शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:12 IST

सायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : विहिरी, बोअरवेल्सवर लाखोंचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेती व्यवसाय विशेषत: निसर्गावरच अवलंबून आहे. पर्यायी पाटपाण्याची सुविधा नसल्याने या भागातील रब्बी हंगामातील पिकांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शेतकरी खरीप हंगामातील मिळालेली मिळकत व कर्जावू घेतलेला पैसा रब्बीचे पिके वाचविण्यासाठी विहिरी व बोअरवेल खोदण्याचा केविलवाणा प्रयत्न वर्षानुवर्ष करत आला आहे.साठ फूट खोलीची विहीर खोदून बांधायची म्हटल्यावर चार ते पाच लाखांचा खर्च येतो. सरासरी दोनशे फूट बोअरवेल्स घ्यायचा तर १५ हजार रुपये लागतात. पर्यायी पाट पाण्याची सुविधा नसलेल्या उत्तर-पूर्व भागातून दरवर्षीकोट्यवधी रुपये खर्च होताना दिसतात. त्यात शंभरात एखाद्या विहिरीला अथवा बोअरला पाणी लागते, तेही दीर्घकाळ टिकेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे उत्तर-पूर्व भागातील सुमारे ६० खेड्यांतून दरवर्षी ३०० विहिरी नव्याने खोदल्या जातात तर हजारो बोअरवेल्स घेतले जातात.कोट्यवधींचा जुगारतालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४३८ मिलिमीटर इतके आहे. यंदाच्या हंगामात विक्र मी पर्जन्य होऊनही उत्तर - पूर्व भागाला आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी विहिरी, बोअरवेल्स वाढतच आहे. मात्र रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र वाढताना दिसत नाही. याचा अर्थ पाण्याच्या शोधार्थ नाशिबावर हवाला ठेवून शेतकरी दरवर्षी कोट्यवधीचा जुगारच खेळतो आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीकपात