शेतीसाठी पाण्याचे आरक्षण
By Admin | Updated: November 25, 2015 23:18 IST2015-11-25T23:18:06+5:302015-11-25T23:18:50+5:30
दिंडोरी तालुका : नियोजन करण्याची गरज

शेतीसाठी पाण्याचे आरक्षण
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील धरणांचे पाणी पिण्याबरोबरच शेतीच्या सिंचनासाठी आरिक्षत करण्यात आले असून, याबाबत सर्वसंमतीने योग्य ते नियोजन करून काटकसरीने पाण्याचा वापर करत शेती वाचिवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे.
दिंडोरी तालुक्यातील धरणातील हक्काचे पाणी शेतकऱ्यांसाठी मिळावे यासाठी मुंबई येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिंडोरी तालुक्यातील धरणाचे पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, सर्व धरणातून शेतीसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध पाणलोट क्षेत्रातील पाणी साठा शेतकऱ्यांना वापरण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे असेही आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे तसेच तालुक्यातील विविध गावांचे सार्वजनिक पाणीपुरवठा याबाबतही नियोजन करण्यात आले असून, विविध रखडलेल्या पानियोजानांना चालना देण्याची मागणी करण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वच धरणांमध्ये पाणी साठा कमी असल्याने
शेतकऱ्यांना लाखो रु पये कर्ज काढून उभ्या केलेल्या द्राक्षबागांसह शेती कशी वाचवायची हा प्रश्न पडला होता. शेतकऱ्यांची आपले वाट्याला येणारे हक्काचे पाणी मिळावी ही मागणी होती याबाबत आमदार झिरवाळ यांनी शेतकऱ्यांची बाजू पालकमंत्री यांचेपुढे मांडत ती मान्य करून घेतली आहे. त्याबरोबरच मांजरपाडासह विविध वळण योजनांचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी करत पाणी उपलब्धता दाखले देत विविध साठवण बंधारे वळण बंधारे यांना परवानगी देण्याची तसेच विविध बंधारे दुरूस्ती धरणातील गाळ काढण्याची मागणी पालकमंत्री यांचेकडे केली असून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत सकरात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)