शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:30 IST

कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाणीयोजना अपूर्णावस्थेत । टॅँकरसाठी दोन प्रस्ताव दाखल

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वीच बरड्याच्या वाडीच्या रूपाने पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. सध्या या वाडीचा पाणीटंचाईचा पूर्ण तूर्तास सुटला असताना आता तालुक्यातील वेळे आणि विनायक नगरमध्ये टॅँकर सुरू करण्याचे प्रस्ताव त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये येऊन धडकले आहेत. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही, असे वाटत असतानाच पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एकूण दहा कामे मंजूर झाली असून, त्यापैकी चार कामांच्याच निविदा निघाल्या होत्या, पण ठेकेदारांचा हलगर्जीपणा व यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे सुरू असलेली कामे अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. या कामांपैकी रायते व मुलवड येथील कामाची मुदत १ नोव्हेंबर २०१९ रोजी व मुलवड येथील कामाची मुदत १ जानेवारी २०२० रोजी संपली असूनही काम नेहमीप्रमाणे काम प्रगतीत असल्याचे सांगितले जात आहे. खैराईपाली व अंजनेरी येथील कामाची मुदत ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत आहे. सहा मंजूर कामे कोरोनाच्या व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सध्या शासनानेच थांबविलेली आहेत. नव्याने आता एकही काम प्रस्तावित नाही. मंजुरीच्या प्रतीक्षेतील कामे पूर्ण झाली तरच तालुका टंचाईमुक्त होणार आहे.सोमनाथनगर, मेटघर किल्ला, बरड्याच्या वाडीचा प्रस्ताव तर अगोदरच दाखल झाला होता. सध्या ३० एप्रिलपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात पाणी- पुरवठा सुरळीत चालू असला तरी मे महिन्यात दिवसाआड पाणी पुरवठ्याचे संकेत मिळत आहेत. वास्तविक अंबोली धरण आटल्यावर अंबोली धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे. पण नगर परिषदेचेही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी