शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

जलसंपदा कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:29 IST

तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी आदेश देऊनही जलसंपदा विभागातील कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. सचिवांच्या आदेशानंतरही जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देआदेशही दुर्लक्षित : तीन वर्षांपासून लढा सुरू

नाशिक : तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी आदेश देऊनही जलसंपदा विभागातील कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. सचिवांच्या आदेशानंतरही जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळातील ६० ते ७० चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना अजूनही पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करणाºया कर्मचाºयांना न्याय मिळत नसल्याने कर्मचाºयांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता ए. एल. पाठक यांना निवेदन दिले. या पदोन्नत्यांबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांनी दिला आहे.जलसंपदा विभागाच्या नाशिक परिमंडळात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ६० ते ७० चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना तृतीय श्रेणीत लिपिक, टंकलेखक म्हणून पदोन्नती मिळू शकलेली नाही. पदोन्नतीसाठी कर्मचाºयांनी जलसंपदा मंत्र्यांपासून ते मुख्य सचिवांपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘प्रहार’च्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता ए. एल. पाठक यांना निवेदन सादर केले. कर्मचाºयांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, शहरप्रमुख श्याम गोसावी, वैभव देशमुख यांच्यासह देवदत्त कटारे, शशिकांत मोरे, राहुल कानडे, नागेश पगारे, निरंजन सोनवणे, गणेश पवार, गजानन पाटील, यशपाल विभांडिक, निशिगंधा आमले, माया जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.नाशिकची उदासीनतापदोन्नतीस पात्र असतानाही कर्मचाºयांची पदोन्नती नाकारणारा जलसंपदा विभाग अन्य जिल्ह्णाच्या तुलनेत मागे पडला आहे. औरंगाबाद, नागपूर, ठाणे, पुणे, अमरावती परिमंडळांनी जास्तीत जास्त पदे पदोन्नतीने भरली आहेत. आता केवळ नाशिक परिमंडळ असून सध्या कोणतीही प्रशासकीय अडचण नसल्याने पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारEmployeeकर्मचारी