अश्वमेघनगरला पाणी टंचाई
By Admin | Updated: May 7, 2014 23:26 IST2014-05-07T23:02:42+5:302014-05-07T23:26:48+5:30
पंचवटी : पेठरोडवरील प्रभाग क्रमांक ६ मधील अश्वमेघनगर भागातील विविध नागरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

अश्वमेघनगरला पाणी टंचाई
पंचवटी : पेठरोडवरील प्रभाग क्रमांक ६ मधील अश्वमेघनगर भागातील विविध नागरी वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांची गैरसोय निर्माण झाली असुन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. परिसरातील पाण्याच्या समस्येबाबत नागरीकांनी विभागीय अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
प्रभागातील गजवक्रनगर, अश्वमेघनगर, विठाईनगर, कर्णनगर, पवारमळो, या भागात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही पाणी प्रश्न सुटलेला नाही शिवाय प्रशासनाकडू कोणत्याही प्रकारची उपाय योजना केलेली नाही त्यामुळे नागरीकांत नाराजी पसरली आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांची प्रचंड गैरसोय होत असुन महिलांना ऐन उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने परिसरातील नागरीकांची पाण्याची समस्या लक्षात घेऊन तत्काळ पाणी पुरवठा सुरळित करावा अशी मागणी शिवसेना पंचवटी विभागप्रमुख हरिभाऊ काळे, शिल्पा गुंजकर, प्रविण ठाकरे, दिपक धोत्रे, सुभाष चौधरी, लक्ष्मी क्षिरसागर, कल्पना गायकवाड आदिंसह नागरीकांनी केली असुन पाणी प्रश्न न सुटल्यास तीव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)