शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:30 IST

कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाणीयोजना अपूर्णावस्थेत । टॅँकरसाठी दोन प्रस्ताव दाखल

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वीच बरड्याच्या वाडीच्या रूपाने पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. सध्या या वाडीचा पाणीटंचाईचा पूर्ण तूर्तास सुटला असताना आता तालुक्यातील वेळे आणि विनायक नगरमध्ये टॅँकर सुरू करण्याचे प्रस्ताव त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये येऊन धडकले आहेत. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही, असे वाटत असतानाच पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एकूण दहा कामे मंजूर झाली असून, त्यापैकी चार कामांच्याच निविदा निघाल्या होत्या, पण ठेकेदारांचा हलगर्जीपणा व यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे सुरू असलेली कामे अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. या कामांपैकी रायते व मुलवड येथील कामाची मुदत १ नोव्हेंबर २०१९ रोजी व मुलवड येथील कामाची मुदत १ जानेवारी २०२० रोजी संपली असूनही काम नेहमीप्रमाणे काम प्रगतीत असल्याचे सांगितले जात आहे. खैराईपाली व अंजनेरी येथील कामाची मुदत ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत आहे. सहा मंजूर कामे कोरोनाच्या व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सध्या शासनानेच थांबविलेली आहेत. नव्याने आता एकही काम प्रस्तावित नाही. मंजुरीच्या प्रतीक्षेतील कामे पूर्ण झाली तरच तालुका टंचाईमुक्त होणार आहे.सोमनाथनगर, मेटघर किल्ला, बरड्याच्या वाडीचा प्रस्ताव तर अगोदरच दाखल झाला होता. सध्या ३० एप्रिलपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात पाणी- पुरवठा सुरळीत चालू असला तरी मे महिन्यात दिवसाआड पाणी पुरवठ्याचे संकेत मिळत आहेत. वास्तविक अंबोली धरण आटल्यावर अंबोली धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे. पण नगर परिषदेचेही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी