शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 01:57 IST

मे महिना सरतांना जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्या आहेत. पांगरीत पाण्यासाठी तहानलेल्या नागरिकांनी महिलांसह तळपत्या उन्हात अक्षरश: रस्त्यावर उतरत पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले, तर ब्राह्मणवाडे येथे आठवडाभर पाणी मिळाले नसल्याने महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.

नाशिक : मे महिना सरतांना जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्या आहेत. पांगरीत पाण्यासाठी तहानलेल्या नागरिकांनी महिलांसह तळपत्या उन्हात अक्षरश: रस्त्यावर उतरत पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले, तर ब्राह्मणवाडे येथे आठवडाभर पाणी मिळाले नसल्याने महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.

पांगरीत रास्ता रोको : सिन्नर-शिर्डी रस्ता रोखला

 

सिन्नर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी सिन्नर- शिर्डी रस्त्यावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नाही. टंचाईग्रस्त गावांना त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले, तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पांगरी ग्रामपंचायतीस रिकाम्या घागरी देऊन आंदोलन करण्यात आले.

ग्रामसेवकाला कोंडले

आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी ग्रामसेवकाला त्यांच्या कार्यालयांमध्ये डांबून बाहेरून टाळे ठोकले. आंदोलनासाठी महिला रिकामे हंडे घेऊन आल्या होत्या.

महिलांचा हंडा मोर्चा

 

ब्राह्मणवाडे येथे पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. गेल्या आठवड्यापासून गावात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त केला. (अधिक वृत्त : हॅलो)

फोटो :२६ पांगरी २

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई