शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बागलाण तालुक्यात जलशुद्धिकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:38 PM

सटाणा : ग्रामपंचायत ,अंगणवाडी व शाळांमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ ,टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियानास बागलाण तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे.पिहल्या टप्प्यात ८१ गावांच्या टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देनिर्जंतुकीकरण : प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र येथे पाणी साठविण्याच्या टाक्या, ड्रम, फिल्टर यांची स्वच्छता

सटाणा : ग्रामपंचायत ,अंगणवाडी व शाळांमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ ,टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियानास बागलाण तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे.पिहल्या टप्प्यात ८१ गावांच्या टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीते यांनी येत्या 18 जून ते 6 जुलै पर्यंत पत्येक गावातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार बागलाण तालुक्यात शुद्धीकरण अभियान राबविण्यात येत आहे.तालुक्यातील ताहाराबाद ,द्याने ,सोमपूर ,जायखेडा ,आसखेडा ,ब्राम्हणपाडे ,मुंजवाड ,चौंधाणे, करंजाड ,निताणे, केरसाणे, दसाणे, पिंगळवाडे, पारनेर .आराई ,बुंधाटे, पठावे दिगर, मुंगसे, सारदे,जोरण ,डांगसौदाणे, कंधाणे, दिहंदुले ,निकवेल, तळवाडे दिगर, तरसाळी ,औंदाणे, जाखोड, मोरकुरे आदी गावांमध्ये स्वच्छता व जलस्रोत यांचे शुद्धीकरण अभियान राबविण्यात आले. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्या.तसेच प्राथमिक शाळा ,अंगणवाडी केंद्र येथे पिण्याचे पाणी साठविण्याच्या टाक्या ,ड्रम ,फिल्टर यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.गावातील पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण ,हातपंप ,पाण्याचे जलकुंभ व टंकरने पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.ज्या स्रोतांचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते .त्यांचे व हातपंपचेही शुद्धीकरण होत आहे.त्यासाठी सरपंच ,सदस्य पुढाकार घेत असून त्यांना आरोग्य विषयी माहिती आरोग्य विभागाच्या विशेष पथकाकडून दिली जात आहे.स्वच्छता विभागाचे वैभव पाटील ,उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार ,ग्रामविकास अधिकारी ,ग्रामसेवक ,आरोग्य सेवक ,अंगणवाडी सेविका ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जलकुंभांसह हातपंपाचे होणार शुद्धीकरणकळवण येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या सुचनेनुसार दोन दिवस तालुक्यातील ८६ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व गाव, वाड्या व वस्तीवर तसेच अंगणवाडी, तालुक्यातील २०७ प्राथमिक शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डी.एम.बहिरम यांनी दिली.ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळण्यासाठी व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉ. गिते यांनी असे नावीन्यपूर्ण अभियान जिल्ह्यात सुरू केले आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमति शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत सर्व तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकाही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.डॉ. नरेश गिते यांच्या निर्देशानुसार सर्व ग्रामपंचायत , शाळा व अंगणवाडीतील पाण्याचे जलकुंभ व हातपंप शुद्धीकरण दोन दिवसात करण्यात येणार आहे, देखरेख साठी तालुकास्तरावरून संपर्कअधिकारी नेमण्यात आले आहे.- डी.एम.बहिरम, गटविकास अधिकारी