शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर, दारणा धरणांतून सोडले पाणी

By admin | Updated: June 5, 2014 01:01 IST

नाशिक : सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ३ जूनपासून गंगापूर व दारणा धरणांतून १४०० द.ल.घ.फू. पाणी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

नाशिक : गंगापूर व दारणा समूह प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ३ जूनपासून गंगापूर व दारणा धरणांतून १४०० द.ल.घ.फू. पाणी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोडण्यात आलेले पाणी तालुकावार पुरविणे आवश्यक आहे. ३१ जुलै २०१४ अखेर पिण्याचे पाणी शिल्लक राहावे म्हणून सुरू झालेल्या पाणी पाळी (आवर्तन) कालावधीमध्ये दारणा धरण ते नांदूरमध्यमेश्वर बंधारा व गंगापूर धरण ते नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत गोदावरी व दारणा नदीवरील अनधिकृत उपसा करणार्‍या विद्युतपंपांचा विद्युतपुरवठा भारनियमन घेऊन खंडित करण्यात यावा. या कालावधीत नळपाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची संबंधित गावे, सरपंच व ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांनी खबरदारी घ्यावी. तसेच इंधनावर चालणारे सर्व अनधिकृत पंप व मोटारी जप्त करण्याची तसेच अनधिकृत विद्युतपंप जप्त करण्याची कार्यवाही पाटबंधारे विभागाने तातडीने हाती घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)