योजना , २६ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव पाणी पुरवठा योजना ...

तालुक्यात ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, माळमाथा पाणीपुरवठा योजना , २६ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव पाणी पुरवठा योजना तसेच स्थानिक ग्रामपंचायतींच्या पाणी पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनांद्वारे तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या कमी झाली आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाल्याने पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही , तरीही टंचाईची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर मात करण्यासाठी पाणी टंचाई कृती नियाेजन आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात कुठेही पाणी टंचाई जाणवली नाही. जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यानचा दुसरा टप्पा सुरु आहे. यातही अद्याप पाणी टंचाई समस्या जाणवली नाही. गरज भासल्यास आराखड्यानुसार ८९ गावे व १८ वाड्यांच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. अखेरचा टप्पा एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा आहे. यात केवळ २० गावे व एका वाडीस पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. या गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रगतीतील नळ याेजना पूर्ण करणे, विंधन विहीर घेणे, नळ याेजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयाेजना, विंधन विहिरीची विशेेष दुरुस्ती, विहीर खाेल करणे, बुडकी घेणे, खाजगी विहीर अधिग्रहित करणे, टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे या स्वरुपात उपाय याेजनांचे नियाेजन झाले आहे.

इन्फो

यंदाही तालुका टँकर मुक्तीच्या दिशेने?

तालुक्यात मार्च २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत ६० टँकरच्या मदतीने १०४ गावांना पाणीपुरवठा सुरु हाेता. गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला हाेता. तरीही मे अखेर सावकारवाडी गावास १२ दिवस टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. या वर्षी पाऊस दमदार झाल्याने छाेटे - माेठे तलाव, विहिरींना आजही मुबलक पाणी आहे. त्यामुळे यंदाही तालुका टँकरमुक्त राहील असा दावा प्रशासकीय पातळीवरुन केला जात आहे. काही वाड्या-वस्त्यांना पाणी टंचाईची झळ बसू शकते या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या टंचाई शाखेने संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.